शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात महाआघाडीला मिळतील 60 पेक्षा जास्त जागा, आपचे नेते संजय सिंह यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 13:01 IST

लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसांवर आला असताना राजकीय नेत्यांकडून तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

लखनौ - लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसांवर आला असताना राजकीय नेत्यांकडून तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यातही सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये कोण बाजी मारणार याचीही उत्सुकता अनेकांना आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा महाआघाडी 60 हून अधिक जागा जिंकणार, तर उत्तर प्रदेशसह संपूर्ण भारतात भाजपा भुईसपाट होणार, असा दावा आपचे नेते संजय सिंह यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतरच्या मोर्चेबांधणीबाबत चर्चा करण्यासाठी आपचे नेते संजय सिंह यांनी आज उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय सिंह यांनी उत्तर प्रदेशाच महाआघाडीला मोठा विजय मिळेल, असे भाकीत केले.''उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा महाआघाडी 60 हून अधिक जागा जिंकणार, तर उत्तर प्रदेशसह संपूर्ण भारतात भाजपा भुईसपाट होईल. याआधीच्या इतिहासाप्रमाणे यावेळीही एक्झिट पोल खोटे ठरतील. तसेच विरोधी पक्ष केंद्रात एक मजबूत सरकार स्थापन करतील,''असे संजय सिंह म्हणाले. 

 यावेळी अखिलेश यादव यांच्याशी झालेल्या चर्चेबाबतही संजय सिंह यांनी संक्षिप्त माहिती दिली. ''लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसांनंतर जाही होणार आहे. त्यामुळे निकालानंतरची रणनीती ठरवण्यासाठी आम्ही चर्चा केली. भाजपा, नरेंद्र मोदी आणि अमित शहा तसेच जातीयवादी शक्तींना सत्तेपासून रोखण्यास आमचे प्राधान्य आहे.'' असे संजय सिंह यांनी यावेळी सांगितले.  दरम्यान, रविवारी प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशबाबत परस्परविरोधी दावे करण्यात आल्याने येथील निकालांबाबतचा संभ्रम वाढला आहे. एकीकडे इंडिया टुडे-माय अॅक्सिस, टुडेज् चाणक्यसारख्या संस्थांनी उत्तर प्रदेशात भाजपाला बंपर यश मिळेल असे भाकीत केले आहे. तर एबीपी-नेल्सन आणि सी-वोटरसारख्या सर्वेक्षण संस्थानी उत्तर प्रदेशात अखिलेश यादव आणि मायावतींच्या नेतृत्वाखालील महाआघाडीच आघाडीवर राहील असा अंदाज वर्तवला आहे.  विविध संस्थांच्या एक्झिट पोलवर नजर टाकल्यास टाइम्स  नाऊ व्हीएमआरने भाजपाला 58, महाआघाडीला 20 तर काँग्रेसला 2 जागा दिल्या आहेत. तर इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाने भाजपाला 62 ते 68, महाआघाडीला 10 ते 16 आणि काँग्रेसला 2 जागा दिल्या आहेत. त्याशिवाय न्यूज 24-टुडेज चाणक्यनेही आपल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला 65 तर महागठबंधनला 13 आणि काँग्रेसला दोन जागा दिल्या आहेत. रिपब्लिक-जन की बात ने भाजपाला 46 ते 57 तर महाआघाडीला 15 ते 29 जागा आणि काँग्रेसला 2 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.  तर एबीपी-नेल्सनने आपल्या एक्झिट पोलचा कौल महाआघाडीच्या पारड्यात टाकला आहे. एबीपी-नेल्सनच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला 33 तर महाआघाडील 45 जागा आणि काँग्रेसला केवळ 2 जागा मिळतील. सी-वोटरनेही उत्तर प्रदेशात महाआघाडीचे पारडे जड दाखवले आहे.  सी-वोटरच्या पोलनुसार भाजपाला 38 तर महाआघाडीला 40 जागा मिळण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019Samajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीAAPआपLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९