शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
2
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
3
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
4
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
5
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
6
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
7
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
8
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
9
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
11
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
12
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
13
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
14
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
15
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
16
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
17
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
18
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
19
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
20
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!

‘मन की बात’मधून मोदींनी दिला पाणी बचतीचा संदेश

By admin | Updated: April 25, 2016 03:54 IST

महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून पाण्याची बचत करण्याचा संदेश दिला.

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून पाण्याची बचत करण्याचा संदेश दिला. आपण पाण्याबाबत संवेदनशील असणे आवश्यक आहे. पाणी बचत ही लोकचळवळ बनली पाहिजे. जलसंवर्धनामुळे भूमिगत पाण्याची पातळी वाढेल आणि त्यासोबतच कृषी विकास होईल आणि जीडीपीमध्ये वृद्धी होईल. या दृष्टीने पावसाचे पाणी अडविण्यासाठी सामूहिक प्रयत्न झाले पाहिजेत, असे आवाहन मोदी यांनी केले.‘कितीही संकटे आली तरी एखादी गोड बातमी कानावर पडली की, सर्व संकटांचे निराकरण झाले, असे माणसाला वाटू लागते. हा मनुष्यस्वभाव आहे. यंदा मान्सून १०६ ते ११० टक्के बरसणार असल्याचा अंदाज वर्तविणारी माहिती सार्वजनिक झाल्यापासून एखादा मोठा शांतिसंदेश आल्यासारखे वाटू लागले आहे. अद्याप पाऊस पडायला वेळ आहे; परंतु चांगला पाऊस पडणार ही बातमीदेखील नवचैतन्य निर्माण करणारी ठरली आहे,’ असे मोदी म्हणाले.यंदा भीषण उष्णतेने आनंदात विरजण घातले आहे. देश चिंतित होणे स्वाभाविक आहे. त्यातच दुष्काळ पडल्याने चिंता वाटते. सतत दुष्काळ पडल्याने जलसाठे कोरडे पडतात. अनेकदा विविध कारणांमुळे जलस्रोत आटतो. दुष्काळाचा सामना करण्यासाठी आणि पाणी संकटावर मात करण्यासाठी सरकारने प्रयत्न तर केलेच पाहिजेत; परंतु नागरिकही आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. अनेक गावांमध्ये पाण्याबाबत जागृती दिसते. लोकांना पाण्याचे मूल्य कळले आहे, असे मोदी यांनी सांगितले.>शिक्षणात गुणवत्ता हवी शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. देशात शिक्षणाच्या विकासासाठी लोकसहभाग वाढला पाहिजे आणि शिक्षणात आमूलाग्र बदल करण्यात आले पाहिजे, असे मोदी म्हणाले. महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार गावातील लोकांनी पाणी बचतीसाठी केलेले प्रयत्न आणि पिकांच्या पॅटर्नमध्ये केलेला बदल याचा मोदींनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला. शिक्षणाच्या दुरवस्थेबाबत मुंबईच्या शर्मिला धारपुरे हिने फोनवर चिंता व्यक्त केली होती, त्याचा उल्लेख करून मोदी पुढे म्हणाले, शर्मिलाची चिंता उचित आहे. पाल्यांना चांगले शिक्षण देणे हेच प्रत्येक पालकाचे स्वप्न आहे. शिक्षणाच्या विकासासाठी अधिक जनजागृती व्हायला पाहिजे.गावकऱ्यांनी जास्त पाणी लागणारी ऊस, केळी यासारखी पिके न घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.>ग्राम उदय हीच भारत उदयाची हमी‘ग्राम उदयातून भारत उदय’ कार्यक्रम राबविल्याबद्दल राज्य सरकारांसह सर्व पक्षांचे आभार व्यक्त करून मोदी म्हणाले की, ग्राम उदय हीच भारत उदयाची हमी आहे. आपले सरकार ग्राम उदयवर जोर देत राहील. हा कार्यक्रम गावाच्या विकासासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी एका संधीच्या रूपात परिवर्तित केला पाहिजे.