शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 11:48 IST

Priyanka Chaturvedi : शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत पाकिस्तानशी राजनैतिक संबंध तोडले. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगण्यात आलं आणि सिंधू पाणी करारही स्थगित करण्यात आला आहे. मात्र दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि पाकिस्तानची क्रिकेट टीम आशिया कपमध्ये आमने-सामने येणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांनी रविवारी सरकार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) आगामी आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना खेळण्याची परवानगी दिल्याबद्दल जोरदार हल्लाबोल केला आहे. भारताचे जवा आणि नागरिकांच्या रक्तापेक्षा आर्थिक हितांना प्राधान्य देण्यात आलं आहे असा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांनी याला 'ब्लड मनी' म्हटलं. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या चतुर्वेदी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत म्हटलं की, "जेव्हा आपल्या भारतीयांच्या आणि जवानांच्या रक्तापेक्षा पैसा जास्त महत्त्वाचा असतो. ऑपरेशन सिंदूरबाबत ढोंगीपणा दाखवणाऱ्या केंद्र सरकारला लाज वाटली पाहिजे आणि प्रिय बीसीसीआय, हे फक्त ब्लड मनी नाहीत जे तुम्ही कमवू इच्छित आहात, तर ते शापित पैसे देखील आहेत."

आशियाई क्रिकेट काऊंसिलने (एसीसी) दुबई आणि अबुधाबीमधील स्पर्धेचं वेळापत्रक आणि ठिकाणं अधिकृतपणे जाहीर केल्यानंतर काही तासांतच प्रियंका चतुर्वेदी यांनी हे विधान केलं आहे. यामध्ये भारत-पाकिस्तान सामना 'ब्लॉकबस्टर सामना' असल्याच वर्णन केलं होतं. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १४ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे आणि सुपर फोर आणि फायनल दरम्यान पुन्हा सामने खेळवता येतील असंही ACC ने म्हटलं आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान