शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
6
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
8
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
9
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
10
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
11
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
12
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
13
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
14
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
15
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
16
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
17
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
18
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
19
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
20
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू

मान्सून रखडला; केंद्रात चिंतेचे ढग, महागाईची भीती, उपाययोजनांचे मंत्रालयांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 06:13 IST

यंदा मान्सून देशात मोठ्या प्रमाणावर निराशा करू शकतो.

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : यंदा मान्सून देशात मोठ्या प्रमाणावर निराशा करू शकतो. सर्वसामान्य ते त्यापेक्षा कमी पाऊस होऊ शकतो. हवामान खात्याची ही अंतर्गत माहिती न सांगता सर्वसामान्य पाऊस होईल, अशा शक्यता वर्तविली जात आहे. प्रत्यक्षात पाच मंत्रालयांना येणाऱ्या आव्हानापासून निपटण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

सरकारी सूत्रांनी सांगितले की, देशात यंदा मान्सून कमजोर राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, तामिळनाडू, केरळ, आंध्र, ओडिशा, प. बंगाल, कर्नाटक ही किनारपट्टीवरील ९ राज्ये व चार केंद्रशासित प्रदेशांत पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. केंद्राला दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, यंदा मान्सून केवळ केरळला स्पर्श करून निघून जाऊ शकतो. देशभरात सक्रिय होण्याची शक्यता दिसत नाही. हा अंदाज खरा ठरल्यास केंद्र सरकारसमोर निवडणुकीच्या वर्षात संकट उभे राहू शकते. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या पिकांवर पडेल.

अन्नसाठ्यावर परिणाम, सरकारी याेजनांना फटका 

- एका ज्येष्ठ मंत्र्याने दावा केला की, पिके व्यवस्थित न झाल्याचा थेट परिणाम देशाच्या अन्नसाठ्यावर पडेल. ग्रामीण भागात बेरोजगारी वाढेल. अन्नधान्य महाग होईल. 

- सरकारच्या ८० कोटी लोकांना मोफत अन्न देण्याच्या योजनांवर परिणाम होईल, तसेच खाद्य पदार्थांच्या किमती वाढतील. यातून महागाई वाढण्याची शक्यता असून, निवडणुकीच्या वर्षात असे व्हावे, असे कोणत्याही सरकारला वाटणार नाही.

बेरोजगारी वाढू लागल्याचे संकेत

सध्या तरी मान्सूनचा प्रभाव सुरूही झालेला नाही, तरीही देशातील ग्रामीण भागांत वाढणाऱ्या मनरेगाच्या संख्येने सरकारला चिंतेत टाकले आहे. याचा सरळ अर्थ आहे की, ग्रामीण भागांत बेरोजगारी वाढत आहे. या संख्येने कोरोना काळातील संख्येलाही मागे टाकले आहे. तथापि, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, एप्रिलच्या पिकानंतर मे व जून हे दोन महिने ग्रामीण भागांत बेरोजगारी वाढण्याचा काळ असतो. या आकड्यांमुळे चिंता करण्याची गरज नाही.

पाच मंत्रालयांचा टास्क फोर्स : केंद्र सरकारच्या कृषी, खाद्य, ग्रामीण विकास, वित्त, जलशक्ती या पाच मंत्रालयांच्या एका संयुक्त टास्क फोर्सचेही गठन केले जात आहे. त्याच्याकडून मान्सूनच्या या आव्हानाबाबत देशभरात निपटण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

 

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलCentral Governmentकेंद्र सरकार