शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

3,000 गावांमध्ये हायस्पीड इंटरनेट सुविधा! केंद्राचा तामिळनाडूमध्ये मोठा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 13:24 IST

High Speed Internet Facility : या उपक्रमाद्वारे चेंगलपेट, कांचीपुरम, तिरुवन्नमलाई, तिरुवल्लूर, वेल्लोर, कृष्णगिरी, रानीपेट्टई, तिरुपती आणि चेन्नई जिल्ह्यातील 3,095 ग्रामपंचायती हायस्पीड इंटरनेटने जोडल्या जातील.

चेन्नई : केंद्र सरकारने तामिळनाडूच्या गावांमध्ये हायस्पीड इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतनेट फेज-2 प्रकल्पाच्या अंमलबजावणीला मान्यता दिली आहे. यासाठी मास्टर सर्व्हिस अॅग्रीमेंट (MSA) करण्यात आले. अंदाजे 1,815.31 कोटी रुपये खर्च करून सुमारे 3000 गावे इंटरनेट सुविधेने जोडण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. तामिळनाडू फायबरनेट कॉर्पोरेशनच्या उच्च अधिकार्‍यांनी तमिळनाडू माहिती तंत्रज्ञान मंत्री मनो थंकराज यांच्या उपस्थितीत पॅकेज ए अंतर्गत समाविष्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये भारत नेट प्रकल्प-II लागू करण्यासाठी पॉलीकॅब इंडिया लिमिटेडसोबत कागदपत्रांची देवाणघेवाण केली.

या उपक्रमाद्वारे चेंगलपेट, कांचीपुरम, तिरुवन्नमलाई, तिरुवल्लूर, वेल्लोर, कृष्णगिरी, रानीपेट्टई, तिरुपती आणि चेन्नई जिल्ह्यातील 3,095 ग्रामपंचायती हायस्पीड इंटरनेटने जोडल्या जातील. केंद्राने तामिळनाडूमधील 12,525 ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबर केबल्स (OFCs) वापरून उच्च-स्पीड बँडविड्थने जोडण्यासाठी 1,815.31 कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतींना किमान 1 जीबीपीएसची स्केलेबल बँडविड्थ प्रदान केली जाईल. प्रत्येक पॅकेजसाठी सिस्टम इंटिग्रेटर आणि एक थर्ड पार्टी एजन्सीच्या नियुक्तीसह प्रकल्पाची अंमलबजावणी चार पॅकेजेस (पॅकेज ए, बी, सी आणि डी) मध्ये विभागली गेली आहे.

ऑक्टोबर 2021 मध्ये राज्यात असाच प्रकल्प राबवण्यासाठी लार्सन अँड टुब्रो लिमिटेड, आयटीआय लिमिटेड आणि बेसिल यांच्याशी करार करण्यात आला. या कंपन्या पॅकेज सी मधील नागापट्टिनम, तंजावूर, तिरुवरूर, पुदुकोट्टई, नमक्कल, करूर, कोईम्बतूर, तिरुपूर, तिरुचिरापल्ली, मायिलादुथुराई जिल्ह्यांमध्ये आहेत. तर कन्नियाकुमारी, मदुराई, रामनाथपुरम, थेनी, तुतीकोरिन, तिरुनेलवेली, विरुद, डिंडीगुल आणि शिवगंगा जिल्ह्यांमध्ये पॅकेज डी प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील नोकऱ्या आणि सेवा वाढून राज्याची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारेल, असा सरकारचा विश्वास आहे. यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव नीरज मित्तल, तामिळनाडू फायबरनेट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ए के कमल किशोर आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Internetइंटरनेटtechnologyतंत्रज्ञान