शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

नक्षलवाद्यांकडून मानवी हक्कांचे सर्वाधिक उल्लंघन; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 11:13 IST

महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा, झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या नक्षलग्रस्त राज्यांसाठी ही बैठक आयोजिण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नक्षलवाद्यांकडून मानवी हक्काचे सर्वाधिक उल्लंघन होते. त्यांच्याविरोधात बचावात्मक पवित्रा न घेता सुरक्षा दलांनी धडक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यात गेल्या काहीकाळात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी सांगितले. महाराष्ट्रासहित अन्य नक्षलवादग्रस्त राज्यांचे मुख्यमंत्री व तेथील वरिष्ठ अधिकारी यांच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले.

महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा, झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या नक्षलग्रस्त राज्यांसाठी ही बैठक आयोजिण्यात आली होती. त्यात शाह म्हणाले की, नक्षलग्रस्त भागांमध्ये कायदा-सुव्यवस्थेची स्थिती सुधारल्याने त्या भागांत लोकसभा निवडणुकांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. सोमवारी झालेल्या या बैठकीत नक्षलवादविरोधी कारवाई व नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी उचललेली पावले याबद्दल सविस्तर चर्चा झाली.

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी नुकताच ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. त्या कारवाईनंतर झालेल्या या बैठकीत अमित शाह म्हणाले की, पूर्वी सुरक्षा दले बचावात्मक पवित्रा घेऊन कारवाई करत असत. पण आता परिस्थिती बदलली आहे. नक्षलवादी हे विकासातील सर्वात मोठा अडथळा आहे. ते आठ कोटी जनतेला विकासापासून वंचित ठेवत आहेत. डाव्या विचारसरणीच्या नक्षलवाद्यांकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादी कृत्यांमध्ये मोदी सरकारने केलेल्या कारवाईमुळे ७२ टक्क्यांनी घट झाली. नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण २०१०च्या तुलनेत २०२३मध्ये ८६ टक्के कमी झाले आहे. नक्षलवादी आता त्यांची अखेरची लढाई लढत आहेत.

नक्षलवाद्यांचा संपूर्ण पाडाव करण्याची ग्वाही

मार्च २०२६पर्यंत नक्षलवाद्यांचे अस्तित्व नष्ट करण्याचा सरकारचा निर्धार आहे. त्यासाठी केंद्र सरकार राज्यांना मदत करत आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहnaxaliteनक्षलवादी