शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

5 मुलांची आई 4 मुलांच्या बापासोबत पळाली अन्...! महिलेचा नवरा विकतो वडा पाव, असं जुळलं सूत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 14:32 IST

घरातून पळून गेलेल्या गीताला एकूण पाच मुले आहेत, यात चार मुली आणि एक मुलगा आहे...

उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महरिया गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका जोडप्याने आपल्या जोडीदाराला आणि एकूण ९ मुलांना सोडून पळून जाऊन लग्न केले आहे. महत्वाचे म्हणजे, दोन्ही कुटुंबांना फेसबुक पोस्टच्या माध्यमाने या त्यांच्या लग्नाची माहिती मिळाली. संबंधित महिलेला ५ मुले आहेत, तर संबंधित पुरूष ४ मुलांचा बाप आहे. 

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महरिया गावातील या नव-विवाहित जोडप्यांने त्यांचे कुटुंब आणि मुले आदी सोडून पळून जाऊन लग्न केले. महरिया गावातील रहिवासी गीता ही आठवडाभरापूर्वी येथीलच गोपाल नावाच्या व्यक्तीसोबत पळून गेली होती आणि दोघांनीही लग्न केले. ५ एप्रिल रोजी गावकऱ्यांनी गोपालच्या फेसबुक अकाउंटवर गीता आणि त्याच्या लग्नाचे काही फोटो पाहिले. हे फोटो स्वतः गोपालनेच शेअर केले होते. यानंतर गावकऱ्यांनी लगेचच गीताचा पती श्रीचंद आणि गोपालच्या पत्नीला यासंदर्भात माहिती दिली.

मुंबईत वडापाव विकतो गीताचा नवरा -घरातून पळून गेलेल्या गीताला एकूण पाच मुले आहेत, यात चार मुली आणि एक मुलगा आहे. गीताची मोठी मुलगी १९ वर्षांची आहे, तर सर्वात लहान मुलगी पाच वर्षांची आहे. यासंदर्भात बोलताना गीताचा नवरा श्रीचंद म्हणाला की, तो मुंबईत वडा पाव विकतो. गेल्या काही दिवसांपासून तो घरीच छोटे मोठे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याची पत्नी गोपालच्या घरी बऱ्याच वेळा ये-जा करत होती. दरम्यान, दोघांचे सूत कसे जुळले आणि ते कसे पळून गेले यासंदर्भात आपल्याला काहीच माहीत नाही.

गीता दागिने आणि पैसे घेऊन पळाली - श्रीचंद पुढे म्हणाला, त्यांची पत्नी मोठ्या कष्टाने वाचवलेले ९० हजार रुपये आणि घरातील सर्व दागिने घेऊन पळून गेली. घडलेल्या घटनेची माहिती आपल्याला फेसबुकच्या माध्यमाने समजली. आपण तेव्हापासून पोलीस ठाण्यात चकरा मारत आहोत. मात्र, पोलीस मदत करत नाहीत. यासंदर्भात पोलिसांनी कारवाई करावी. जेणेकरून आपल्या कुटुंबाला न्याय मिळेल.

गोपाल पत्नीला मारहाण करायचा - यासंदर्भात बोलताना गोपालची पत्नी म्हणाली, गोपाळ कुटुंबाच्या खर्चासाठी काहीही देत ​​नव्हता, उलट रोज आपल्याला मारहाण करायचा. त्याने जेथे आहे, तेथेच रहावे. तिला मुलांच्या पालन पोषणासाठी वाटा मिळावा. तसेच गोपालने मुलांचा खर्चही उचलायला हवा. 

यासंदर्भात बोलताना, सिद्धार्थ नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अनुज सिंह म्हणाले, आपल्याला या घटनेची माहिती आहे, मात्र अद्याप कुठलीही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास कारवाई केली जाईल.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिस