शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

‘मन की बात’मधून मोदींनी दिला पाणी बचतीचा संदेश

By admin | Updated: April 25, 2016 03:54 IST

महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून पाण्याची बचत करण्याचा संदेश दिला.

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून पाण्याची बचत करण्याचा संदेश दिला. आपण पाण्याबाबत संवेदनशील असणे आवश्यक आहे. पाणी बचत ही लोकचळवळ बनली पाहिजे. जलसंवर्धनामुळे भूमिगत पाण्याची पातळी वाढेल आणि त्यासोबतच कृषी विकास होईल आणि जीडीपीमध्ये वृद्धी होईल. या दृष्टीने पावसाचे पाणी अडविण्यासाठी सामूहिक प्रयत्न झाले पाहिजेत, असे आवाहन मोदी यांनी केले.‘कितीही संकटे आली तरी एखादी गोड बातमी कानावर पडली की, सर्व संकटांचे निराकरण झाले, असे माणसाला वाटू लागते. हा मनुष्यस्वभाव आहे. यंदा मान्सून १०६ ते ११० टक्के बरसणार असल्याचा अंदाज वर्तविणारी माहिती सार्वजनिक झाल्यापासून एखादा मोठा शांतिसंदेश आल्यासारखे वाटू लागले आहे. अद्याप पाऊस पडायला वेळ आहे; परंतु चांगला पाऊस पडणार ही बातमीदेखील नवचैतन्य निर्माण करणारी ठरली आहे,’ असे मोदी म्हणाले.यंदा भीषण उष्णतेने आनंदात विरजण घातले आहे. देश चिंतित होणे स्वाभाविक आहे. त्यातच दुष्काळ पडल्याने चिंता वाटते. सतत दुष्काळ पडल्याने जलसाठे कोरडे पडतात. अनेकदा विविध कारणांमुळे जलस्रोत आटतो. दुष्काळाचा सामना करण्यासाठी आणि पाणी संकटावर मात करण्यासाठी सरकारने प्रयत्न तर केलेच पाहिजेत; परंतु नागरिकही आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. अनेक गावांमध्ये पाण्याबाबत जागृती दिसते. लोकांना पाण्याचे मूल्य कळले आहे, असे मोदी यांनी सांगितले.>शिक्षणात गुणवत्ता हवी शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. देशात शिक्षणाच्या विकासासाठी लोकसहभाग वाढला पाहिजे आणि शिक्षणात आमूलाग्र बदल करण्यात आले पाहिजे, असे मोदी म्हणाले. महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार गावातील लोकांनी पाणी बचतीसाठी केलेले प्रयत्न आणि पिकांच्या पॅटर्नमध्ये केलेला बदल याचा मोदींनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला. शिक्षणाच्या दुरवस्थेबाबत मुंबईच्या शर्मिला धारपुरे हिने फोनवर चिंता व्यक्त केली होती, त्याचा उल्लेख करून मोदी पुढे म्हणाले, शर्मिलाची चिंता उचित आहे. पाल्यांना चांगले शिक्षण देणे हेच प्रत्येक पालकाचे स्वप्न आहे. शिक्षणाच्या विकासासाठी अधिक जनजागृती व्हायला पाहिजे.गावकऱ्यांनी जास्त पाणी लागणारी ऊस, केळी यासारखी पिके न घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.>ग्राम उदय हीच भारत उदयाची हमी‘ग्राम उदयातून भारत उदय’ कार्यक्रम राबविल्याबद्दल राज्य सरकारांसह सर्व पक्षांचे आभार व्यक्त करून मोदी म्हणाले की, ग्राम उदय हीच भारत उदयाची हमी आहे. आपले सरकार ग्राम उदयवर जोर देत राहील. हा कार्यक्रम गावाच्या विकासासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी एका संधीच्या रूपात परिवर्तित केला पाहिजे.