शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

‘मन की बात’मधून मोदींनी दिला पाणी बचतीचा संदेश

By admin | Updated: April 25, 2016 03:54 IST

महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून पाण्याची बचत करण्याचा संदेश दिला.

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून पाण्याची बचत करण्याचा संदेश दिला. आपण पाण्याबाबत संवेदनशील असणे आवश्यक आहे. पाणी बचत ही लोकचळवळ बनली पाहिजे. जलसंवर्धनामुळे भूमिगत पाण्याची पातळी वाढेल आणि त्यासोबतच कृषी विकास होईल आणि जीडीपीमध्ये वृद्धी होईल. या दृष्टीने पावसाचे पाणी अडविण्यासाठी सामूहिक प्रयत्न झाले पाहिजेत, असे आवाहन मोदी यांनी केले.‘कितीही संकटे आली तरी एखादी गोड बातमी कानावर पडली की, सर्व संकटांचे निराकरण झाले, असे माणसाला वाटू लागते. हा मनुष्यस्वभाव आहे. यंदा मान्सून १०६ ते ११० टक्के बरसणार असल्याचा अंदाज वर्तविणारी माहिती सार्वजनिक झाल्यापासून एखादा मोठा शांतिसंदेश आल्यासारखे वाटू लागले आहे. अद्याप पाऊस पडायला वेळ आहे; परंतु चांगला पाऊस पडणार ही बातमीदेखील नवचैतन्य निर्माण करणारी ठरली आहे,’ असे मोदी म्हणाले.यंदा भीषण उष्णतेने आनंदात विरजण घातले आहे. देश चिंतित होणे स्वाभाविक आहे. त्यातच दुष्काळ पडल्याने चिंता वाटते. सतत दुष्काळ पडल्याने जलसाठे कोरडे पडतात. अनेकदा विविध कारणांमुळे जलस्रोत आटतो. दुष्काळाचा सामना करण्यासाठी आणि पाणी संकटावर मात करण्यासाठी सरकारने प्रयत्न तर केलेच पाहिजेत; परंतु नागरिकही आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. अनेक गावांमध्ये पाण्याबाबत जागृती दिसते. लोकांना पाण्याचे मूल्य कळले आहे, असे मोदी यांनी सांगितले.>शिक्षणात गुणवत्ता हवी शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. देशात शिक्षणाच्या विकासासाठी लोकसहभाग वाढला पाहिजे आणि शिक्षणात आमूलाग्र बदल करण्यात आले पाहिजे, असे मोदी म्हणाले. महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार गावातील लोकांनी पाणी बचतीसाठी केलेले प्रयत्न आणि पिकांच्या पॅटर्नमध्ये केलेला बदल याचा मोदींनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला. शिक्षणाच्या दुरवस्थेबाबत मुंबईच्या शर्मिला धारपुरे हिने फोनवर चिंता व्यक्त केली होती, त्याचा उल्लेख करून मोदी पुढे म्हणाले, शर्मिलाची चिंता उचित आहे. पाल्यांना चांगले शिक्षण देणे हेच प्रत्येक पालकाचे स्वप्न आहे. शिक्षणाच्या विकासासाठी अधिक जनजागृती व्हायला पाहिजे.गावकऱ्यांनी जास्त पाणी लागणारी ऊस, केळी यासारखी पिके न घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.>ग्राम उदय हीच भारत उदयाची हमी‘ग्राम उदयातून भारत उदय’ कार्यक्रम राबविल्याबद्दल राज्य सरकारांसह सर्व पक्षांचे आभार व्यक्त करून मोदी म्हणाले की, ग्राम उदय हीच भारत उदयाची हमी आहे. आपले सरकार ग्राम उदयवर जोर देत राहील. हा कार्यक्रम गावाच्या विकासासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी एका संधीच्या रूपात परिवर्तित केला पाहिजे.