शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

कर्जबाजारी शेतकऱ्यानं संपवली जीवनयात्रा; कृषीमंत्री म्हणतात, सगळेच करतात की आत्महत्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 12:34 IST

शेतकऱ्याच्या आत्महत्येवर प्रतिक्रिया देताना मध्य प्रदेशच्या कृषी मंत्र्यांनी अत्यंत असंवेदनशील विधान केलं आहे.

भोपाळ- मध्य प्रदेशातील एका शेतकऱ्याने कर्जबाजीपणाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केली आहे. शेतकऱ्याच्या या आत्महत्येवर प्रतिक्रिया देताना मध्य प्रदेशच्या कृषी मंत्र्यांनी अत्यंत असंवेदनशील विधान केलं आहे. शेतकरी आत्महत्या ही जागतिक समस्या आहे, असं विधान मध्य प्रदेशचे कृषी राज्यमंत्री बाळकृष्ण पाटीदार यांनी केलं आहे. बाळकृष्णा पाटीदार यांच्या विधानाचा शेतकऱ्यांकडू तीव्र निषेध केला जातो आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

प्रदेशच्या सूखा गावात राहणाऱ्या लक्षण काची (वय 45) या शेतकऱ्याने शुक्रवारी विष पिऊन आत्महत्या केली. या शेतकऱ्याच्या डोक्यावर 50 हजार रुपये कर्ज होतं. गेल्यावर्षी खरीप पिकं खराब झाल्याने उत्पन्न मिळालं नाही त्यामुळे कर्जाचा बोजा सावरण्याचा प्रश्न शेतकऱ्यासमोर होता. दुष्काळामुळे रब्बीची पेरणीही करता आली नाही, अशी माहिती शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

लक्षण काची यांच्या आत्महत्येनंतर इंदूरमधील पत्रकारांनी मध्य प्रदेशात इतक्या शेतकरी आत्महत्यांची नोंद का होते आहे? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी हे धक्कादायक उत्तर दिलं आहे. 'व्यावसायिक, आयएएस-आयपीएस अधिकारी, पोलीस, सर्वसामान्य, प्रत्येक क्षेत्रातील लोक आत्महत्येच पाऊल उचलतात. हे सगळीकडेच घडतं', असं पाटीदार म्हणाले, 

कृषी राज्यमंत्री बाळकृष्ण पाटीदार यांच्या या वक्तव्याचा शेतकऱ्यांकडून तीव्र शब्दात निषेध केला जातो आहे. राष्ट्रीय किसान मजदूर संघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा यांनीही पाटीदार यांच्या वक्तव्याचा निषेध केला. शेतकऱ्यांचे मित्र असल्याचा दिखावा करणाऱ्या भाजपाचा हा खरा चेहरा आहे,अशी टीका भारतीय किसान युनियनचे राज्यसचिव अनिल यादव यांनी केली आहे.