शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

"मोहन भागवत खोटं बोलतायत, प्रणब मुखर्जी असताना का नाही बोलले"? बिशप भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 13:44 IST

भागवत यांनी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या नावाचा उल्लेख करत, एक विधान केले होते. ज्यावरून ख्रिश्चन समाजातील बिशप मंडळींनी हे 'खोटे' आणि 'बनावट' वक्तव्य असल्याचे म्हटले आहे...

भारतात कॅथोलिक समाजाच्या सर्वोच्च संस्थेने गुरुवारी धर्मांतरण आणि आदिवासी समाजाशी संबंधित सरसंघचालक मोहन भागवत यांच्या एका विधानावर प्रश्न उपस्थित केला आहे. भागवत यांनी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या नावाचा उल्लेख करत, एक विधान केले होते. ज्यावरून ख्रिश्चन समाजातील बिशप मंडळींनी हे 'खोटे' आणि 'बनावट' वक्तव्य असल्याचे म्हटले आहे. ‘कॅथोलिक बिशप्स कॉन्फ्रेंस ऑफ इंडिया’ने (सीबीसीआय) गुरुवारी त्यांच्या या विधानावर टीका केली.

काय म्हणाले होते भागवत? -टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, भागवत सोमवारी इंदूरमध्ये एका भाषणात म्हणाले, "जेव्हा संसदेत 'घर वापसी' मुद्द्यावरून गदारोळ सुरू होता, तेव्हा आपण देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची भेट घेतली होती. तेव्हा इतर धर्मातून हिंदू धर्मात परतणाऱ्या लोकांसंदर्भात देशभरात जबरदस्त चर्चा सुरू होती. त्यावेळी ते मला म्हणाले होते की, "आपण हे काय करत आहात? यामुळे वाद निर्माण होतो. कारण हे राजकारण आहे. जर मी राष्ट्रपती नसतो आणि काँग्रेस पक्षात असतो, तर मीही संसदेत विरोध करताना दिसलो असतो. 

पुढे बोलताना भागवत म्हणाले, "यानंतर प्रणब मुखर्जी बोलले की, 'पण आपण जे काम केले आहे, त्यामुळे 30 टक्के आदिवासी...' त्यांना काय बोलायचे होते ते मला समजले आणि मी खूश झालो. यावर मी म्हणालो, '...(अन्यथा) मी ख्रिश्चन झालो असतो?' यावर ते म्हणाले, 'ख्रिश्चन नव्हे, राष्ट्र-विरोधी'". 

या संदर्भात, कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, "भारताच्या माजी राष्ट्रपतींच्या नावाने बनावट वैयक्तिक संभाषण आणि संशयासंपद विश्वसनीयता असलेल्या संघटनेच्य निहित स्वार्थाने मरणोत्तर बोलणे, छापणे एक महत्वाचा आणि गंभीर मुद्दा आहे. 

डॉ. प्रणब मुखर्जी हयात असताना का बोलले नाही?"डॉ. प्रणब मुखर्जी हयात असताना मोहन भागवत का बोलले नाही? त्यांचा हेतू वाईट, भयावह आणि अवास्तविक असल्याचे दिसते. हे वक्तव्य खरे असेल आणि माजी राष्ट्रपतींनी असे काही म्हटले असेल, असे आम्हाल वाटत नाही. आम्ही राष्ट्राप्रति असलेले त्यांचे योगदान आणि मातृभूमीच्या बहुलवादी धर्मनिरपेक्षतेच्या त्यांच्या आदरयुक्त विचारांचा आदर करतो. 'गेल्या अनेक दशकांपासूनच्या हिंसक भारतीय इतिहासाशी संबंधित असलेल्या तीन वेळा बंदी घातलेल्या संघटनेला, अहिंसक, शांतिप्रिय आणि सेवाभावी ख्रिश्च समाजाला राष्ट्र-विरोधी म्हणण्याची सूट आहे,' हे दुर्देवी आहे," असेही कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाने म्हटले आहे.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघPranab Mukherjeeप्रणव मुखर्जी