शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 11:48 IST

Priyanka Chaturvedi : शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत पाकिस्तानशी राजनैतिक संबंध तोडले. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगण्यात आलं आणि सिंधू पाणी करारही स्थगित करण्यात आला आहे. मात्र दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि पाकिस्तानची क्रिकेट टीम आशिया कपमध्ये आमने-सामने येणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांनी रविवारी सरकार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) आगामी आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना खेळण्याची परवानगी दिल्याबद्दल जोरदार हल्लाबोल केला आहे. भारताचे जवा आणि नागरिकांच्या रक्तापेक्षा आर्थिक हितांना प्राधान्य देण्यात आलं आहे असा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांनी याला 'ब्लड मनी' म्हटलं. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या चतुर्वेदी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत म्हटलं की, "जेव्हा आपल्या भारतीयांच्या आणि जवानांच्या रक्तापेक्षा पैसा जास्त महत्त्वाचा असतो. ऑपरेशन सिंदूरबाबत ढोंगीपणा दाखवणाऱ्या केंद्र सरकारला लाज वाटली पाहिजे आणि प्रिय बीसीसीआय, हे फक्त ब्लड मनी नाहीत जे तुम्ही कमवू इच्छित आहात, तर ते शापित पैसे देखील आहेत."

आशियाई क्रिकेट काऊंसिलने (एसीसी) दुबई आणि अबुधाबीमधील स्पर्धेचं वेळापत्रक आणि ठिकाणं अधिकृतपणे जाहीर केल्यानंतर काही तासांतच प्रियंका चतुर्वेदी यांनी हे विधान केलं आहे. यामध्ये भारत-पाकिस्तान सामना 'ब्लॉकबस्टर सामना' असल्याच वर्णन केलं होतं. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १४ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे आणि सुपर फोर आणि फायनल दरम्यान पुन्हा सामने खेळवता येतील असंही ACC ने म्हटलं आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान