शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांकडून मानवी हक्कांचे सर्वाधिक उल्लंघन; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 11:13 IST

महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा, झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या नक्षलग्रस्त राज्यांसाठी ही बैठक आयोजिण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नक्षलवाद्यांकडून मानवी हक्काचे सर्वाधिक उल्लंघन होते. त्यांच्याविरोधात बचावात्मक पवित्रा न घेता सुरक्षा दलांनी धडक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यात गेल्या काहीकाळात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी सांगितले. महाराष्ट्रासहित अन्य नक्षलवादग्रस्त राज्यांचे मुख्यमंत्री व तेथील वरिष्ठ अधिकारी यांच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले.

महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा, झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या नक्षलग्रस्त राज्यांसाठी ही बैठक आयोजिण्यात आली होती. त्यात शाह म्हणाले की, नक्षलग्रस्त भागांमध्ये कायदा-सुव्यवस्थेची स्थिती सुधारल्याने त्या भागांत लोकसभा निवडणुकांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. सोमवारी झालेल्या या बैठकीत नक्षलवादविरोधी कारवाई व नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी उचललेली पावले याबद्दल सविस्तर चर्चा झाली.

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी नुकताच ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. त्या कारवाईनंतर झालेल्या या बैठकीत अमित शाह म्हणाले की, पूर्वी सुरक्षा दले बचावात्मक पवित्रा घेऊन कारवाई करत असत. पण आता परिस्थिती बदलली आहे. नक्षलवादी हे विकासातील सर्वात मोठा अडथळा आहे. ते आठ कोटी जनतेला विकासापासून वंचित ठेवत आहेत. डाव्या विचारसरणीच्या नक्षलवाद्यांकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादी कृत्यांमध्ये मोदी सरकारने केलेल्या कारवाईमुळे ७२ टक्क्यांनी घट झाली. नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण २०१०च्या तुलनेत २०२३मध्ये ८६ टक्के कमी झाले आहे. नक्षलवादी आता त्यांची अखेरची लढाई लढत आहेत.

नक्षलवाद्यांचा संपूर्ण पाडाव करण्याची ग्वाही

मार्च २०२६पर्यंत नक्षलवाद्यांचे अस्तित्व नष्ट करण्याचा सरकारचा निर्धार आहे. त्यासाठी केंद्र सरकार राज्यांना मदत करत आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहnaxaliteनक्षलवादी