शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

आंदोलन झाले महिन्याचे, जगातून मिळेल समर्थन; शेतकरी नेत्यांना विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 07:02 IST

Farmers Protest : केंद्र सरकारसोबतच शेतकरी प्रतिनिधींच्या अनेक बैठका झाल्या असल्या तरी कोणताही तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांना कायदे नको आहेत आणि केंद्र सरकार कायदे मागे घ्यायला तयार नाहीत.

- विकास झाडे

नवी दिल्ली : तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय तातडीने घ्या अन्यथा या आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळेल व तुमची (केंद्र सरकारची) फजिती होईल असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते बिंदर सिंह गोलेवाला यांनी केंद्र सरकारला दिला आहे. शुक्रवारी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला एक महिना पूर्ण होत आहे. दिल्लीच्या सर्व सीमा जवळपास दोन लाख शेतकऱ्यांनी अडविल्या असून कृषी कायदे मागे घ्यावेत व ‘एमएसपी’ कायदा आणावा यासाठी हे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारसोबतच शेतकरी प्रतिनिधींच्या अनेक बैठका झाल्या असल्या तरी कोणताही तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांना कायदे नको आहेत आणि केंद्र सरकार कायदे मागे घ्यायला तयार नाहीत. दिल्ली - एनसीआरचे हवामान आरोग्यास अपायकारक आहे. कडाक्याची थंडी आहे. तशाही परिस्थितीत शेतकरी जिद्दीने सीमेवरती बसले आहेत. या एक महिन्याच्या काळात ३५ पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सरकारतर्फे शेतकरी नेत्यांना दोनवेळा लेखी प्रस्ताव पाठविण्यात आलेत आणि आम्ही चर्चेला तयार आहोत असे कळविले आहे. परंतु केवळ कायद्यात सुधारणा करू हेच सांगितले जाते. त्यापेक्षा पुढची पायरी चढायला सरकार तयार नाही. 

४८ तासांची वेळ उत्तर प्रदेश प्रवेशद्वारावर गुरुवारी एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. विजय हिंदुस्थानी यांनी स्वत:च्या रक्ताने पोस्टर रंगवले व निदर्शने केलीत. त्यांनी कायदे परत घेण्यासाठी सरकारला ४८ तासांचा वेळ दिला आहे. बास्केट बॉल खेळाडू सतनाम सिंह यांनी सिंघू सीमेवर शेतकऱ्यांना समर्थन दिले. त्यांची सेवाही केली. 

रस्ते जामगेला महिनाभर आंदोलनामुळे दिल्लीतील रहदारीचे रस्ते मोठ्या प्रमाणात जाम होत आहेत. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गुरुवारी मथुरा आणि आग्रा येथून आलेल्या शेतकऱ्यांना महामाया उड्डाणपुलावर अडविण्यात आले आहे. त्यामुळे हा मार्ग जाम होता. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप