शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
4
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
5
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
6
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
7
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
8
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
9
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
10
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
11
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
12
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
13
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
14
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
15
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
16
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
17
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
18
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
19
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
20
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण

देश परदेश पानावर न गेलेल्या आणखी बातम्या

By admin | Updated: January 6, 2016 01:51 IST

देश परदेश पानावर न गेलेल्या आणखी बातम्या .............मोदींच्या लाहोरडिप्लोमसीवर सेनेचा प्रहारपठाणकोट हल्ला : काँग्रेस- भाजपमध्ये जुंपले वाक्युद्धनवी दिल्ली/ मुंबई ...


देश परदेश पानावर न गेलेल्या आणखी बातम्या
.............

मोदींच्या लाहोर
डिप्लोमसीवर सेनेचा प्रहार
पठाणकोट हल्ला : काँग्रेस- भाजपमध्ये जुंपले वाक्युद्ध
नवी दिल्ली/ मुंबई : पठाणकोटच्या हवाई तळावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाहोर डिप्लोमसीवर सडकून टीका केली आहे. पाकिस्तान धोरणावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये वाक्युद्ध छेडले गेले असताना शिवेसेनेने मोदींनी संपूर्ण जगात एकजूट घडविण्याऐवजी केवळ भारतावरच लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला दिला आहे.
नवाज शरीफ यांनी एक कप चहाच्या बदल्यात आपल्या सात जवानांचे प्राण घेतले आहे. मोदींनी पाकिस्तानवर विश्वास ठेवू नये, असा इशाराही या पक्षाने दिला. २५ डिसेंबर रोजी मोदींनी पूर्वनियोजित कार्यक्रम नसताना अकस्मात लाहोरला भेट देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
मोदी हे गेल्याच आठवड्यात शरीफ यांचे पाहुणे बनले होते. त्यावेळी आम्ही त्यांना पाकिस्तानवर विश्वास ठेवू नका असा इशारा दिला होता. आता आपला कसा विश्वासघात झाला हे सर्वांना दिसतेच आहे, असे शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध लेखात म्हटले आहे.(वृत्तसंस्था)
-----------
आता धोरण कसे बदलले ? - काँग्रेसचा सवाल
काँग्रेस आज सत्तेवर असती तर पाकिस्तानवर हल्ले करीत जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्याची मागणी झाली असती. आता पठाणकोटवर हल्ला झाला असताना तसे काहीही होत नाहीय. टिष्ट्वटरवर शहिदांच्या मृत्यूबद्दल शोकसंवेदना व्यक्त करण्याचे एकमेव काम केले जात आहे. मोदींनी अकस्मात पाकिस्तानला भेट देताना त्या देशाकडून असे कोणते आश्वासन मिळविले होते, असा सवाल करीत काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी हल्लाबोल केला. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंगांनी शक्यतांऐवजी निष्पत्तींना प्राधान्य दिले होते. सध्याच्या सरकारने धोरणात बदल करीत केवळ शक्यतांना महत्त्व दिले आहे. लाहोरमध्ये केवळ संभाव्य बाबींवर चर्चा झाली होती. मोदींनी चर्चेची निष्पत्ती काय राहिली ते सांगायला हवे. आम्ही चर्चा घडवून आणण्याचे समर्थन करतो, मात्र त्याचवेळी देशाची सुरक्षा आणि अखंडतेशी तडजोड केली जाऊ नये असेच आम्हाला स्पष्टपणे सांगायचे आहे, असे शर्मा यांनी दिल्लीत पत्रपरिषदेत म्हटले.
------------------------
काँग्रेसचे विधान लाजिरवाणे- भाजप
पठाणकोट हल्ल्यावरून काँग्रेसने चालविलेली विधाने लाजिरवाणी असून त्यामुळे देशविरोधी मानसिकता असलेल्या घटकांच्या नैतिक धैर्याला बळकटीच दिली जाते, असे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटले. काँग्रेसने दहशतवाद्यांच्या कृत्याबद्दल सवाल न करता दहशतवाद मिटवण्यासाठी लढणाऱ्या सरकारला घेरले आहे. या पक्षाने जनतेच्या संवेदनांकडे डोळेझाक करीत आपल्या जवानांच्या हौतात्म्याबाबत प्रश्न उपस्थित करून मर्यादा ओलांडल्या आहेत. देशाची दिशाभूल आणि संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न करणे ही दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे देशविरोधी घटकांचे मनोधैर्य उंचावण्यास मदतच होईल, असेही ते म्हणाले.
...........
प्रतिक्रिया जोड/ मोदींनी देशाची माफी मागावी- जेडीयू

पठाणकोट येथील हल्ला ही केंद्र सरकारच्या गंभीर चुकीची परिणती असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी जेडीयूचे प्रवक्ते राजीवरंजन प्रसाद यांनी केली आहे. देशातील सुरक्षा आणि जवानांचे मनोबळ उंचावण्याबाबत केंद्र सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला धक्का बसला आहे. देशाचे गृहमंत्री, संरक्षणमंत्री आणि विदेशमंत्र्याला चुकीची माहिती देण्याचा कायदेशीर अधिकार बहाल करण्यात आला काय? असा टोलाही त्यांनी हाणला.
..........