शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

आम्ही अहिंसेवर बोलू, पण हातात काठीही ठेवू, कारण...; मोहन भागवतांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 14:37 IST

सरसंघचालक मोहन भागवत यांचं अखंड भारताबद्दल महत्त्वपूर्ण विधान

हरिद्वार: अखंड भारताचा मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेहमीच अजेंड्यावर राहिला आहे. याबद्दल सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. सनातन धर्मच हिंदू राष्ट्र आहे. २० ते २५ वर्षांत अखंड भारत तयार होईल. पण आपण जर थोडे प्रयत्न केल्यास स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातील अखंड भारत १० ते १५ वर्षांत आकाराला येईल, असं भागवत म्हणाले.

अखंड भारताच्या निर्मितीला रोखण्यासाठी कोणीही पुढे येणार नाही. कारण याच्यामध्ये कोणीही येईल तो संपेल, असं सरसंघचालकांनी म्हटलं. भगवान श्रीकृष्णाच्या करंगळीवर ज्याप्रकारे गोवर्धन पर्वत उचलला गेला, त्याचप्रकारे संतांच्या आशीर्वादानं भारत पुन्हा एकदा लवकरच अखंड भारत होईल. अखंड भारताची निर्मिती कोणीही रोखू शकणार नाही. सर्वसामान्यांनी थोडे प्रयत्न केल्यास स्वामी विवेकानंद, महर्षी अरविंद यांचं अखंड भारताचं स्वप्न १० ते १५ वर्षांत साकार होईल, असं भागवत म्हणाले.

अखंड भारताच्या दिशेनं आपली वाटचाल सुरू आहे. या मार्गात कोणीही आल्यास ते संपून जातील, असं विधान भागवत यांनी केलं. आपण सगळ्यांनी एक होऊन देशासाठी जगायची मरायची तयारी ठेवायला हवी. अखंड भारताच्या निर्मितीला २० ते २५ वर्षांचा कालावधी लागेल, असा मला वाटतं. आपण गती वाढवल्यास हाच कालावधी निम्म्यावर येईल आणि हे व्हायला हवं. आपण अहिंसेची भाषा करू. पण हातात काठीही ठेऊ. कारण हे जग सामर्थ्याची भाषा समजतं, असं भागवतांनी म्हटलं.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत