शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

दोन वर्षात ११०० हून अधिक बनावट बॉम्बच्या धमक्या, संपूर्ण आकडेवारी पाहून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 11:30 IST

गेल्या दोन वर्षांत ११०० हून अधिक बनावट बॉम्बच्या धमक्या मिळाल्याचे सरकारने म्हटले आहे.

नवी दिल्ली : देशात बनावट बॉम्बच्या धमकीची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांत विमान प्रवासादरम्यान बनावट बॉम्बच्या धमक्या मिळाल्याचा घटना घडल्या आहेत. अशा घटनामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. दरम्यान, सरकारने संसदेत सादर केलेली आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. 

गेल्या दोन वर्षांत ११०० हून अधिक बनावट बॉम्बच्या धमक्या मिळाल्याचे सरकारने म्हटले आहे. २८ नोव्हेंबर रोजी लोकसभेत माहिती देताना भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्री म्हणाले की, ऑगस्ट २०२२ ते १४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत एकूण ११४८ बनावट बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. कॉल आणि मेसेजद्वारे या धमक्या देण्यात आल्या आहेत.

२०२४ या वर्षात ११ महिन्यांत ९९९ बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. या धमक्यांमुळे विमानांचे उड्डाण करण्यात अडचणी निर्माण होतात आणि प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यातही त्रास होतो, कारण एकदा धोका आल्यावर संपूर्ण तपास केला जातो, त्यामुळे उड्डाणाला विलंब होतो.

काय कारवाई झाली?बॉम्बच्या या बनावट धमक्यांबाबत काय कारवाई करण्यात आली, याबद्दलही सरकारने सांगितले. जानेवारी २०२४ पासून अशा प्रकरणांमध्ये २५६ एफआयआर आणि १२ जणांना अटक करण्यात आली आहेत. १४ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत १६३ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, ही एक प्रकारची वाढ आहे.

सरकार कायद्यात बदल करणार?मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाशी संबंधित कायदे बदलायला हवेत, असे सरकारचे मत आहे. अशा परिस्थितीत सरकार सरकारी विमान (सुरक्षा) नियम, २०२३ मध्ये बदल करू शकते, असे म्हटले जाते. बॉम्बच्या बनावट धमक्या देणाऱ्यांना नो फ्लाय लिस्टमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते, असेही सांगितले जात आहे. याशिवाय, सरकार सुरक्षेशी संबंधित उपायांचा सतत आढावा घेत आहे.

टॅग्स :airplaneविमानParliamentसंसदlok sabhaलोकसभा