शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

मोहम्मद युनूस यांचा पंतप्रधान मोदींना फोन; बांगलादेशातील हिंदूंबाबत दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 17:14 IST

बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे.

Mohammad Yunus spoke to PM Modi :बांगलादेशात सत्तांतरानंतर हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबाबत भारताने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर देश सोडून पळ काढला होता. त्यानंतर लोकांनी बांगलादेशातील अल्पसंख्यांकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी हिंदू मंदिरांवर हल्ले करण्यात आले. त्यामुळे भारत सरकारने याबाबत बांगलादेशकडे याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर आता बांगलादेशातल्या अंतरिम सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणाचे आश्वासन दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांनी बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर बांगलादेश सरकारचे सल्लागार प्रोफेसर मुहम्मद युनूस हे माझ्याशी फोनवर बोलले. त्यांनी सद्यस्थितीवर विचार विनिमय केला असल्याचे म्हटलं आहे. यावेळी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेबाबतही चर्चा झाली.

यावेळी बांगलादेशातील  लोकशाही, स्थिर, शांततापूर्ण आणि प्रगतीशील होण्यासाठी भारताच्या समर्थनाचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदींनी केला आहे. तसेच, प्रोफेसर युनूस यांनी बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची आणि संरक्षणाची हमी दिली. बांगलादेशच्या मुख्य सल्लागारांशी बोललो आणि सर्व अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यावर भर दिल्याचे पंतप्रधान मोदींनी त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. बांगलादेशसोबतचे मजबूत संबंध अधिक सुधारण्यासाठी भारत सदैव तत्पर आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

"बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी हा फोन केला होता. सद्यस्थितीवर विचार विनिमय केला. लोकशाही, स्थिर, शांततापूर्ण आणि प्रगतीशील बांगलादेशासाठी भारताच्या समर्थनाचा पुनरुच्चार केला. त्यांनी बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले," असं पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी हिंसाचारग्रस्त बांगलादेशातील परिस्थिती लवकरच सामान्य होईल अशी आशा व्यक्त केली आहे. शेजारील देशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत १४० कोटी भारतीय चिंतेत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशNarendra Modiनरेंद्र मोदी