शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

"ओवैसी म्हणजे..., देशाची जनता त्यांना चांगलीच ओळखू लागली"; भर सभेत भाजपा खासदाराची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 10:30 IST

Sakshi Maharaj And Asaduddin Owaisi : साक्षी महाराज यांनी एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार हल्लोबोल करत निशाणा साधला आहे.

उन्नाव - भाजपाचे खासदार साक्षी महाराज हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी लोकप्रिय आहे. पुन्हा एकदा ते आपल्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. साक्षी महाराज यांनी यावेळी एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार हल्लोबोल करत निशाणा साधला आहे. मात्र ओवैसीबाबत बोलताना भाजपा खासदाराची जीभ घसरली आहे. त्यांनी एका कार्यक्रमात ओवैसींना "गंदा जानवर" असं म्हटलं आहे. तसेच त्यांच्या सारख्या लोकांना देशातील जनता चांगलीच ओळखून आहे असं म्हटलं आहे. भाजपा खासदाराच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी महाराज रविवारी एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. येथे उपस्थितांना त्यांनी संबोधित केलं. यावेळी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) च नेते असदुद्दीन ओवैसींवर त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तसेच "अयोध्येत राम मंदिरावर विधान करणारे ओवैसी हैदराबादचे घाणरडं जनावर आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनकाळात मंदिराचं निर्माण सर्वांच्या सहकार्याने होत आहे. ओवैसी रक्ताचे पाट वाहण्याची भाषा करत होते. मात्र मोदीजींच्या शासनकाळात रक्ताचा एकही थेंब न सांडता शांतीपूर्ण पद्धतीनं मंदिर निर्माणाच्या कामाला सुरुवात झाली आहे" असं साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे.

"ओवैसींसारख्या लोकांना देशाची जनता आता चांगलीच ओळखू लागली आहे. त्यांच्या जाळ्यात आता कोणीच फसणार नाही. अयोध्येत मंदिर निर्माणासाठी दोन्ही वर्गाचे लोक शांततेत काम करत आहेत हेच त्यामागचं कारण आहे" असं देखील साक्षी महाराज यांनी कार्यक्रमात म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. ओवैसींनी आपला मोर्चा उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालकडे वळवला आहे. ओवैसी यांनी नुकताच उत्तर प्रदेशचा दौरा केला. तसंच त्यांनी आपल्या समर्थकांची आणि आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांची बैठकही घेतली. यादरम्यान साक्षी महाराज यांनी एक मोठं विधान केलं होतं. "ओवैसी यांनी बिहारमध्ये भाजपाची मदत केली. आता पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातही तसंच होईल," असं ते म्हणाले होते. 

"देव त्यांना ताकद देवो, त्यांची साथ देवो, त्यांनी बिहारमध्ये आम्हाला मदत केली होती. आता ते पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील मदत करतील" असं विधान साक्षी महाराज यांनी केलं आहे. "आम्ही मुस्लिमांचाही विश्वास मिळवत आहोत. गेल्या 65 वर्षांपासून भारतातील मुस्लिमांना तुष्टीकरणाच्या नावाखाली घाबरवण्यात आलं. परंतु आज मुस्लिमांना आपलं हित जाणणारा पक्ष हा भाजपा हे समजून आलं आहे. मोठ्या संख्येने मुस्लीम वर्गही भाजपाशी जोडला जात आहे" असंही ते म्हणाले होते.

"कृषी आंदोलनात प्रदर्शन करणारे भरकटलेले शेतकरी; काहींच्या पोटात दुखतंय, त्यांचा हेतू वेगळाच"

साक्षी महाराजांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. "कृषी कायद्यांचा विरोध नाही हे तर सीएए, एनआरसी, कलम 370 चं दु:ख" असं मंगळवारी आपला वाढदिवस साजरा करत असताना साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे. कृषी आंदोलनात प्रदर्शन करणारे काही भरकटलेले शेतकरी आहेत असं देखील म्हटलं होतं. "दिल्ली सीमेवर कृषी कायद्यांचा विरोध नाही तर सीएए, एनआरसी आणि कलम 370 चं दु:ख बाहेर पडत आहे. कृषी आंदोलनात प्रदर्शन करणारे काही भरकटलेले शेतकरी आहेत. काही लोक तर शेतकरीही नाहीत तर मोठे व्यापारी आहेत. खरे शेतकरी आपापल्या शेतात काम करत आहेत. तुम्हाला शेतकऱ्यांना पाहायचंय तर गंज मुरादाबादमध्ये शेतकरी संमेलन आहे, तुम्ही चला मी दाखवतो. ते कसे शेतात काम करत आहेत. अशाच लोकांच्या पोटात दुखतंय. संपूर्ण देशात फक्त दोन ते तीन ठिकाणी आंदोलन सुरू आहे" असं साक्षी महाराज यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :Sakshi Maharajसाक्षी महाराजAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBJPभाजपाRam Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदी