शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

शहीद जवानाच्या कुटुंबाला गावकऱ्यांची स्वातंत्र्यदिनी अनोखी भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 17:48 IST

मध्य प्रदेशातील इंदुरमधील बेटमा खेड्यातील लोकांनी शहिदाच्या कुटुंबासाठी जे केले त्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

नवी दिल्ली: मध्य प्रदेशातील इंदुरमधील बेटमा खेड्यातील लोकांनी शहिदाच्या कुटुंबासाठी जे केले त्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या गावातील रहिवाशांनी एक मोहीम सुरू करत गुरुवारी 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी शहीद जवानाच्या कुटुंबाला नवीन घर भेट स्वरूपात दिले आहे. एएनआयने ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये गावातील रहिवाशांनी अनोख्या पद्धतीनं शहीद मोहन सिंह यांच्या पत्नीचे नवीन घरात स्वागत केले. 

1992 साली आसाममध्ये पोस्टिंगला असताना मोहन सिंह यांना वीरमरण आले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा तीन वर्षांचा होता, तर पत्नी गर्भवती होती. पती शहीद झाल्यानंतर तिने खूप कष्ट करून मुलांचे पालनपोषण करत सांभाळ केला.  तसेच परिस्थिती बिकट असल्याने शहीद जवानाची पत्नी व मुलं एका मातीच्या घरामध्ये राहत होते व त्या घराचे पत्रे देखील तुटलेल्या अवस्थेत होते.  

त्यामुळे या कुटुंबाची परिस्थिती पाहून गावातील रहिवाशांनी कुटुंबाला मदत करण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी 'एक चेक एक सही' अशी मोहीम सुरू करून 11 लाख रुपये जमा केले. तसेच गावातील रहिवाशांनी सांगितले की घर बांधण्यासाठी 10 लाखांचा खर्च झाला आहे आणि 1 लाख रुपये शहीद मोहन सिंग यांचा पुतळा बनविण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान