शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

दिलासादायक! यंदा देशात सरासरीच्या ९८ टक्के पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 14:55 IST

monsoon: भारतीय हवामान विभागाने बळीराजासाठी दिलासादायक माहिती दिली आहे.

ठळक मुद्देयंदाच्या मान्सूचा हवामान विभागाने वर्तवला अंदाज सरासरीच्या ९८ टक्के पावसाचा अंदाजबळीराजासाठी दिलासादायक माहिती

नवी दिल्ली: जागतिक हवामान बदलामुळे भारतातील मान्सुनचे गणित बिघडत चालल्याचे म्हटले जात आहे. एकीकडे कोरोनाचे संकट संपूर्ण देशात तीव्र आणि अधिक गडद होताना दिसत आहे. तर, दुसरीकडे पीकांची वाहतूक, वितरण आणि विक्रीसाठी निर्बंध आल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला पाहायला मिळत आहे. मात्र, या सर्व परिस्थितीत भारतीय हवामान विभागाने बळीराजासाठी दिलासादायक माहिती दिली आहे. यंदाच्या वर्षी सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज केंद्रीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. (monsoon 98 percent rain for all over country this year imd forecast)

केंद्रीय हवामान विभागाने ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली. यंदाच्या मान्सूनच्या हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण देशभरात पावसाचा अंदाज हवामान विभागामार्फत जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या पावसाच्या मौसमात पावसाचा अंदाज हा सरासरी ९६ टक्के ते १०४ टक्के दरम्यान लॉग पिरियड एव्हरेज (एलपीए) असा असेल, असे सांगितले जात आहे. 

Tesla ला भारतात कार बनविण्यात अडचणी? नितीन गडकरींनी दाखवला 'खुश्कीचा' मार्ग

कुठे सरासरीपेक्षा अधिक पाऊस

महाराष्ट्रासह, गुजरात, गोवा यासारख्या राज्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परिस्थितीनुसार हवामान विभागाकडून दीर्घ कालावधीसाठीचा दोन टप्प्यांमध्ये सरासरी अंदाज वर्तवला जातो. 

देशभरात मान्सूनचा प्रवास कसा राहील?

एप्रिल महिन्यात एक आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा अंदाज दिला जातो. दुसरा अंदाज अधिक सविस्तरपणे दिला जातो. यामध्ये देशभरात मान्सूनचा प्रवास कसा राहील, याविषयी सविस्तर माहिती दिली जाते. केंद्रीय हवामान विभागाकडून पावसाचं प्रमाण सामान्य आहे, कमी आहे किंवा जास्त आहे हे ठरवण्याचे काही मापदंड ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार पाऊस आणि मान्सून याचा अंदाज लावला जातो. 

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलagricultureशेतीFarmerशेतकरी