शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

‘नव्या कृषी कायद्यांना बहुतांश शेतकरी संघटनांचा पाठिंबा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 06:48 IST

समितीचे सदस्य व शेतकरी नेते अनिल घनवट यांनी हा अहवाल सोमवारी जनतेसाठी खुला केला. यासंदर्भात ते म्हणाले, नवे कृषी कायदे याआधीच रद्द केलेले असल्याने त्यांच्यावर समितीच्या अहवालाचा परिणाम होण्याची शक्यता नाही.

नवी दिल्ली : शेतकरी संघटनांच्या प्रखर विरोधामुळे मागे घ्याव्या लागलेल्या कृषी कायद्यांना बहुतांश शेतकरी संघटनांचा पाठिंबा होता, असा दावा या कायद्यांच्या अभ्यासासाठी सर्वोच्च न्यायालयाद्वारे नेमण्यात आलेल्या समितीने आपल्या अहवालात केला आहे. समितीचे सदस्य व शेतकरी नेते अनिल घनवट यांनी हा अहवाल सोमवारी जनतेसाठी खुला केला. यासंदर्भात ते म्हणाले, नवे कृषी कायदे याआधीच रद्द केलेले असल्याने त्यांच्यावर समितीच्या अहवालाचा परिणाम होण्याची शक्यता नाही. मात्र, हा अहवाल धोरणकर्ते आणि शेतकरी यांच्यासाठी  महत्त्वाचा आहे. समितीने देशभरातील २६६ शेतकरी संघटनांशी नव्या कृषी कायद्यांबाबत चर्चा करण्यासाठी संपर्क साधला होता. तसेच या कायद्यांबाबत समितीला १९०२७ निवेदने, १५२० ई-मेल आले होते. या सगळ्याचा अभ्यास करून या समितीने आपला अहवाल बंद पाकिटातून १९ मार्च रोजी न्यायालयाला सादर केला. नव्या कृषी कायद्यांना पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील शेतकऱ्यांनी विरोध केल्याने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कायदे मागे घेतल्याचे जाहीर केले.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन