शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

'जय श्री राम'चा नारा मिठी मारून म्हणता येईल, गळा दाबून नाही : मुख्तार अब्बास नक्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 21:22 IST

जारखंडच्या सरायकेलामध्ये बाईक चोरी करण्याच्या संशयातून जमावाने तरबेज नावाच्या युवकाला खांबाला बांधून मारहाण केली होती.

नवी दिल्ली : झारखंडमध्ये जमावाद्वारे युवकाची मारहाण करून हत्या करण्यात आल्यावरून केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी हा घोर अपराध असल्याचे म्हटले आहे. लोकांकडून जय श्री रामचा नारा हा गळ्यात गळे घालून म्हटला जाऊ शकतो, कोणाचा गळा दाबून किंवा चिरून नाही, असे नक्वी यांनी सांगितले. या प्रकरणात जे लोक सहभागी असतील त्यांच्यावर कठोर करवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

जारखंडच्या सरायकेलामध्ये बाईक चोरी करण्याच्या संशयातून जमावाने तरबेज नावाच्या युवकाला खांबाला बांधून मारहाण केली होती. यानंतर तरबेजचा तुरुंगात मृत्यू झाला. पोलिसांच्या तपासामध्ये उघड झाले आहे की, त्याच्याकडून जय श्री रामचे नारे वदवून घेतले होते. पोलिसांनी बेजबाबदारपणा दाखवत त्याला उपचारांशिवाय तुरुंगात पाठविल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

नक्वी यांनी सांगितले की, यंदा दोन लाख भारतीय मुस्लिमांना कोणत्याही सबसिडीशिवाय हज यात्रेला पाठविण्यात येणार आहे. सरकारच्या चांगल्या हेतूमुळे आणि पारदर्शक कारभारामुळे सबसिडीशिवायही हज यात्रेकरूंवर जादा बोजा पडलेला नाही. इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने हज यात्रेकरू जाणार आहेत. सब्सिडीच्या छऴाला मोदी सरकारने चांगल्या हेतूने बंद केले आहे. 

टॅग्स :BJPभाजपा