शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

केंद्रीय विद्यालयातील प्रवेशासाठी खासदार कोटा रद्द; केंद्र सरकारचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 05:47 IST

शिक्षण मंत्री आणि अध्यक्ष यांनी केंद्रीय विद्यालयांच्या कामाची समीक्षा केली. स्थलांतर करणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही प्राथमिकता द्यायला हवी. मात्र, तसे होत नव्हते.

नवी दिल्ली : केंद्रीय विद्यालयातील प्रवेशांसाठी खासदारांच्या कोट्यासह इतर अनेक स्वेच्छाधीन कोटा रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय विद्यालय संघटनेकडून (केव्हीएस) समीक्षेनंतर देशभरात विविध केंद्रीय विद्यालयातील विविध स्वेच्छाधीन कोट्यावर स्थगिती आणल्यानंतर काही आठवड्यांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

देशात १२०० हून अधिक केंद्रीय विद्यालये आहेत. यात १४.३५ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. लोकसभेतील ५४३ आणि राज्यसभेतील २४५ सदस्यांकडून या कोट्याअंतर्गत एका वर्षात प्रवेशासाठी ७८८० पर्यंत शिफारशी करू शकतात. कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांचा पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेंतर्गत केंद्रीय विद्यालयात प्रवेशासाठी विचार केला जाईल.  या कोट्यामुळे एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाचे शाळेतील गणित बिघडविले होते. 

शिक्षण मंत्री आणि अध्यक्ष यांनी केंद्रीय विद्यालयांच्या कामाची समीक्षा केली. स्थलांतर करणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही प्राथमिकता द्यायला हवी. मात्र, तसे होत नव्हते. शिक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांची १०० मुले, संसद सदस्य आणि केंद्रीय विद्यालयातील निवृत्त कर्मचाऱ्यांची मुले, नातू आदींसाठीचा कोटाही रद्द करण्यात आला आहे. ज्या विशेष तरतुदी कायम ठेवण्यात आल्या आहेत त्यानुसार, परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र प्राप्त करणाऱ्यांच्या मुलांना प्रवेश मिळू शकेल. 

खासदार, जिल्हाधिकाऱ्यांना होते अधिकार विशेष तरतुदीनुसार, केंद्रीय विद्यालयात १० मुलांच्या प्रवेशासाठी शिफारस करण्याचे अधिकार खासदारांकडे होते. तर, जिल्हाधिकाऱ्यांकडे १७ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी शिफारस करण्याचे अधिकार होते. हे विशेषाधिकार रद्द केल्याने वर्गातील गर्दी रोखण्यास मदत होईल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी १ एप्रिल २०२२ च्या लोकमतमधील लेखात याच मुद्द्याचा ऊहापोह केला होता.