शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्ष आई स्मशानभूमीत राहतेय; मुलाच्या अंत्यसंस्कारानंतर घरीच परतली नाही, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 15:27 IST

३ डिसेंबर २००८ रोजी २२ वर्षीय मुलगा इंद्र रस्ते अपघातात बळी पडला. सीकरच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. परंतु उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला

आईचं मुलावर असलेले प्रेम या जगात कुणीही शब्दात मांडू शकत नाही. आई-मुलाचं नातं हे मुलाच्या जन्माआधी ९ महिन्यापासून जुळालेले असते. आई कधीही आपल्याला मुलापासून लांब जात नाही. अशीच एक आई-मुलाच्या प्रेमाची ह्द्रयद्रावक कहानी आहे. जी ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. मुलाच्या मृत्यूनंतरही तब्बल १५ वर्ष आई त्याच्यासोबत राहतेय. त्याला वेगळं करत नाही. ज्याठिकाणी मुलावर अंत्यसंस्कार झाले. त्याच स्मशानभूमीला आईनं घर बनवलं आहे.

राजस्थानच्या सीकर येथील धर्माणा मोक्षधाम येथील ही घटना आहे. जेव्हा याठिकाणी एका वृत्तपत्राची टीम पोहचली तेव्हा तिथे अंत्यसंस्काराची तयारी सुरु होती. पुरुषांच्या गर्दीत एक महिला दिसून आली. ती महिला कधी लोकांना पिण्यास पाणी देत होती तर कधी अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना लाकडं गोळा करण्यास मदत करत होती. मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर महिला तिथून निघून गेली. स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना या महिलेबाबत विचारणा केली तेव्हा या महिलेचं नाव राज कंवर असल्याचं कळालं. ती स्मशानतच राहते असं सांगण्यात आले.

टीमनं आसपास पाहणी केली तेव्हा ६५ वर्षीय राज कंवर या एका झाडाची फुलं तोडताना दिसली. पथकानं कॅमेरा काढून तिला शूट करण्याचा प्रयत्न केल्यावर ती रागावली. त्यानंतर कॅमेरा बाजूला ठेवल्यानंतर तिने तिच्या कमरेला लावलेल्या थैलीतून काही कागदं आणि वृत्तपत्राची कात्रणं बाहेर काढली आणि ती दाखवली. माझ्या मुलाला आजपर्यंत न्याय मिळाला नाही. जग त्याला विसरुन गेले. तोही मला विसरला. परंतु मी त्याला कसं विसरु? त्यानंतर अंत्यसंस्कार करणाऱ्या जागेकडे दाखवत ती म्हणाली, इथेच माझा मुलगा झोपलाय, माझा इंदर..

राज कंवर यांनी सांगितले की, ३ डिसेंबर २००८ रोजी २२ वर्षीय मुलगा इंद्र रस्ते अपघातात बळी पडला. सीकरच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. परंतु उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. मी माझ्या मुलाचा अखेरचा चेहराही पाहू शकली नाही. मृतदेह शिवधाम धर्माणा येथे आणला. माझ्याशिवाय त्याचं कुणीही नव्हतं आणि मलाही त्याच्याशिवाय कुणाचा आधार नव्हता. मीच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. मुलावर अंत्यसंस्कार करुन त्याच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी हरिद्वारला गेले त्यानंतर इथं परतले. १२ दिवस कुणी काही बोललं नाही. त्यानंतर महिलेचे स्मशानात काय काम? असा विचारलं जाऊ लागलं.

तेव्हा माझ्या आयुष्याची पुंजी स्मशानात आहे. मी कसं सोडून जाऊ? असं मी म्हणत होते, काही वर्षांनी लोकांची बोलणी बंद झाली. स्मशानभूमीच माझ्यासाठी घर बनलं. राज कंवर सीकरच्या राहणाऱ्या आहेत. त्यांचा भाऊ वहिणी आणि कुटुंब राजश्री सिनेमाजवळ राहते. राज कंवरचं लग्न मंडावा येथे झालं होतं. पतीचा मुंबईत मृत्यू झाल्यानंतर तिने सासर सोडलं. एकुलत्या एक मुलाला घेऊन माहेरी आली. आई गेल्यानंतर राज कंवरनेच तिच्या मुलाला सांभाळ केला. तो इलेक्ट्रिनिक दुकानात कामाला होता. दोघंही आनंदात आयुष्य जगत होते मात्र या कुटुंबावर काळाने घाला घातला. ३ डिसेंबर २००८ रोजी एका अपघातानं राज कंवरकडून तिचं सर्वकाही हिरावून घेतले.

माझ्या मुलाची हत्या झालीय, आईचा दावा

मला हॉस्पिटलमध्ये मुलाचा चेहराही पाहायला मिळाला नाही. मालकासोबत सामान घेऊन येत असताना बाईकवरुन पडल्याचं लोकं सांगतात. परंतु तो पडला नाही त्याची हत्या झालीय. शेवटचं मुलाचं तोंडदेखील मला दाखवलं नाही. पोस्टमोर्टममध्ये त्याच्या डोक्यावर साडे चार इंचाची मोठी जखम होती. डॉक्टर बोलले तो ८ तास जिवंत होता असं राज कंवर यांनी सांगितले.

टॅग्स :Rajasthanराजस्थान