शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

“आम्हाला कोणाचेही धर्मांतर करायचे नाही, तर चांगला माणूस घडवायचाय”: मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 10:45 IST

आपल्याला भारताला आणखी समृद्ध बनवायचे आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

रायपूर: आम्हाला कोणाचाही धर्म बदलायचा नाही, तर माणसाला समृद्ध जीवन जगण्याची पद्धत शिकवायची आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले आहे. छत्तीसगड येथे आयोजित करण्यात आलेल्या घोष शिबिरात ते बोलत होते. 

आपल्याला कोणाचे धर्मांतर करायचे नाही, तर कसे जगायचे हे शिकवायचे आहे. आपण भारतभूमीत जन्मलो आहोत आणि आमचा पंथ कोणाचीही उपासना पद्धत न बदलता चांगला माणूस घडवू शकतो, अशी शिकवण आपल्याला संपूर्ण जगाला करून द्यायची आहे, असे मोहन भागवत यांनी यावेळी बोलतना नमूद केले. 

विश्वगुरू बनण्यासाठी समन्वयाने पुढे जाण्याची गरज

भारताला विश्वगुरू बनवायचे असेल, तर सर्वांना सोबत घेऊन समन्वयाने पुढे जाण्याची गरज आहे. आपल्याला भारताला आणखी समृद्ध बनवायचे आहे. देशाची व्यवस्था कोणी बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल, तर ती चांगली बाब नाही. या परिस्थितीत काय करायचे, हे देशाने ठरवायचे आहे, असेही मोहन भागवत यांनी म्हटले आहे. आपल्यासाठी संपूर्ण जग हे एका कुटुंबासारखे आहे. आपल्या व्यवहाराने वागण्याने हे सत्य जगाला पटवून दिले पाहिजे. माणसामध्ये असलेल्या गुणांमुळे त्याचा विकास होतो आणि त्या गुणांचा विकास कसा केला जातो, हे जगाला माहिती आहे. ही बाब समजून घेण्याची गरज आहे, असे मोहन भागवत म्हणाले. 

हाच आपला धर्म आहे

पूजा-उपासना पद्धती, जातपात, भाषा यांमध्ये विविधता असूनही आपलेपणाची वागणूक ही सर्वांना एकजुटीने मिळून-मिसळून राहण्याची शिकवण देते. यामुळे आपण कोणालाही परकेपणाची वागणूक देत नाही. हीच आपल्या धर्माची शिकवण आहे, हाच आपला धर्म आहे. या माध्यमातून लोकांना समृद्ध जीवन जगण्याची पद्धत शिकवली जाऊ शकते. हरवलेले व्यवहारिक संतुलन परत मिळवता येऊ शकते, असे मोहन भागवत यांनी यावेळी सांगितले.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत