शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

जेलमधून निवडणूक लढली, २ लाख मतांनी जिंकले; ६ महिने खासदार, अद्याप PA मिळाला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 20:50 IST

जर कामच करायला द्यायचे नव्हते मग निवडणुकीत लढायला तरी का दिले असा संतप्त सवाल अमृतपाल यांच्या वडिलांनी विचारला. 

अमृतपाल खासदार होऊन ६ महिने झाले परंतु अद्याप कुठला अधिकार मिळाला नाही. खासदाराकडे ५ कोटींचा फंड असतो परंतु त्यातला एक रुपयाही खर्च करता आला नाही. ४-५ महिन्यापासून फक्त अर्ज देत आहेत. कमीत कमी १ स्वीय सहाय्यक नियुक्त केला असता जो खासदाराकडे येणाऱ्या लोकांच्या समस्या जाणून घेईल परंतु तेदेखील झाले नाही. पंजाबच्या खडूर साहिब जागेवरून खासदार असलेले अमृतपाल सिंग यांचे वडील तरसेम सिंह सरकारवर नाराज आहेत.

वारिस पंजाबचे प्रमुख अमृतपाल आसामच्या डिब्रूगड येथील जेलमध्ये आहेत. जेलमध्ये असताना त्यांनी लोकसभेची निवडणूक लढली आणि जवळपास २ लाख मतांनी ते निवडून आले. खासदार बनल्यानंतर ना अमृतपाल यांची जेलमधून सुटका झाली, ना त्यांना कुणी प्रतिनिधी निवडता आला, ना खासदार म्हणून काही काम करता आले यामुळे वडील तरसेम सिंग संतापले आहेत. सरकार जाणुनबुजून अमृतपाल यांना काम करण्यापासून रोखत आहे. त्यांच्या सहीचे पत्र संसदेत पाठवले जात नाहीत. कुठल्याही विभागाकडे त्यांची पत्रे दिली जात नाहीत असा आरोप वडिलांनी केला.

२३ फेब्रुवारी २०२३ रोजी वारिस पंजाब दे संघटनेने हजारोंचा मोर्चा काढून अमृतसर येथील अजनाला पोलीस ठाण्यावर हल्ला केला. या आंदोलनाचे नेतृत्व अमृतपाल सिंग करत होते. १८ मार्चला अमृतपाल घर सोडून फरार झाले. तपास यंत्रणेने १ महिना शोध घेऊन २३ एप्रिलला अमृतपाल यांना अटक केली. तेव्हापासून ते जेलमध्ये बंद आहेत. लोकसभा निवडणुकीत अमृतपाल यांनी अपक्ष निवडणूक लढवली त्यात ते जिंकून आले. ५ जुलै २०२४ रोजी खासदारकीची शपथ घेण्यासाठी अमृतपाल यांना संसदेत आणलं गेले होते. अमृतपाल स्वत:ला खलिस्तान समर्थक सांगतात. 

आठवड्यातून दोनदा खासदारांशी चर्चा

अमृतपाल लोकांची समस्या कशी सोडवतात असा प्रश्न वडिलांना विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले की, अमृतपाल यांच्याशी आठवड्यातून दोनदा फोनवरून संपर्क साधला जातो. आम्ही कुटुंबातले आहोत म्हणून बोलण्याची परवानगी आहे. मतदारसंघातील लोक आमच्याकडे येतात. दिवसाला १५-२० लोक भेटतात. आम्ही लोकांना भेटतो परंतु त्यांची कामे करू शकत नाही. जाणुनबुजून लोकांना आमच्यापासून दूर केले जात आहे. अमृतपाल याने कुठलेही काम करू नये असं सरकारला वाटतंय त्यामुळे लोक नाराज होतील. जर कामच करायला द्यायचे नव्हते मग निवडणुकीत लढायला तरी का दिले असा संतप्त सवाल अमृतपाल यांच्या वडिलांनी विचारला. 

दरम्यान, जेलमधून निवडणूक लढवून जिंकणारे इंजिनिअर राशीद यांना सुविधा मिळतात पण अमृतपाल यांना नाही. काश्मीरच्या बारामुला येथील खासदार राशीद हे अमृतपाल यांच्यासारखेच अपक्ष निवडून आलेत. प्रोटोकॉलनुसार राशीद यांना सुविधा मिळत आहेत. त्यांनी खासगी सचिव नियुक्त केला आहे. परंतु अमृतपाल यांना अद्याप सुविधा दिली नाही असा आरोप अमृतपाल यांचे वकील हरजोत सिंग यांनी केला आहे.  

टॅग्स :lok sabhaलोकसभा