शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

खासदार निलंबित का? धनखडांनी पवार, खरगेंना पत्र लिहिले, कारण सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 05:46 IST

सभागृहाच्या सन्मानाला धक्का म्हणून कारवाई  : धनखड

- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेस  नेते मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून खासदारांना निलंबित करण्याचे तपशीलवार कारण सांगितले आहे. 

शरद पवार यांनी म्हटले होते की, एखाद्याने दुसऱ्याची मिमिक्री केली तर ती एवढ्या गांभीर्याने घेण्याची गरज नाही. हा एखाद्या जातीचा अपमान कसा असेल? उद्या कोणी माझी मिमिक्री केली तर तो मराठ्यांचा आणि शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे सांगणार का? तसेही हे सर्व सभागृहाच्या बाहेर झालेले आहे.

शरद पवार यांच्या या विधानानंतर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांना ज्येष्ठ खासदार संबोधून म्हटले आहे की, लोकसभेतील सुरक्षा भेदण्याची घटना अभूतपूर्व होती. अशी घटना घडता कामा नये. या घटनेनंतर सभापती सर्व राजकीय पक्षांच्या खासदारांशी संसदेच्या सुरक्षेतील त्रुटी दूर करण्यावर चर्चा करीत होते; परंतु १४ व १५ डिसेंबर रोजी काही खासदारांनी राज्यसभेत ज्या प्रकारे वर्तणूक केली, त्यामुळे राज्यसभेसारख्या वरिष्ठ सभागृहाच्या सन्मानाला धक्का पोहोचला आहे. त्यामुळे काही खासदारांना नाइलाजाने निलंबित करावे लागले आहे.

‘संसदेतील गंभीर चर्चेत ‘जात’ आणणे निराशाजनक’

संसदेतील गंभीर चर्चेदरम्यान जातीचा उल्लेख केला जाणे अत्यंत निराशाजनक असल्याचे सांगून ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी २१ व्या शतकात या संकुचित ओळखीच्या पलीकडे जाण्याचे आवाहन लोकांना केले. एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरील चर्चेदरम्यान जातीचा उल्लेख केला जाणे हे अत्यंत निराशाजनक आहे.

टीका करण्यासाठी जन्मस्थळाचा वापर करणे निराशाजनक आहे. कोणी महात्मा गांधी किंवा सरदार वल्लभभाई पटेल यांची जात किंवा सी. एफ. ॲण्ड्र्यूज किंवा ॲनी बेझंट यांचे जन्मस्थान विचारल्याचे मला  आठवत नाही. २१ व्या शतकात आम्ही हा संकुचित दृष्टिकोन त्यागून मानवतेची मूल्ये, नियम आत्मसात करू शकतो का, असेही ते म्हणाले.

‘आमचेही निलंबन करा म्हणून खासदार मागे लागले’सरकार लोकसभेतील सदस्यांना निलंबित करण्यास इच्छुक नव्हती, परंतु  काही विरोधी सदस्यांच्या विरोधात निलंबनाच्या कारवाईनंतर त्यांच्या काही सहकाऱ्यांनी स्वतःलाही निलंबित करण्याची विनंती केली होती,” असा दावा संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शुक्रवारी केला. जोशी यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, संसदेत मंजूर झालेल्या तीन नवीन फौजदारी कायद्यांविरोधात विरोधकांची काही तक्रार असल्यास ते न्यायालयात जाण्यास मोकळे आहेत. “आम्हाला खासदारांना निलंबित करायचे नव्हते, आम्ही त्यांना विनंती केली होती. मात्र आम्ही काही सदस्यांना निलंबित केल्यावर त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी निलंबनाची मागणी सुरू केली. काँग्रेसची पातळी इतकी खालावली आहे,” अशी टीकाही जोशी यांनी केली.

धनखड अस्वस्थसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केलेल्या आपल्या मिमिक्रीनंतर धनखड अस्वस्थ आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वांनी फोन करून अपमान सहन करण्याबाबत सांगितले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर म्हटले होते की, मी मागील २० वर्षांपासून अपमान सहन करीत आलो आहे.

पत्रात व्यक्त केले दु:खमान्य न होणाऱ्या मागण्या करत सभागृहाचे कामकाज ठप्प करणे दुर्दैवी व जनहिताच्या विरोधात आहे, असे धनखड यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान खरगे यांनी त्यांना (धनखड) भेटण्यास नकार देणे हे संसदीय  परंपरेला धरून नसल्याचेही या पत्रात म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाSharad Pawarशरद पवारMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे