शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

क्षण अभिमानाचा ! 'चांद्रयान 2' मोहिमेचं नेतृत्व करतेय 'रॉकेट वुमन रितु'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 20:29 IST

चांद्रयान 2 जेव्हा चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल, तेव्हा 130 कोटी भारतीयांसाठी हा क्षण अभिमानाचा असणार आहे.

नवी दिल्ली - भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम असलेल्या चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून 15 जुलै रोजी पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी चांद्रयान-2 चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. या मोहिमे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारताचे हे यान चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यास चंद्रावर उतरणारा भारत हा जगातला चौथ्या क्रमांकाच देश ठरणार आहे. जगाचे लक्ष लागलेल्या या चांद्रयान 2 मोहिमेचं नेतृत्व एक महिला करत आहे. त्यामुळे महिलाशक्तीचाही अभिमान या मोहिमेसह जोडला गेलेला आहे. 

चांद्रयान 2 जेव्हा चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल, तेव्हा 130 कोटी भारतीयांसाठी हा क्षण अभिमानाचा असणार आहे. मात्र, उत्तर प्रदेश आणि विशेषत: लखनौवासियांसाठी हा क्षण अत्यानंदाचा असेल. कारण, इस्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि लखनौ कन्या रितु करिधाल श्रीवास्तव या मिशन चांद्रयान 2 च्या डायरेक्टर आहेत. मला नेहमीच ग्रह-ताऱ्यांचं आकर्षण राहिलं आहे. ताऱ्यांनी मला नेहमीच आपल्याकडे ओढलं आहे. अवकाशातील त्या अंधाऱ्या जगात काय असेल? याची उत्सुकता मला बालपणापासून होती. त्यामुळे विज्ञान हे माझ्यासाठी केवळ विषय नसून एक जुनून असल्याचे रितु करिधाल यांनी म्हटलं आहे. रितु यांनी इस्रोमध्ये अनेक महत्त्वांकाक्षी प्रकल्पांवर काम केलं आहे. चांद्रयान 2 या मोहिमेकडे जगभराचे लक्ष लागले असून देशातील 130 कोटी भारतीयांचाही उत्साह या प्रकल्पासोबत जोडला गेला आहे. आमच्याजवळ कुठलाही अनुभव नव्हता, पण सर्व शास्त्रज्ञांची टीम दिवस-रात्र मेहनत घेत होती. त्यांच्या अनुभवातूनच आम्हे हे मिशन करुन दाखवलं, असेही रितु यांनी सांगितलं. 

रितु या लखनौच्या राजाजीपुरम येथील रहिवासी आहेत. रितु यांच्या आई-वडिलांचे निधन झाले असून त्याचे भाऊ रोहित यांनी आपल्या बहिणीचा अभिमान असल्याचे म्हटले. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन रितु यांनी केले आहे. 

रितु करिधाल श्रीवास्तव : - लखनौ विश्वविद्यालयातून फिजिक्स विषयात पदवी संपादन.इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायंसेजमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. येथूनच एअरोस्पेस इंजिनिअरींगची पदवी संपादन केली. 1997 साली इस्रोमध्ये नोकरीला सुरुवातमंगलयान मध्ये डेप्युटी डायरेक्टर म्हणून कार्यभार सांभाळलाचांद्रयान 2 मध्ये मिशन डायरेक्टर

अभिमानाची बाब देशासाठी अद्भूत क्षण असून चंद्रावर यान पाठविणाऱ्या काही निवडक देशांमध्ये भारताचा समावेश होत आहे. लखनौच्या कन्येच्या नेतृत्वात ही कामगिरी होत असल्याचा अभिमान आहे. डॉ. अलोक धवन, डायरेक्टर IITR 

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रो