शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

आंदोलन झाले महिन्याचे, जगातून मिळेल समर्थन; शेतकरी नेत्यांना विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 07:02 IST

Farmers Protest : केंद्र सरकारसोबतच शेतकरी प्रतिनिधींच्या अनेक बैठका झाल्या असल्या तरी कोणताही तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांना कायदे नको आहेत आणि केंद्र सरकार कायदे मागे घ्यायला तयार नाहीत.

- विकास झाडे

नवी दिल्ली : तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय तातडीने घ्या अन्यथा या आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळेल व तुमची (केंद्र सरकारची) फजिती होईल असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते बिंदर सिंह गोलेवाला यांनी केंद्र सरकारला दिला आहे. शुक्रवारी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला एक महिना पूर्ण होत आहे. दिल्लीच्या सर्व सीमा जवळपास दोन लाख शेतकऱ्यांनी अडविल्या असून कृषी कायदे मागे घ्यावेत व ‘एमएसपी’ कायदा आणावा यासाठी हे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारसोबतच शेतकरी प्रतिनिधींच्या अनेक बैठका झाल्या असल्या तरी कोणताही तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांना कायदे नको आहेत आणि केंद्र सरकार कायदे मागे घ्यायला तयार नाहीत. दिल्ली - एनसीआरचे हवामान आरोग्यास अपायकारक आहे. कडाक्याची थंडी आहे. तशाही परिस्थितीत शेतकरी जिद्दीने सीमेवरती बसले आहेत. या एक महिन्याच्या काळात ३५ पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सरकारतर्फे शेतकरी नेत्यांना दोनवेळा लेखी प्रस्ताव पाठविण्यात आलेत आणि आम्ही चर्चेला तयार आहोत असे कळविले आहे. परंतु केवळ कायद्यात सुधारणा करू हेच सांगितले जाते. त्यापेक्षा पुढची पायरी चढायला सरकार तयार नाही. 

४८ तासांची वेळ उत्तर प्रदेश प्रवेशद्वारावर गुरुवारी एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. विजय हिंदुस्थानी यांनी स्वत:च्या रक्ताने पोस्टर रंगवले व निदर्शने केलीत. त्यांनी कायदे परत घेण्यासाठी सरकारला ४८ तासांचा वेळ दिला आहे. बास्केट बॉल खेळाडू सतनाम सिंह यांनी सिंघू सीमेवर शेतकऱ्यांना समर्थन दिले. त्यांची सेवाही केली. 

रस्ते जामगेला महिनाभर आंदोलनामुळे दिल्लीतील रहदारीचे रस्ते मोठ्या प्रमाणात जाम होत आहेत. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गुरुवारी मथुरा आणि आग्रा येथून आलेल्या शेतकऱ्यांना महामाया उड्डाणपुलावर अडविण्यात आले आहे. त्यामुळे हा मार्ग जाम होता. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप