शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बापरे! पतीकडून पत्नीला मारहाण योग्यच; ३० टक्क्यांहून अधिक महिलांनी दिलं समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 21:14 IST

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून ही खळबळजनक माहिती समोर आली आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातील सर्वाधिक महिलांनी पुरुषांकडून त्यांच्या बायकांना होणारी मारहाण योग्य असल्याचं म्हटलं आहे.

नवी दिल्ली – महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत देशभरात ठिकठिकाणी आवाज उठवले जातात. महिलांवर अत्याचार चिंतेची बाब असल्याचं म्हटलं जातं. परंतु राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून जो रिपोर्ट समोर आलाय त्याने सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत. यामागचं कारणही तसेच आहे. देशातील १८ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात १४ ते ३० टक्क्याहून अधिक महिलांनी नवऱ्याकडून होणाऱ्या मारहाणीचं समर्थन केले आहे. तर खूप कमी टक्के पुरुषांनी मारहाणीच्या कृत्याचं समर्थन केले आहे.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून ही खळबळजनक माहिती समोर आली आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातील सर्वाधिक महिलांनी पुरुषांकडून त्यांच्या बायकांना होणारी मारहाण योग्य असल्याचं म्हटलं आहे. तर मणिपूर ६६ टक्के, केरळ ५२ टक्के, जम्मू काश्मीर ४९ टक्के, महाराष्ट्र ४४ टक्के, पश्चिम बंगाल ४२ टक्के यानुसार अनेक राज्यात महिलांनी पुरुषांकडून त्यांच्या बायकोला होणारी मारहाण योग्य ठरवली आहे.

नवऱ्याकडून मारहाणीचं काय आहे कारण?

सर्वेक्षणात त्या संभाव्य परिस्थितीचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यात एक पती त्याच्या पत्नीला मारहाण करतो. जर ती विश्वासघातकी असल्याचा संशय असेल. जर सासरच्या माणसांचा सातत्याने अपमान करत असेल. त्यांच्याशी वाद घालत असेल. जर ती लैंगिक संबंध बनवण्यास नकार देत असेल. नवऱ्याला न सांगता बाहेर जात असेल. जेवणं बनवत नसेल. घराची आणि लहान मुलांची काळजी घेत नसेल.

मारहाण योग्य ठरवण्यामागचं कारण काय?

नवऱ्याकडून बायकोला मारहाण योग्य असल्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे घराची, मुलांची काळजी न घेणे. सासरच्या मंडळींचा आदर न करणे हे आहे. १८ राज्यातील १३ राज्यात हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, गुजरात, नागालँड, गोवा, बिहार, कर्नाटक, आसाम, महाराष्ट्र, तेलंगाणा आणि पश्चिम बंगालमध्ये महिलांनी नवऱ्याकडून सासरच्या मंडळींचा आदर न करणे त्यामुळे मारहाण झाली असेल तर योग्य असल्याचं म्हटलं आहे.

कोविड काळात लैंगिक शोषण आणि घरगुती हिंसाचारात वाढ

नवऱ्याद्वारे मारहाण योग्य असल्याचं ठरवणाऱ्या महिलांमध्ये सर्वात कमी संख्या हिमाचल प्रदेशची आहे. पुरुषांमध्ये कर्नाटक ८१.९ टक्के नवऱ्याने केलेली मारहाण योग्य असल्याचं म्हटलं आहे. हैदराबाद येथील एका संस्थेने कोविड काळात लैंगिक शोषण आणि घरगुती हिंसाचारात वाढ झाल्याचं म्हटलं आहे.