शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गरीब मुलांना फाईव्ह स्टारमध्ये नेऊन मंत्र्यानं साजरी केली दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 11:29 IST

ऐन दिवाळीत मध्य प्रदेशच्या एका मंत्र्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेसचे नेते जीतू पटवारी यांनी खास आणि वेगळ्या शैलीत यंदाची दिवाळी साजरी केली

ठळक मुद्देमध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री जीतू पटवारी यांनी खास शैलीत यंदाची दिवाळी साजरी केली.जीतू पटवारी यांनी अनाथ आणि गरीब मुलांसोबत यंदा दिवाळी साजरी केली.पटवारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

नवी दिल्ली - देशभरात दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. आनंदात आणि मोठ्या उत्साहात सर्वत्र दिवाळी साजरी केली जात आहे. ऐन दिवाळीत मध्य प्रदेशच्या एका मंत्र्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेसचे नेते जीतू पटवारी यांनी खास आणि वेगळ्या शैलीत यंदाची दिवाळी साजरी केली आहे. पटवारी यांनी इंदूरच्या रेडिसन या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गरीब मुलांना जेवायला नेऊन दिवाळी साजरी केली आहे. यामुळे जीतू पटवारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या जीतू पटवारी यांनी अनाथ आणि गरीब मुलांसोबत यंदा दिवाळी साजरी केली आहे. लहान मुलांना घेऊन ते इंदूर येथील रेडिसन या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेले होते. तिथे त्यांनी गरीब आणि अनाथ मुलांना प्रेमाने जेवण भरवले. तसेच छान भेटवस्तूही दिल्या. पटवारी हे दरवर्षी मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन गरीब मुलांसोबत दिवाळी साजरी करतात. यंदाही त्यांनी अशाच पद्धतीने दिवाळी आनंदात साजरी केली आहे. 

जीतू पटवारी यांचा मुलगा हॉस्टलमध्ये राहतो. दिवाळीच्या निमित्ताने मुलांने वडिलांना फोन केला होता आणि दरवर्षी प्रमाणे यंदाही आपण गरीब मुलांसोबत दिवाळी साजरी करणार आहोत का? असा प्रश्न विचारला. त्यावर पटवारी यांनी हो, नक्कीच त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार असल्याचं मुलाला सांगितलं. त्यानंतर ते अनाथ आणि गरीब मुलांना घेऊन फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेले. यानंतर सर्वच स्तरातून पटवारी यांचा भरभरून कौतुक होत आहे. 

मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्यावेळी राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी कंबर कसली होती. त्याच दरम्यान प्रचार करताना काँग्रेसचे जीतू पटवारी  सोशल मीडियावर ट्रोल झाले होते. 'तुम्ही माझी काळजी घ्या, तुम्हाला माझी इज्जत ठेवायची आहे... पार्टी गेली तेल लावत', असे विधान पटवारी यांनी मतदारांशी संवाद साधताना केले. यासंबंधीचा पटवारी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होती. दरम्यान, हा व्हिडीओ स्वतः जीतू यांनी फेसबुकवर शेअर केला होता. या व्हिडीओवरुन नेटीझन्सकडून त्यांना प्रचंड ट्रोल केले. त्यानंतर यासंदर्भात स्पष्टीकरण देत असताना जीतू पटवारी यांनी माझ्या शब्दांचा चुकीच्या पद्घतीनं प्रचार केला जात आहे. क्षेत्रातील वरिष्ठ सदस्यदेखील माझ्या कुटुंबातील सदस्यासमान आहेत. भाजपाकडून माझी प्रतिमा मलिन केली जात असल्याचा आरोप केला होता. तसेच जनसंपर्कावेळी भाजपासाठी मी या शब्दांचा वापर केला होता, असेही त्यांनी सांगितले होते.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशDiwaliदिवाळी