शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

भारतातील बहुतांश सेक्युलर हे हिंदू विरोधक - तस्लिमा नसरीन

By admin | Updated: October 17, 2015 14:47 IST

भारतातील बहुतांश सेक्युलर मुस्लिम समर्थक असून ते हिंदू विरोधक आहेत, असे विधान तस्लिमा नसरीन यांनी केले. हिंदूंच्या कामांवर कडाडून टीका करणारे सेक्युलर कट्टर मुस्लिमांचा बचाव करतात असे त्या म्हणाल्या.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - भारतातील बहुतांश सेक्युलर मुस्लिम समर्थक असून ते हिंदू विरोधक आहेत, असे विधान प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले आहे.  एकीकडे हिंदूंच्या कामांवर कडाडून टीका करणारे हेच लोक कट्टर मुस्लिमांच्या कृत्यांचा मात्र बचाव करतात असे त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटले. यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य करतानाच दादरीसारख्या घटनांमुळे देशातील असहिष्णूता वाढत असल्याची भीती व्यक्त केली.
मुस्लिम किंवा अल्पसंख्यांकाविरोधातील हिसांचाराबद्दल पंतप्रधानांनी आणखी आस्थेने बोलण्याची गरज वाटते का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता राजकीय नेते मतांच्या राजकारणांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करतात, अशी टीका त्यांना केली. मुस्लिमांना झुकते माप दिल्याने हिंदू नाराज होतात. अनेकवेळा मुस्लिमांवर पूर्वग्रहामुळे अन्याय होतो, हे खरे असले तरी हाच प्रकार इतर धर्मियांबाबतीतही होतो. २०१३ साली पश्चिम बंगालमधील एका हिंदू गावातील घरे मुस्लिमांनी पेटवल्याचे त्यांनी नमूद केले. जर भारतात मुस्लिमांवर अनन्वित अत्याचार झाले असते, त्यांचा छळ झाला असता तर ते भारत सोडून बांग्लादेश किंवा पाकिस्तानसारख्या मुस्लिम राष्ट्रांत गेले असते, असेही त्या म्हणाल्या.  
देशभरातील वाढत्या असहिष्णूततेच्या विरोधात निषेधाच सूर आळवत पुरस्कार परत करणा-या साहित्यिकांची कृती योग्य असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र कधी कधी हे साहित्यिक दुटप्पी भूमिका घेतात अशी टीकाही त्यांनी केली. अन्यायाविरोधात पुरस्कार परत करण्याचा विचार एखादी व्यक्ती मांडते आणि इतर साहित्यिक ती उचलून धरत त्याच मार्गावर चालतात, याच काहीच गैर नाही. पण मतभेद उदभवल्यावर अनेक जण दुटप्पी भूमिका घेतात, असे तस्लिमा यांनी म्हटले आहे. 
जेव्हा माझ्या पुस्तकावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली, भारतात माझ्याविरोधात पाच फतवे काढण्यात आले, मला राज्याबाहेर काढण्यात आलं, एवढचं नव्हे तर दिल्लीत मला घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं, भारताबाहेर जाण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला तेव्हा बहुतेक साहित्यिकांनी चकार शब्दही उच्चारला नाही. उलट सुनील गांगुली आणि शशांक घोष यांच्यासारख्या प्रसिद्ध लेखकांनी तत्कालिन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्याकडे धाव घेऊन माझ्या पुस्तकांवर बंदी घालण्याची मागणी केली, अशी व्यथाही नसरीन यांनी मांडली.