शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 07:16 IST

माती-दगडांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी आधुनिक उपकरणे या भागांत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, अनेक भागांत गंगोत्रीला जाणारे यात्रेकरूही अडकून पडल्याने त्यांच्या बचावासाठी यंत्रणा कार्यरत झाली आहे.

डेहराडून : उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात धराली गावाजवळ मंगळवारी झालेल्या ढगफुटीनंतर आलेल्या महापुरामुळे अडकलेल्या ४००हून अधिक लोकांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आले असून, १०० लोक अजूनही बेपत्ता आहेत. दरम्यान, हर्षिल भागात असलेल्या लष्करी छावणीतून बेपत्ता झालेले एक अधिकारी व आठ जवान अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.

माती-दगडांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी आधुनिक उपकरणे या भागांत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, अनेक भागांत गंगोत्रीला जाणारे यात्रेकरूही अडकून पडल्याने त्यांच्या बचावासाठी यंत्रणा कार्यरत झाली आहे. दगड-मातीचे ५० ते ६० फूट उंचीचे ढिगारे धरालीमध्ये असून, याखाली लोकांचा शोध घेतला जात आहे.

२२५ जणांचे बचाव पथकबचावकार्यात अभियंते, वैद्यकीय कर्मचारी तसेच तज्ज्ञांसह २२५ जण सहभागी आहेत. तसेच अडकलेल्यांचा शोध घेण्याची क्षमता असलेले प्रशिक्षित श्वानही या भागात तैनात आहेत.

३०० यात्रेकरू सुरक्षितढगफुटीदरम्यान गंगोत्रीजवळ अडकलेल्या ३०० यात्रेकरूंना हेलिकॉप्टरच्या मदतीने हर्षिल भागात आणण्यात आले असून, हे यात्रेकरून सुरक्षित आहेत. यात गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्लीसह दक्षिणेतील यात्रेकरूंचा समावेश आहे. 

मग महापूर आला कुठून? ढगफुटीमुळे धरालीत प्रकोप झाल्याचे मानले जात असले तरी हवामान विभागाकडे असा डेटाच नाही. २० ते ३० चौ. किमी क्षेत्रात १ तासात १०० मिमीहून अधिक पाऊस हा ढगफुटी मानली जाते. परंतु, प्रत्यक्षात या भागात २७ मिमी पावसाचीच नोंद आहे. मग हा पूर आला कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडfloodपूरDeathमृत्यू