शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

'नितीश कुमार यांनी घाण शब्द त्यांच्या घरापुरते मर्यादित ठेवले पाहिजे'; नवनीत राणांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 16:58 IST

नितीश कुमार यांनी विधानसभेत केलेल्या विधानावर आता खासदार नवनीत राणा यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे.

लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात विधानसभेत केलेल्या बेताल वक्तव्यानंतर, केवळ बिहारच नव्हे, तर संपूर्ण देशातून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. यानंतर नितीश कुमार यांनी जाहीर माफी मागितली. मी तर केवळ महिलांच्या शिक्षणा संदर्भात बोललो होतो. मी काही चूक बोललो असेल, मी माफी मागतो. जे लोक माझ्यावर टीका करत आहेत, मी त्यांचेही अभिनंदन करतो, असं विधान नितीश कुमार यांनी केलं. 

नितीश कुमार यांनी विधानसभेत केलेल्या विधानावर आता खासदार नवनीत राणा यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. नितीश कुमार यांच्या डोक्यामध्ये किती घाण आहे हे त्यांनी आज बिहारच्या विधानसभेमध्ये बोलून देशवासियांना दाखवलं आहे. ज्या पद्धतीने नितीश कुमार यांनी घाण शब्द बोलले त्यांनी ते त्यांच्या घरापुरते मर्यादित ठेवले पाहिजे होते, असा निशाणा नवनीत राणा यांनी साधला. नितेश कुमार यांचा माफीनामा नको, आम्हाला त्यांचा राजकारणातील राजीनामा हवा आहे, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली. नितीश कुमार यांना राजकीय क्षेत्रात बंदी आणली पाहिजे, अशाप्रकारे जर नितीश कुमार वक्तव्य करत असेल तर बिहारच्या महिलांनी कोणाकडे पाहायचे?, असा सवालही नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे.

भाजपा आमदारांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात-

नितीश यांच्या वक्तव्यावर आमदारांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. भाजपा नेते तारकिशोर प्रसाद म्हणाले की, मुख्यमंत्री हे वेगळ्या पद्धतीने बोलू शकले असते. तर भाजपा आमदार निक्की हेमब्रम म्हणाल्या की, मुख्यमंत्री दुसऱ्या शब्दात समजावून सांगायला हवे होते. स्त्रियांबद्दल त्यांच्या मनात आदर नव्हता.

काय म्हणाले होते नितीश कुमार - 

बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी (७ नोव्हेंबर) चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले होते, "बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली आहे. मुली शिक्षित होत आहेत, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल. हे समजून सांण्यासाठी नितीश कुमारांनी एक विचित्र उदाहरण दिले. ते म्हणाले, लग्न झाल्यावर पुरुष रोज रात्री संबंध ठेवतात, त्यामुळेच मूलं जन्माला येतात. महिला साक्षर असेल, तर ती पुरुषाला नकार देऊ शकते, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल."

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारnavneet kaur ranaनवनीत कौर राणाBiharबिहार