शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बापरे! पतीकडून पत्नीला मारहाण योग्यच; ३० टक्क्यांहून अधिक महिलांनी दिलं समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 21:14 IST

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून ही खळबळजनक माहिती समोर आली आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातील सर्वाधिक महिलांनी पुरुषांकडून त्यांच्या बायकांना होणारी मारहाण योग्य असल्याचं म्हटलं आहे.

नवी दिल्ली – महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत देशभरात ठिकठिकाणी आवाज उठवले जातात. महिलांवर अत्याचार चिंतेची बाब असल्याचं म्हटलं जातं. परंतु राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून जो रिपोर्ट समोर आलाय त्याने सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत. यामागचं कारणही तसेच आहे. देशातील १८ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात १४ ते ३० टक्क्याहून अधिक महिलांनी नवऱ्याकडून होणाऱ्या मारहाणीचं समर्थन केले आहे. तर खूप कमी टक्के पुरुषांनी मारहाणीच्या कृत्याचं समर्थन केले आहे.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून ही खळबळजनक माहिती समोर आली आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातील सर्वाधिक महिलांनी पुरुषांकडून त्यांच्या बायकांना होणारी मारहाण योग्य असल्याचं म्हटलं आहे. तर मणिपूर ६६ टक्के, केरळ ५२ टक्के, जम्मू काश्मीर ४९ टक्के, महाराष्ट्र ४४ टक्के, पश्चिम बंगाल ४२ टक्के यानुसार अनेक राज्यात महिलांनी पुरुषांकडून त्यांच्या बायकोला होणारी मारहाण योग्य ठरवली आहे.

नवऱ्याकडून मारहाणीचं काय आहे कारण?

सर्वेक्षणात त्या संभाव्य परिस्थितीचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यात एक पती त्याच्या पत्नीला मारहाण करतो. जर ती विश्वासघातकी असल्याचा संशय असेल. जर सासरच्या माणसांचा सातत्याने अपमान करत असेल. त्यांच्याशी वाद घालत असेल. जर ती लैंगिक संबंध बनवण्यास नकार देत असेल. नवऱ्याला न सांगता बाहेर जात असेल. जेवणं बनवत नसेल. घराची आणि लहान मुलांची काळजी घेत नसेल.

मारहाण योग्य ठरवण्यामागचं कारण काय?

नवऱ्याकडून बायकोला मारहाण योग्य असल्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे घराची, मुलांची काळजी न घेणे. सासरच्या मंडळींचा आदर न करणे हे आहे. १८ राज्यातील १३ राज्यात हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, गुजरात, नागालँड, गोवा, बिहार, कर्नाटक, आसाम, महाराष्ट्र, तेलंगाणा आणि पश्चिम बंगालमध्ये महिलांनी नवऱ्याकडून सासरच्या मंडळींचा आदर न करणे त्यामुळे मारहाण झाली असेल तर योग्य असल्याचं म्हटलं आहे.

कोविड काळात लैंगिक शोषण आणि घरगुती हिंसाचारात वाढ

नवऱ्याद्वारे मारहाण योग्य असल्याचं ठरवणाऱ्या महिलांमध्ये सर्वात कमी संख्या हिमाचल प्रदेशची आहे. पुरुषांमध्ये कर्नाटक ८१.९ टक्के नवऱ्याने केलेली मारहाण योग्य असल्याचं म्हटलं आहे. हैदराबाद येथील एका संस्थेने कोविड काळात लैंगिक शोषण आणि घरगुती हिंसाचारात वाढ झाल्याचं म्हटलं आहे.