शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
3
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
4
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
5
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
6
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
7
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
8
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
9
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
10
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
11
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
12
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
13
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
14
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
15
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
16
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
17
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
18
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
19
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
20
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश

भारतातील बहुतांश सेक्युलर हे हिंदू विरोधक - तस्लिमा नसरीन

By admin | Updated: October 17, 2015 14:47 IST

भारतातील बहुतांश सेक्युलर मुस्लिम समर्थक असून ते हिंदू विरोधक आहेत, असे विधान तस्लिमा नसरीन यांनी केले. हिंदूंच्या कामांवर कडाडून टीका करणारे सेक्युलर कट्टर मुस्लिमांचा बचाव करतात असे त्या म्हणाल्या.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - भारतातील बहुतांश सेक्युलर मुस्लिम समर्थक असून ते हिंदू विरोधक आहेत, असे विधान प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले आहे.  एकीकडे हिंदूंच्या कामांवर कडाडून टीका करणारे हेच लोक कट्टर मुस्लिमांच्या कृत्यांचा मात्र बचाव करतात असे त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटले. यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य करतानाच दादरीसारख्या घटनांमुळे देशातील असहिष्णूता वाढत असल्याची भीती व्यक्त केली.
मुस्लिम किंवा अल्पसंख्यांकाविरोधातील हिसांचाराबद्दल पंतप्रधानांनी आणखी आस्थेने बोलण्याची गरज वाटते का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता राजकीय नेते मतांच्या राजकारणांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करतात, अशी टीका त्यांना केली. मुस्लिमांना झुकते माप दिल्याने हिंदू नाराज होतात. अनेकवेळा मुस्लिमांवर पूर्वग्रहामुळे अन्याय होतो, हे खरे असले तरी हाच प्रकार इतर धर्मियांबाबतीतही होतो. २०१३ साली पश्चिम बंगालमधील एका हिंदू गावातील घरे मुस्लिमांनी पेटवल्याचे त्यांनी नमूद केले. जर भारतात मुस्लिमांवर अनन्वित अत्याचार झाले असते, त्यांचा छळ झाला असता तर ते भारत सोडून बांग्लादेश किंवा पाकिस्तानसारख्या मुस्लिम राष्ट्रांत गेले असते, असेही त्या म्हणाल्या.  
देशभरातील वाढत्या असहिष्णूततेच्या विरोधात निषेधाच सूर आळवत पुरस्कार परत करणा-या साहित्यिकांची कृती योग्य असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र कधी कधी हे साहित्यिक दुटप्पी भूमिका घेतात अशी टीकाही त्यांनी केली. अन्यायाविरोधात पुरस्कार परत करण्याचा विचार एखादी व्यक्ती मांडते आणि इतर साहित्यिक ती उचलून धरत त्याच मार्गावर चालतात, याच काहीच गैर नाही. पण मतभेद उदभवल्यावर अनेक जण दुटप्पी भूमिका घेतात, असे तस्लिमा यांनी म्हटले आहे. 
जेव्हा माझ्या पुस्तकावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली, भारतात माझ्याविरोधात पाच फतवे काढण्यात आले, मला राज्याबाहेर काढण्यात आलं, एवढचं नव्हे तर दिल्लीत मला घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं, भारताबाहेर जाण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला तेव्हा बहुतेक साहित्यिकांनी चकार शब्दही उच्चारला नाही. उलट सुनील गांगुली आणि शशांक घोष यांच्यासारख्या प्रसिद्ध लेखकांनी तत्कालिन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्याकडे धाव घेऊन माझ्या पुस्तकांवर बंदी घालण्याची मागणी केली, अशी व्यथाही नसरीन यांनी मांडली.