शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

5 मुलांची आई 4 मुलांच्या बापासोबत पळाली अन्...! महिलेचा नवरा विकतो वडा पाव, असं जुळलं सूत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 14:32 IST

घरातून पळून गेलेल्या गीताला एकूण पाच मुले आहेत, यात चार मुली आणि एक मुलगा आहे...

उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महरिया गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका जोडप्याने आपल्या जोडीदाराला आणि एकूण ९ मुलांना सोडून पळून जाऊन लग्न केले आहे. महत्वाचे म्हणजे, दोन्ही कुटुंबांना फेसबुक पोस्टच्या माध्यमाने या त्यांच्या लग्नाची माहिती मिळाली. संबंधित महिलेला ५ मुले आहेत, तर संबंधित पुरूष ४ मुलांचा बाप आहे. 

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महरिया गावातील या नव-विवाहित जोडप्यांने त्यांचे कुटुंब आणि मुले आदी सोडून पळून जाऊन लग्न केले. महरिया गावातील रहिवासी गीता ही आठवडाभरापूर्वी येथीलच गोपाल नावाच्या व्यक्तीसोबत पळून गेली होती आणि दोघांनीही लग्न केले. ५ एप्रिल रोजी गावकऱ्यांनी गोपालच्या फेसबुक अकाउंटवर गीता आणि त्याच्या लग्नाचे काही फोटो पाहिले. हे फोटो स्वतः गोपालनेच शेअर केले होते. यानंतर गावकऱ्यांनी लगेचच गीताचा पती श्रीचंद आणि गोपालच्या पत्नीला यासंदर्भात माहिती दिली.

मुंबईत वडापाव विकतो गीताचा नवरा -घरातून पळून गेलेल्या गीताला एकूण पाच मुले आहेत, यात चार मुली आणि एक मुलगा आहे. गीताची मोठी मुलगी १९ वर्षांची आहे, तर सर्वात लहान मुलगी पाच वर्षांची आहे. यासंदर्भात बोलताना गीताचा नवरा श्रीचंद म्हणाला की, तो मुंबईत वडा पाव विकतो. गेल्या काही दिवसांपासून तो घरीच छोटे मोठे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याची पत्नी गोपालच्या घरी बऱ्याच वेळा ये-जा करत होती. दरम्यान, दोघांचे सूत कसे जुळले आणि ते कसे पळून गेले यासंदर्भात आपल्याला काहीच माहीत नाही.

गीता दागिने आणि पैसे घेऊन पळाली - श्रीचंद पुढे म्हणाला, त्यांची पत्नी मोठ्या कष्टाने वाचवलेले ९० हजार रुपये आणि घरातील सर्व दागिने घेऊन पळून गेली. घडलेल्या घटनेची माहिती आपल्याला फेसबुकच्या माध्यमाने समजली. आपण तेव्हापासून पोलीस ठाण्यात चकरा मारत आहोत. मात्र, पोलीस मदत करत नाहीत. यासंदर्भात पोलिसांनी कारवाई करावी. जेणेकरून आपल्या कुटुंबाला न्याय मिळेल.

गोपाल पत्नीला मारहाण करायचा - यासंदर्भात बोलताना गोपालची पत्नी म्हणाली, गोपाळ कुटुंबाच्या खर्चासाठी काहीही देत ​​नव्हता, उलट रोज आपल्याला मारहाण करायचा. त्याने जेथे आहे, तेथेच रहावे. तिला मुलांच्या पालन पोषणासाठी वाटा मिळावा. तसेच गोपालने मुलांचा खर्चही उचलायला हवा. 

यासंदर्भात बोलताना, सिद्धार्थ नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अनुज सिंह म्हणाले, आपल्याला या घटनेची माहिती आहे, मात्र अद्याप कुठलीही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास कारवाई केली जाईल.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिस