शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

सरकारने राज्यपालांचा अपमान केलाय, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी

By महेश गलांडे | Updated: February 11, 2021 15:33 IST

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज नियोजित कार्यक्रमानुसार उत्तराखंडसाठी निघणार होते. त्यानुसार ते सरकारी विमानातही बसले. पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रवासाला परवानगीच देण्यात आली नसल्याचं समोर आलं

नवी दिल्ली - राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यातील वाद दिवसेंदिवस आणखीच वाढताना दिसत आहेत. आता, पुन्हा एकदा राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये नवा वाद उफाळून आला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हवाई प्रवासालाच मुख्यमंत्री कार्यालयानं परवानगी दिली नसल्याने भाजपा नेत्यांनी संताप व्यक्त करायला सुरुवात केलीय. तर, शिवसेनेकडून राज्य सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यपाल कोश्यारी राज्य सरकारच्या विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नाकारण्यात आल्यानं त्यांना विमानातून खाली उतरावे लागले होते. यासंदर्भात भाजपासह रिपाइं (आठवले) यांनीही मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलंय. 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज नियोजित कार्यक्रमानुसार उत्तराखंडसाठी निघणार होते. त्यानुसार ते सरकारी विमानातही बसले. पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रवासाला परवानगीच देण्यात आली नसल्याचं समोर आलं. त्यामुळे राज्यपालांना विमानातून खाली उतरुन पुन्हा खासगी विमानाने डेहरादूनला जावे लागले. त्यामुळे भाजपा नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर टीका केलीय. तर, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सरकारची भूमिका सांगितलीय. आता, केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली असून राज्यपालांचा हा अवमान असल्याचं म्हटलंय. तसेच, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच माफी मागावी, असेही ते म्हणाले. आठवलेंनी दिल्लीतील संसद भवनाबाहेर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मत व्यक्त केलं.  

राज्य सरकारचे वर्तन अतिशय खराब आहे, राज्यपालांना सरकारी विमान वापरण्याचा अधिकार आहे. राज्यपालांचा हा अपमान आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची माफी मागावी, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली. 

नेमकं काय घडलं?

उत्तराखंडमधील मसूरी येथे लालबहादुर शास्त्री अकादमीच्या आयएएस अधिकाऱ्यांच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित राहणार होते, त्यासाठी राज्यपाल सरकारी विमानाने मुंबई विमानतळावरून रवाना होणार होते, तत्पूर्वी सरकारी विमान वापरण्यासाठी राजभवनाकडून रितसर सामान्य विभाग प्रशासनाला परवानगीसाठी कळवण्यात आलं होतं, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत ही परवानगी देण्यात आली नाही. राज्यपालांसह राजभवनाचे अधिकारी १५ मिनिटं विमानात बसून होते, तरीही परवानगी न मिळाल्याने अखेर राज्यपाल विमानातून उतरले, त्यानंतर राज्यपालांसाठी स्पाइस जेटचं व्यावसायिक विमानाची व्यवस्था करण्यात आली, १२.१५ मिनिटांनी त्यांचे विमान देहरादूनसाठी रवाना झालं, डेहरादूनपर्यंत राज्यपाल विमानाने प्रवास करतील, त्यापुढे मसूरीपर्यंत राज्यपाल वाहनाने जातील, आणि उद्या होणाऱ्या कार्यक्रमाला हजेरी लावतील अशी माहिती लोकमत ऑनलाइनच्या सूत्रांनी दिली आहे. 

दरम्यान, या घडलेल्या प्रकाराला जबाबदार कोण याची चर्चा सध्या सुरू आहे, कारण सामान्य प्रशासन विभाग हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अख्यारित येते, तसेच राजशिष्टाचार विभागाची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे आहे, त्यामुळे विरोधकांनी आता सत्ताधारी शिवसेनेला टार्गेट करण्यात सुरुवात केली आहे.

सरकारने राज्यपालांची क्षमा मागावी

सुधीर मुनगंटीवार यांनी "राज्यपालांना विमानातून खाली उतरवण्यातं आलं, जनता सरकारला सत्तेतून खाली उतरवेल" असं म्हणत जोरदार टीकास्त्र सो़डलं आहे. सरकारने राज्यपालांची क्षमा मागावी अशी मागणी देखील मुनगंटीवार यांनी केली आहे. राज्यपालांचं विमान सरकारच्या माध्यमातून नाकारलं असेल तर हे बदनामीकारक आहे. लोकशाही व्यवस्थेत हे घडणं योग्य नाही. सरकारकडून असं घडलं असेल तर त्यांनी क्षमा मागून हा विषय थांबवावा असं म्हटलं आहे.

प्रवीण दरेकर म्हणतात

प्रविण दरेकर म्हणाले, "महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासणारी ही घटना आहे. राज्यपालांच्या विमानाला परवानगी न देऊन सूड भावनेचा परमोच्च बिंदू गाठण्याचं काम महाविकास आघाडी सरकारने  केलं आहे. राज्यपाल या पदाला अवमूल्यन करण्याचं काम सरकारमधील लोक करत आहेत. या पदाची प्रतिमा धुळीला मिळवण्याचं काम काही नेते मंडळी करताहेत" असं म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या सूड भावनेचा अतिरेक झाला आहे. अशा पद्धतीने सूड भावनेने वागलेलं सरकार याआधी महाराष्ट्रात कधीच झालं नसल्याचं म्हणत दरेकरांनी निशाणा साधला आहे. 

हा तर राज्य सरकारच्या बदनामीचा कट

''महाराष्ट्र सरकारने राज्यपालांना एअरक्राफ्ट घेऊन जाण्याची परवानगी दिली नव्हती. त्यामुळे, परवानगी नसताना राज्य सरकारचं विमान घेऊन जाणं, ते विमान उडविण्यापूर्वी त्या विमानातील तांत्रिक बाबींची तपासणी करणे आवश्यक असते, पण तसे न करता विमान उडवणे योग्य नव्हतं. राज्यपालांनी विमानासाठी परवानगी मागितली होती, तरी त्यांना परवानगी देण्यात आली नव्हती. राज्य सरकारचं हे विमान फक्त मुख्यमंत्री आणि आपत्कालीन परिस्थितीतच वापरले जाते. त्यामुळे, राज्यपालांना या विमानाची परवानगी नव्हती, असे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं. राज्यपाल आता स्पाईस जेट विमानाने डेहरादूनला गेले आहेत, जर स्पाईस जेटने ते इच्छित स्थळी गेले असतील, तर यापूर्वीच त्यांनी तिकीट काढून ठेवलं असेल. मग, केवळ राज्य सरकारने विमान नाकारले, असे दाखवून राज्य सरकारला बदनाम करण्याचा हा कट असल्याचा आरोपच राऊत यांनी केलाय. तसेच, भाजपा नेत्यांना नेहमीच राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करायला कारण हवं असतंय, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीairplaneविमानChief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरे