शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

“देशात विष पेरायचे काम काँग्रेसचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी तर विष पचवणारे नीळकंठ महादेव”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 19:37 IST

CM Shivraj Singh Chouhan: कर्नाटकला एसएमएसपासून वाचवावे लागेल. एसएमएस म्हणजे सिद्धरामय्या, मल्लिकार्जुन खर्गे आणि शिवकुमार, अशी टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली.

CM Shivraj Singh Chouhan: एकीकडे कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे काँग्रेस आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना दिसत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला भाजप नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. देशात विष पेरायचे, पसरवायचे काम काँग्रेसने केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी तर विष पचवणारे नीळकंठ महादेव आहेत, असा पलटवार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. 

काँग्रेस विषकुंभ झाली आहे, ते सातत्याने पंतप्रधानांबद्दल विष पसरवत राहते, कधी मोदींना मौत का सौदागर म्हणतात, कोणी म्हणते सर्व मोदी चोर आहेत, कोणी म्हणते मोदीजी साप आहेत, खरे तर सत्ता हातातून गेल्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या अस्वस्थतेतून काँग्रेसकडून विषारी विधाने करण्यात येत आहेत. पण मोदीजी हे विष पिणारे नीळकंठ अर्थात महादेव आहेत, असे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बेंगळुरूमध्ये काँग्रेसवर निशाणा साधला.

कर्नाटकला एसएमएसपासून वाचवावे लागेल

पुढे बोलताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, कर्नाटकला एसएमएसपासून वाचवावे लागेल. एसएमएस म्हणजे सिद्धरामय्या, मल्लिकार्जुन खर्गे आणि शिवकुमार. एखादा करप्ट मेसेज मोबाईल खराब करतो, त्याचप्रमाणे हा भ्रष्ट एसएमएस कर्नाटकचे भविष्य खराब करेल. एसएमएस कर्नाटकच्या विकासासाठी धोकादायक, डबल इंजिन सरकारच कर्नाटकला वाचवू शकते. पंतप्रधान मोदीजी हे साप नाहीत, ते देशाचा श्वास आणि लोकांची आस आहेत. लोकांचा विश्वास आहे. ज्याप्रमाणे ऑक्सिजन संपूर्ण शरीराला जीवन देतो आणि उर्जेने भरतो, त्याचप्रमाणे मोदीजींनी देशाला नवसंजीवनी दिली आहे, असे कौतुकोद्गार शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी बोलताना काढले. 

दरम्यान, काँग्रेसने केलेल्या टीकेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खरपूस शब्दांत समाचार घेतला. सामान्य माणसाबद्दल बोलणाऱ्या, त्यांचा भ्रष्टाचार उघड करणाऱ्या, त्यांच्या स्वार्थी राजकारणावर हल्ला करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा काँग्रेस तिरस्कार करते. या निवडणुकीतही काँग्रेसने मला पुन्हा शिवीगाळ सुरू केली आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या लोकांनी मला ९१ वेळा वेगवेगळ्या प्रकारे शिवीगाळ केली आहे. या शिव्यांच्या शब्दकोशात वेळ वाया घालवण्या ऐवजी काँग्रेसने सुशासनात एवढी मेहनत घेतली असती, तर त्यांची अवस्था इतकी दयनीय झाली नसती, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान