शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

“आम्हाला कोणाचेही धर्मांतर करायचे नाही, तर चांगला माणूस घडवायचाय”: मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 10:45 IST

आपल्याला भारताला आणखी समृद्ध बनवायचे आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

रायपूर: आम्हाला कोणाचाही धर्म बदलायचा नाही, तर माणसाला समृद्ध जीवन जगण्याची पद्धत शिकवायची आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले आहे. छत्तीसगड येथे आयोजित करण्यात आलेल्या घोष शिबिरात ते बोलत होते. 

आपल्याला कोणाचे धर्मांतर करायचे नाही, तर कसे जगायचे हे शिकवायचे आहे. आपण भारतभूमीत जन्मलो आहोत आणि आमचा पंथ कोणाचीही उपासना पद्धत न बदलता चांगला माणूस घडवू शकतो, अशी शिकवण आपल्याला संपूर्ण जगाला करून द्यायची आहे, असे मोहन भागवत यांनी यावेळी बोलतना नमूद केले. 

विश्वगुरू बनण्यासाठी समन्वयाने पुढे जाण्याची गरज

भारताला विश्वगुरू बनवायचे असेल, तर सर्वांना सोबत घेऊन समन्वयाने पुढे जाण्याची गरज आहे. आपल्याला भारताला आणखी समृद्ध बनवायचे आहे. देशाची व्यवस्था कोणी बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल, तर ती चांगली बाब नाही. या परिस्थितीत काय करायचे, हे देशाने ठरवायचे आहे, असेही मोहन भागवत यांनी म्हटले आहे. आपल्यासाठी संपूर्ण जग हे एका कुटुंबासारखे आहे. आपल्या व्यवहाराने वागण्याने हे सत्य जगाला पटवून दिले पाहिजे. माणसामध्ये असलेल्या गुणांमुळे त्याचा विकास होतो आणि त्या गुणांचा विकास कसा केला जातो, हे जगाला माहिती आहे. ही बाब समजून घेण्याची गरज आहे, असे मोहन भागवत म्हणाले. 

हाच आपला धर्म आहे

पूजा-उपासना पद्धती, जातपात, भाषा यांमध्ये विविधता असूनही आपलेपणाची वागणूक ही सर्वांना एकजुटीने मिळून-मिसळून राहण्याची शिकवण देते. यामुळे आपण कोणालाही परकेपणाची वागणूक देत नाही. हीच आपल्या धर्माची शिकवण आहे, हाच आपला धर्म आहे. या माध्यमातून लोकांना समृद्ध जीवन जगण्याची पद्धत शिकवली जाऊ शकते. हरवलेले व्यवहारिक संतुलन परत मिळवता येऊ शकते, असे मोहन भागवत यांनी यावेळी सांगितले.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत