शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जेलमधून निवडणूक लढली, २ लाख मतांनी जिंकले; ६ महिने खासदार, अद्याप PA मिळाला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 20:50 IST

जर कामच करायला द्यायचे नव्हते मग निवडणुकीत लढायला तरी का दिले असा संतप्त सवाल अमृतपाल यांच्या वडिलांनी विचारला. 

अमृतपाल खासदार होऊन ६ महिने झाले परंतु अद्याप कुठला अधिकार मिळाला नाही. खासदाराकडे ५ कोटींचा फंड असतो परंतु त्यातला एक रुपयाही खर्च करता आला नाही. ४-५ महिन्यापासून फक्त अर्ज देत आहेत. कमीत कमी १ स्वीय सहाय्यक नियुक्त केला असता जो खासदाराकडे येणाऱ्या लोकांच्या समस्या जाणून घेईल परंतु तेदेखील झाले नाही. पंजाबच्या खडूर साहिब जागेवरून खासदार असलेले अमृतपाल सिंग यांचे वडील तरसेम सिंह सरकारवर नाराज आहेत.

वारिस पंजाबचे प्रमुख अमृतपाल आसामच्या डिब्रूगड येथील जेलमध्ये आहेत. जेलमध्ये असताना त्यांनी लोकसभेची निवडणूक लढली आणि जवळपास २ लाख मतांनी ते निवडून आले. खासदार बनल्यानंतर ना अमृतपाल यांची जेलमधून सुटका झाली, ना त्यांना कुणी प्रतिनिधी निवडता आला, ना खासदार म्हणून काही काम करता आले यामुळे वडील तरसेम सिंग संतापले आहेत. सरकार जाणुनबुजून अमृतपाल यांना काम करण्यापासून रोखत आहे. त्यांच्या सहीचे पत्र संसदेत पाठवले जात नाहीत. कुठल्याही विभागाकडे त्यांची पत्रे दिली जात नाहीत असा आरोप वडिलांनी केला.

२३ फेब्रुवारी २०२३ रोजी वारिस पंजाब दे संघटनेने हजारोंचा मोर्चा काढून अमृतसर येथील अजनाला पोलीस ठाण्यावर हल्ला केला. या आंदोलनाचे नेतृत्व अमृतपाल सिंग करत होते. १८ मार्चला अमृतपाल घर सोडून फरार झाले. तपास यंत्रणेने १ महिना शोध घेऊन २३ एप्रिलला अमृतपाल यांना अटक केली. तेव्हापासून ते जेलमध्ये बंद आहेत. लोकसभा निवडणुकीत अमृतपाल यांनी अपक्ष निवडणूक लढवली त्यात ते जिंकून आले. ५ जुलै २०२४ रोजी खासदारकीची शपथ घेण्यासाठी अमृतपाल यांना संसदेत आणलं गेले होते. अमृतपाल स्वत:ला खलिस्तान समर्थक सांगतात. 

आठवड्यातून दोनदा खासदारांशी चर्चा

अमृतपाल लोकांची समस्या कशी सोडवतात असा प्रश्न वडिलांना विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले की, अमृतपाल यांच्याशी आठवड्यातून दोनदा फोनवरून संपर्क साधला जातो. आम्ही कुटुंबातले आहोत म्हणून बोलण्याची परवानगी आहे. मतदारसंघातील लोक आमच्याकडे येतात. दिवसाला १५-२० लोक भेटतात. आम्ही लोकांना भेटतो परंतु त्यांची कामे करू शकत नाही. जाणुनबुजून लोकांना आमच्यापासून दूर केले जात आहे. अमृतपाल याने कुठलेही काम करू नये असं सरकारला वाटतंय त्यामुळे लोक नाराज होतील. जर कामच करायला द्यायचे नव्हते मग निवडणुकीत लढायला तरी का दिले असा संतप्त सवाल अमृतपाल यांच्या वडिलांनी विचारला. 

दरम्यान, जेलमधून निवडणूक लढवून जिंकणारे इंजिनिअर राशीद यांना सुविधा मिळतात पण अमृतपाल यांना नाही. काश्मीरच्या बारामुला येथील खासदार राशीद हे अमृतपाल यांच्यासारखेच अपक्ष निवडून आलेत. प्रोटोकॉलनुसार राशीद यांना सुविधा मिळत आहेत. त्यांनी खासगी सचिव नियुक्त केला आहे. परंतु अमृतपाल यांना अद्याप सुविधा दिली नाही असा आरोप अमृतपाल यांचे वकील हरजोत सिंग यांनी केला आहे.  

टॅग्स :lok sabhaलोकसभा