शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"महाकुंभमेळ्यात स्नान करून मोक्ष मिळत नाही, तर...", श्री श्री रविशंकर यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 11:44 IST

Sri Sri Ravi Shankar : मंगळवारी जिंदमधील सेक्टर ७-अ मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगने (Art of Living) एका आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Sri Sri Ravi Shankar :  जिंद : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. या महाकुंभमेळ्याबाबत आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi Shankar) यांनी एक मोठे विधान केले आहे. मंगळवारी जिंदमधील सेक्टर ७-अ मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगने (Art of Living) एका आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी, महाकुंभात केवळ संगमात स्नान केल्याने मोक्ष मिळत नाही, तर मोक्ष मिळविण्यासाठी ज्ञान सुद्धा आवश्यक आहे, असे श्री श्री रविशंकर म्हणाले. 

या कार्यक्रमात शेतकरी आणि खाप संघटनांचे प्रतिनिधी आणि तरुणांनी सहभाग घेतला होता. यावेळी, श्री श्री रविशंकर यांनी पिके आणि जात वाचवण्याचा संदेश दिला. तसेच, प्रत्येक गावातील लोकांना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी मोहीम सुरू करा, अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या लोकांना योगाकडे वळवा आणि अंमली पदार्थ विकणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्या, असे आवाहन श्री श्री रविशंकर यांनी खाप पंचायतींना केले. 

आपण शेतकऱ्यांसोबत आहेत. पण, शेतकऱ्यांनी आनंदासोबतच समजूतदारही राहिले पाहिजे. तसेच, महाकुंभात केवळ संगमात स्नान केल्याने मोक्ष मिळत नाही, तर मोक्ष मिळविण्यासाठी ज्ञान सुद्धा आवश्यक आहे, असे श्री श्री रविशंकर  म्हणाले. याचबरोबर, खाप पंचायतींच्या मोहिमेला पाठिंबा देत श्री श्री रविशंकर यांनी सांगितले की, लग्न एकाच गावात आणि एकाच कुळात होऊ नये. हे जात वाचवण्यासाठी महत्वाचे आहे. त्यामुळे हिंदू विवाह कायद्यात सुधारणा झाली पाहिजे. हे रूढीवादी नाही तर याला वैज्ञानिक आधार आहे.

दरम्यान, हरयाणातील खाप पंचायती बऱ्याच दिवसांपासून एकाच गोत्रात आणि एकाच गावात होणाऱ्या विवाहांना विरोध करत आहेत. याबाबत अनेकदा आंदोलने सुद्धा झाली आहेत. अशा परिस्थितीत जिंदमधून श्री श्री रविशंकर यांनीही खाप पंचायतींच्या या जुन्या मागणीला पाठिंबा दर्शविला  आहे. यामुळे खाप पंचायतींच्या मागणीला अधिक बळकटी मिळाली आहे, तर हिंदू विवाह कायद्यात सुधारणा करण्याची खाप पंचायतींची मागणीही मोठ्या व्यासपीठावरून उठवण्यात आली आहे.

टॅग्स :HaryanaहरयाणाPrayagrajप्रयागराजKumbh Melaकुंभ मेळा