शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

'मोहम्मद अली जिना भारताचे तुकडे करणारे, तर सरदार पटेल भारताला एकत्र करणारे नेते आहेत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 16:07 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरदार पटेल आणि मोहम्मद अली जिना यांची बरोबरी केल्याबद्दल अखिलेश यादव यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

औरैया:उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरदार पटेल आणि मोहम्मद अली जिना यांची बरोबरी केल्याबद्दल अखिलेश यादव यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. योगी शनिवारी औरैयामध्ये म्हणाले की, 'मोहम्मद अली जिना आणि सरदार पटेल एक असू शकत नाहीत. सरदार पटेल हे देशातील संस्थानांचे एकत्रीकरण करून भारताचे एकीकरण करणारे नेते आहेत, तर दुसरीकडे मोहम्मद अली जिना भारताचे तुकडे करणारे नेते आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये 2022 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शनिवारी औरैयामधील एका कार्यक्रमात बोलताना योगी म्हणाले की, सरदार पटेल आणि जीना यांची बरोबरी करू पाहणाऱ्यांनी सावध राहावे. येणाऱ्या निवडणुकीत जनता अशा लोकांना योग्य उत्तर देईल. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार पटेल यांनी 500 हून अधिक संस्थानांचे विलीनीकरण करून भारत एक केला होता. 

योगी पुढे म्हणाले की, आधी राज्यात नेहमी दंगली व्हायच्या, पण आता दंगलखोरांच्या सात पिढ्या दंगल करण्याचा विचार करत नाहीत. राज्यात 70 वर्षांत केवळ 12 वैद्यकीय महाविद्यालये बांधली, मात्र भाजप 75 जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये देणार आहे. आधीच्या सरकारमध्ये सणासुदीला छोट्या व्यापाऱ्यांना लुटले जायचे, पण आता व्यापारी चांगल्या प्रकारे व्यापार करतोय. मी यूपीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अशी केली आहे की, आता दंगलखोरांच्या सात पिढ्याही दंगल करणार नाहीत. आम्ही राज्यातील सर्वांचा विकास केला आहे, पण कोणाचेही तुष्टीकरण केले नाही.

काय म्हणाले अखिलेश यादव ?31 ऑक्टोबर रोजी हरदोई येथे विजयी रथ घेऊन आलेले समाजवादी पक्षाचे सुप्रीमो अखिलेश यादव म्हणाले होते की, सरदार पटेल, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि जिना यांनी बॅरिस्टर म्हणून एकाच संस्थेत शिक्षण घेतले होते. त्यांना कोणत्याही प्रकारच्या संघर्षाला सामोरे जावे लागले तरी ते मागे हटले नाहीत. जे आज देशाविषयी बोलत आहेत ते जात-धर्मात आम्हाला आणि तुमच्यात फूट पाडण्याचे काम करत आहेत. जाती-धर्मात विभागले तर आपल्या देशाचे काय होईल? असं ते म्हणाले होते.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशAkhilesh Yadavअखिलेश यादव