शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

आता अल्पवयीन मुलानं गाडी चालवल्यास मालकाला होणार तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 10:34 IST

रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकारनं मोटर वाहन(संशोधन) विधेयक 2019ला मंजुरी दिली आहे.

नवी दिल्लीः रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकारनं मोटर वाहन(संशोधन) विधेयक 2019ला मंजुरी दिली आहे. राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानं आता वाहन चालकांना या जाचक नियमांचा सामना करावा लागणार आहे. या नव्या दुरुस्ती विधेयकानुसार रस्ते वाहतुकीचे नियम मोडल्यास कठोर दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे.  रस्त्यावर गाडी चालवताना थोडीशी चूक झाल्यास आपल्याला मोठा दंड भरावा लागणार आहे. राज्यसभेत काल या विधेयकावर चर्चा करण्यात आली, त्यानंतर या विधेयकावर मतदान घेण्यात आलं असून, विधेयकाच्या बाजूनं 108 मतं, तर विधेयकाच्या विरोधात फक्त 13 मतं पडल्यानं ते पारित झालं आहे. 23 जुलै रोजी लोकसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाली होती.या नव्या कायद्यानुसार एखाद्या अल्पवयीन मुलाला गाडी चालवताना वाहतूक पोलिसांनी पकडल्यास वाहनाच्या मालकांला तुरुंगवास ठोठावला जाणार आहे. त्या गाडीच्या मालकाला 25 हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास ठोठावला जाणार आहे. तसेच अल्पवयीन मुलाला आता वय वर्षं 25 झाल्याशिवाय परवाना मिळणार नाही. वाहनाची नोंदणीही रद्द करण्यात येणार आहे. त्या अल्पवयीन मुलाविरोधात किशोरवयीन न्याय ऍक्ट 2000अंतर्गत खटला चालणार आहे. या विधेयकानुसार 4 वर्षांहून अधिक वय असलेल्या लहानग्यांनाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. 

बेदरकारपणेगाडी चालवणं किंवा हेल्मेटशिवाय गाडी चालवणं, सीट बेल्ट न बांधणं आणि दारूच्या नशेत गाडी चालवण्यासारख्या नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर दंड भरावा लागणार आहे. ही दंडाची रक्कम पाहून भल्याभल्यांची भंबेरी उडाल्याशिवाय राहणार नाही.दारू पिऊन गाडी चालवल्यास आतापर्यंत दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला जात होता. आता त्यासाठी 10 हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांकडून हजार रुपयांचा दंड वसूल केला जात होता, आता तो हजार रुपयांचा दंड 5 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. परवान्याशिवाय गाडी चालवल्यास आधी 500 रुपये दंड दिला जात होता. आता तोच दंड 5 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच सीट बेल्ट न वापरल्यास मोठा भुर्दंड द्यावा लागणार आहे. सीट बेल्ट लावलेला नसल्यास आधी 100 रुपये दंड द्यावा लागत होता.आता तोच दंड एक हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. गाडी चालवताना फोनवर बोलणंही आता महागात पडू शकते. गाडी चालवत असताना फोनवर बोलल्यास आधी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला जात होता. तोच आता वाढवून 5 हजार रुपये करण्यात आला आहे. तसेच हिट अँड रन प्रकरणात जर कोणत्याही पीडितेचा मृत्यू झाल्यास आधी 25 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी लागत होती. परंतु आता तीच भरपाईची रक्कम दोन लाख रुपये करण्यात आली आहे. हिट अँड रन प्रकरणात आपल्या गाडीच्या अपघातात एखादी व्यक्ती जखमी झाल्यास 50 हजार रुपयांपर्यंत दंड द्यावा लागणार आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसNitin Gadkariनितीन गडकरी