शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 11:48 IST

Priyanka Chaturvedi : शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत पाकिस्तानशी राजनैतिक संबंध तोडले. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगण्यात आलं आणि सिंधू पाणी करारही स्थगित करण्यात आला आहे. मात्र दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि पाकिस्तानची क्रिकेट टीम आशिया कपमध्ये आमने-सामने येणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांनी रविवारी सरकार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) आगामी आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना खेळण्याची परवानगी दिल्याबद्दल जोरदार हल्लाबोल केला आहे. भारताचे जवा आणि नागरिकांच्या रक्तापेक्षा आर्थिक हितांना प्राधान्य देण्यात आलं आहे असा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांनी याला 'ब्लड मनी' म्हटलं. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या चतुर्वेदी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत म्हटलं की, "जेव्हा आपल्या भारतीयांच्या आणि जवानांच्या रक्तापेक्षा पैसा जास्त महत्त्वाचा असतो. ऑपरेशन सिंदूरबाबत ढोंगीपणा दाखवणाऱ्या केंद्र सरकारला लाज वाटली पाहिजे आणि प्रिय बीसीसीआय, हे फक्त ब्लड मनी नाहीत जे तुम्ही कमवू इच्छित आहात, तर ते शापित पैसे देखील आहेत."

आशियाई क्रिकेट काऊंसिलने (एसीसी) दुबई आणि अबुधाबीमधील स्पर्धेचं वेळापत्रक आणि ठिकाणं अधिकृतपणे जाहीर केल्यानंतर काही तासांतच प्रियंका चतुर्वेदी यांनी हे विधान केलं आहे. यामध्ये भारत-पाकिस्तान सामना 'ब्लॉकबस्टर सामना' असल्याच वर्णन केलं होतं. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १४ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे आणि सुपर फोर आणि फायनल दरम्यान पुन्हा सामने खेळवता येतील असंही ACC ने म्हटलं आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान