शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नक्षलवाद्यांकडून मानवी हक्कांचे सर्वाधिक उल्लंघन; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 11:13 IST

महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा, झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या नक्षलग्रस्त राज्यांसाठी ही बैठक आयोजिण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नक्षलवाद्यांकडून मानवी हक्काचे सर्वाधिक उल्लंघन होते. त्यांच्याविरोधात बचावात्मक पवित्रा न घेता सुरक्षा दलांनी धडक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यात गेल्या काहीकाळात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी सांगितले. महाराष्ट्रासहित अन्य नक्षलवादग्रस्त राज्यांचे मुख्यमंत्री व तेथील वरिष्ठ अधिकारी यांच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले.

महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा, झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या नक्षलग्रस्त राज्यांसाठी ही बैठक आयोजिण्यात आली होती. त्यात शाह म्हणाले की, नक्षलग्रस्त भागांमध्ये कायदा-सुव्यवस्थेची स्थिती सुधारल्याने त्या भागांत लोकसभा निवडणुकांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. सोमवारी झालेल्या या बैठकीत नक्षलवादविरोधी कारवाई व नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी उचललेली पावले याबद्दल सविस्तर चर्चा झाली.

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी नुकताच ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. त्या कारवाईनंतर झालेल्या या बैठकीत अमित शाह म्हणाले की, पूर्वी सुरक्षा दले बचावात्मक पवित्रा घेऊन कारवाई करत असत. पण आता परिस्थिती बदलली आहे. नक्षलवादी हे विकासातील सर्वात मोठा अडथळा आहे. ते आठ कोटी जनतेला विकासापासून वंचित ठेवत आहेत. डाव्या विचारसरणीच्या नक्षलवाद्यांकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादी कृत्यांमध्ये मोदी सरकारने केलेल्या कारवाईमुळे ७२ टक्क्यांनी घट झाली. नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण २०१०च्या तुलनेत २०२३मध्ये ८६ टक्के कमी झाले आहे. नक्षलवादी आता त्यांची अखेरची लढाई लढत आहेत.

नक्षलवाद्यांचा संपूर्ण पाडाव करण्याची ग्वाही

मार्च २०२६पर्यंत नक्षलवाद्यांचे अस्तित्व नष्ट करण्याचा सरकारचा निर्धार आहे. त्यासाठी केंद्र सरकार राज्यांना मदत करत आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहnaxaliteनक्षलवादी