शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

मोहम्मद युनूस यांचा पंतप्रधान मोदींना फोन; बांगलादेशातील हिंदूंबाबत दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 17:14 IST

बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे.

Mohammad Yunus spoke to PM Modi :बांगलादेशात सत्तांतरानंतर हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबाबत भारताने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर देश सोडून पळ काढला होता. त्यानंतर लोकांनी बांगलादेशातील अल्पसंख्यांकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी हिंदू मंदिरांवर हल्ले करण्यात आले. त्यामुळे भारत सरकारने याबाबत बांगलादेशकडे याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर आता बांगलादेशातल्या अंतरिम सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणाचे आश्वासन दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांनी बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर बांगलादेश सरकारचे सल्लागार प्रोफेसर मुहम्मद युनूस हे माझ्याशी फोनवर बोलले. त्यांनी सद्यस्थितीवर विचार विनिमय केला असल्याचे म्हटलं आहे. यावेळी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेबाबतही चर्चा झाली.

यावेळी बांगलादेशातील  लोकशाही, स्थिर, शांततापूर्ण आणि प्रगतीशील होण्यासाठी भारताच्या समर्थनाचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदींनी केला आहे. तसेच, प्रोफेसर युनूस यांनी बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची आणि संरक्षणाची हमी दिली. बांगलादेशच्या मुख्य सल्लागारांशी बोललो आणि सर्व अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यावर भर दिल्याचे पंतप्रधान मोदींनी त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. बांगलादेशसोबतचे मजबूत संबंध अधिक सुधारण्यासाठी भारत सदैव तत्पर आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

"बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी हा फोन केला होता. सद्यस्थितीवर विचार विनिमय केला. लोकशाही, स्थिर, शांततापूर्ण आणि प्रगतीशील बांगलादेशासाठी भारताच्या समर्थनाचा पुनरुच्चार केला. त्यांनी बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले," असं पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी हिंसाचारग्रस्त बांगलादेशातील परिस्थिती लवकरच सामान्य होईल अशी आशा व्यक्त केली आहे. शेजारील देशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत १४० कोटी भारतीय चिंतेत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशNarendra Modiनरेंद्र मोदी