शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

"मोहन भागवत खोटं बोलतायत, प्रणब मुखर्जी असताना का नाही बोलले"? बिशप भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 13:44 IST

भागवत यांनी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या नावाचा उल्लेख करत, एक विधान केले होते. ज्यावरून ख्रिश्चन समाजातील बिशप मंडळींनी हे 'खोटे' आणि 'बनावट' वक्तव्य असल्याचे म्हटले आहे...

भारतात कॅथोलिक समाजाच्या सर्वोच्च संस्थेने गुरुवारी धर्मांतरण आणि आदिवासी समाजाशी संबंधित सरसंघचालक मोहन भागवत यांच्या एका विधानावर प्रश्न उपस्थित केला आहे. भागवत यांनी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या नावाचा उल्लेख करत, एक विधान केले होते. ज्यावरून ख्रिश्चन समाजातील बिशप मंडळींनी हे 'खोटे' आणि 'बनावट' वक्तव्य असल्याचे म्हटले आहे. ‘कॅथोलिक बिशप्स कॉन्फ्रेंस ऑफ इंडिया’ने (सीबीसीआय) गुरुवारी त्यांच्या या विधानावर टीका केली.

काय म्हणाले होते भागवत? -टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, भागवत सोमवारी इंदूरमध्ये एका भाषणात म्हणाले, "जेव्हा संसदेत 'घर वापसी' मुद्द्यावरून गदारोळ सुरू होता, तेव्हा आपण देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची भेट घेतली होती. तेव्हा इतर धर्मातून हिंदू धर्मात परतणाऱ्या लोकांसंदर्भात देशभरात जबरदस्त चर्चा सुरू होती. त्यावेळी ते मला म्हणाले होते की, "आपण हे काय करत आहात? यामुळे वाद निर्माण होतो. कारण हे राजकारण आहे. जर मी राष्ट्रपती नसतो आणि काँग्रेस पक्षात असतो, तर मीही संसदेत विरोध करताना दिसलो असतो. 

पुढे बोलताना भागवत म्हणाले, "यानंतर प्रणब मुखर्जी बोलले की, 'पण आपण जे काम केले आहे, त्यामुळे 30 टक्के आदिवासी...' त्यांना काय बोलायचे होते ते मला समजले आणि मी खूश झालो. यावर मी म्हणालो, '...(अन्यथा) मी ख्रिश्चन झालो असतो?' यावर ते म्हणाले, 'ख्रिश्चन नव्हे, राष्ट्र-विरोधी'". 

या संदर्भात, कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, "भारताच्या माजी राष्ट्रपतींच्या नावाने बनावट वैयक्तिक संभाषण आणि संशयासंपद विश्वसनीयता असलेल्या संघटनेच्य निहित स्वार्थाने मरणोत्तर बोलणे, छापणे एक महत्वाचा आणि गंभीर मुद्दा आहे. 

डॉ. प्रणब मुखर्जी हयात असताना का बोलले नाही?"डॉ. प्रणब मुखर्जी हयात असताना मोहन भागवत का बोलले नाही? त्यांचा हेतू वाईट, भयावह आणि अवास्तविक असल्याचे दिसते. हे वक्तव्य खरे असेल आणि माजी राष्ट्रपतींनी असे काही म्हटले असेल, असे आम्हाल वाटत नाही. आम्ही राष्ट्राप्रति असलेले त्यांचे योगदान आणि मातृभूमीच्या बहुलवादी धर्मनिरपेक्षतेच्या त्यांच्या आदरयुक्त विचारांचा आदर करतो. 'गेल्या अनेक दशकांपासूनच्या हिंसक भारतीय इतिहासाशी संबंधित असलेल्या तीन वेळा बंदी घातलेल्या संघटनेला, अहिंसक, शांतिप्रिय आणि सेवाभावी ख्रिश्च समाजाला राष्ट्र-विरोधी म्हणण्याची सूट आहे,' हे दुर्देवी आहे," असेही कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाने म्हटले आहे.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघPranab Mukherjeeप्रणव मुखर्जी