शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

‘जय श्री राम’ म्हणणाऱ्यांना मोहन भागवत यांचा महत्वाचा सल्ला, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 10:57 IST

गेल्या 75 वर्षात आपण योग्य दिशेने प्रगती केली नसल्यामुळे देशाचा विकास झाला नाही.

नवी दिल्ली:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी सतत धर्म आणि देवाचे नाव घेणाऱ्यांना सुनावलं आहे. संत ईश्वर सन्मान समारोह 2021 मध्ये बोलत असताना भागवत म्हणाले की, 'आपण जय श्री रामच्या घोषणा देतो, पण आपण त्यांच्यासारखे बनले पाहिजे. रामाने दाखवलेल्या मार्गावर चालण्याची गरज आहे.'

भागवतांचा मोठा सल्ला

दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात संघप्रमुख भागवत म्हणाले की, 'आम्ही जय श्री रामचा नारा खूप जोरात लावतो. पण आपणही त्यांच्यासारखे व्हायला हवे. भरतासारख्या भावावर फक्त देवच प्रेम करू शकतात, आपण करू शकत नाही, असा सर्वसामान्यांचा समज आहे. त्यामुळेच अनेकजण रामाच्या मार्गावर जात नाहीत. रामाप्रमाणे स्वतःचा स्वार्थ सोडून लोकांचे भले करणे अवघड काम आहे.

भागवत पुढे म्हणतात, मनापासून काम केले तर देशाची प्रगती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यासाठी सर्वांना आपला भाऊ मानला पाहिजे. सेवा आणि लोककल्याणाची कामे केवळ घोषणा देऊन होत नाहीत, तर त्यासाठी पूर्ण जाणीवेने जमिनीवर उभे राहून काम करावे लागते. गेल्या 75 वर्षात आपण त्या दिशेने प्रगती केली नसल्यामुळे देशाचा विकास झाला नाही. पण,जर आपण आपला अहंकार बाजूला ठेवून काम केले तर आपण हे ध्येय गाठू शकतो. RSS संघटना ही सेवा संबंधित कार्यक्रमांसाठीही ओळखली जाते, असे ते म्हणाले. तसेच, संघाचे स्वयंसेवक आणि संपूर्ण देशातील येणाऱ्या पिढ्याही मूल्यांनी परिपूर्ण व्हाव्यात, यासाठी भारतीय कुटुंबातील आचार-विचार प्राधान्याने लक्षात घेऊन काम करण्याचा सल्ला मोहन भागवत यांनी यावेळी दिला आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत