शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

भारतातील बहुतांश सेक्युलर हे हिंदू विरोधक - तस्लिमा नसरीन

By admin | Updated: October 17, 2015 14:47 IST

भारतातील बहुतांश सेक्युलर मुस्लिम समर्थक असून ते हिंदू विरोधक आहेत, असे विधान तस्लिमा नसरीन यांनी केले. हिंदूंच्या कामांवर कडाडून टीका करणारे सेक्युलर कट्टर मुस्लिमांचा बचाव करतात असे त्या म्हणाल्या.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - भारतातील बहुतांश सेक्युलर मुस्लिम समर्थक असून ते हिंदू विरोधक आहेत, असे विधान प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले आहे.  एकीकडे हिंदूंच्या कामांवर कडाडून टीका करणारे हेच लोक कट्टर मुस्लिमांच्या कृत्यांचा मात्र बचाव करतात असे त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटले. यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य करतानाच दादरीसारख्या घटनांमुळे देशातील असहिष्णूता वाढत असल्याची भीती व्यक्त केली.
मुस्लिम किंवा अल्पसंख्यांकाविरोधातील हिसांचाराबद्दल पंतप्रधानांनी आणखी आस्थेने बोलण्याची गरज वाटते का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता राजकीय नेते मतांच्या राजकारणांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करतात, अशी टीका त्यांना केली. मुस्लिमांना झुकते माप दिल्याने हिंदू नाराज होतात. अनेकवेळा मुस्लिमांवर पूर्वग्रहामुळे अन्याय होतो, हे खरे असले तरी हाच प्रकार इतर धर्मियांबाबतीतही होतो. २०१३ साली पश्चिम बंगालमधील एका हिंदू गावातील घरे मुस्लिमांनी पेटवल्याचे त्यांनी नमूद केले. जर भारतात मुस्लिमांवर अनन्वित अत्याचार झाले असते, त्यांचा छळ झाला असता तर ते भारत सोडून बांग्लादेश किंवा पाकिस्तानसारख्या मुस्लिम राष्ट्रांत गेले असते, असेही त्या म्हणाल्या.  
देशभरातील वाढत्या असहिष्णूततेच्या विरोधात निषेधाच सूर आळवत पुरस्कार परत करणा-या साहित्यिकांची कृती योग्य असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र कधी कधी हे साहित्यिक दुटप्पी भूमिका घेतात अशी टीकाही त्यांनी केली. अन्यायाविरोधात पुरस्कार परत करण्याचा विचार एखादी व्यक्ती मांडते आणि इतर साहित्यिक ती उचलून धरत त्याच मार्गावर चालतात, याच काहीच गैर नाही. पण मतभेद उदभवल्यावर अनेक जण दुटप्पी भूमिका घेतात, असे तस्लिमा यांनी म्हटले आहे. 
जेव्हा माझ्या पुस्तकावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली, भारतात माझ्याविरोधात पाच फतवे काढण्यात आले, मला राज्याबाहेर काढण्यात आलं, एवढचं नव्हे तर दिल्लीत मला घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं, भारताबाहेर जाण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला तेव्हा बहुतेक साहित्यिकांनी चकार शब्दही उच्चारला नाही. उलट सुनील गांगुली आणि शशांक घोष यांच्यासारख्या प्रसिद्ध लेखकांनी तत्कालिन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्याकडे धाव घेऊन माझ्या पुस्तकांवर बंदी घालण्याची मागणी केली, अशी व्यथाही नसरीन यांनी मांडली.