शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

दररोज ३४,००० हून अधिक प्रवासी करतात 'वंदे भारत'ने वेगवान प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 09:21 IST

आरामदायी प्रवासाचा अनुभव, सरासरी १२० किमी प्रतितास वेग; चेन्नईनंतर आता लातूरमध्येही हाेणार डब्यांची निर्मिती

ऋषिराज तायडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: रेल्वे प्रवाशांना गतिवान आणि आरामदायी सेवा देणारी सेमी हायस्पीड रेल्वेसेवा म्हणून 'वंदे भारत'कडे पाहिले जाते. १५ नोव्हेंबर २०१९ रोजी नवी दिल्ली ते वाराणसी या देशातील पहिल्या 'वंदे भारत' रेल्वेला पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविला. त्यानुसार आतापर्यंत महाराष्ट्रातील ७ मार्गांसह देशांतील एकूण २०,५०० किमीच्या ४१ मार्गांवर ही सेवा सुरू आहे.

दररोज सरासरी ३४,००० प्रवासी १२० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या 'वंदे भारत'चा लाभ घेत आहेत. 'वंदे भारत'ची निर्मिती चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीत केली जाते. पुढील काही वर्षांत लातूर येथेही 'वंदे भारत'ची निर्मिती केली जाणार आहे.

राज्यातील प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद

महाराष्ट्रात धावणाऱ्या वंदे भारत सेवांना प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यापैकी राज्यात मुंबई-सोलापूरला १०८ टक्के, देशात नागपूर-बिलासपूरला सर्वाधिक १२२ टक्के भारमान असल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय मुंबई-शिर्डी, मुंबई-मडगाव मार्गावरील 'वंदे भारत' एक्स्प्रेसला प्रवाशांचा ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत असल्याचे म्हटले आहे. नुकत्याच सुरू झालेल्या जालना-मुंबई सेवेलाही प्रवाशांची पसंती मिळत आहे. बहुतांश मार्गांवरील 'वंदे भारत' एक्स्प्रेसचे भारमान ९० टक्क्यांहून अधिक असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्रातील प्रस्तावित फेऱ्या

  • मुंबई-अहमदाबाद
  • मुंबई सीएसएमटी-शेगाव
  • पुणे-शेगाव
  • पुणे-बेळगाव
  • पुणे-बडोदा
  • पुणे-सिकंदराबाद
  • मुंबई एलटीटी-कोल्हापूर

महाराष्ट्रातून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या सेवा

मार्ग (डब्यांची संख्या)    उद्घाटन    अंतर

  • मुंबई सेंट्रल-गांधीनगर (८)     ३० सप्टेंबर २०२२     ५२२ किमी
  • नागपूर बिलासपूर(८)     ११ डिसेंबर २०२२     ४१२ किमी
  • मुंबई-सोलापूर(१६)     १० फेब्रुवारी २०२३     ४५४ किमी
  • मुंबई-शिर्डी (१६)     १० फेब्रुवारी २०२३     ३४१ किमी 
  • मुंबई-मडगाव(८)     २७ जून २०२३      ५८१ किमी
  • नागपूर-इंदूर(८)    २७ जून २०२३      ६३६ किमी 
  • मुंबई-जालना (८)      ३० डिसेंबर २०२३     ४३५ किमी
टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस