शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

मोदींची निवडणुकांपूर्वीची शेवटची 'मन की बात' ठरली 'शहिदों की बात' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 12:05 IST

भारतीय सैन्यानं नेहमीच कमालीचं धाडस दाखवलं आहे. एकीकडे संयम आणि धैर्य बाळगताना दुसरीकडे दहशतवादी आणि शत्रू राष्ट्रांना सैन्याने जशास तसे उत्तर दिले आहे

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभा निवडणुकापूर्वीची शेवटची 'मन की बात' केली. आजच्या मन की बात 'नॅशनल वॉर मेमोरियल स्मारक'ची माहिती दिली. सोमवार 25 फेब्रुवारी रोजी या राष्ट्रीय सैनिक स्मारकाचे लोकार्पण होणार आहे. देशाच्या लढवय्या सैनिकांच्या त्याग आणि बलिदानाचा सन्मान करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचं मोदींनी म्हटलंय. शेवटच्या मन की बात कार्यक्रमात मोदींनी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. तर, लोकसभा निवडणुकांपूर्वीची मन की बात ही 'शहीद जवानांची बात' ठरली.

भारतीय सैन्यानं नेहमीच कमालीचं धाडस दाखवलं आहे. एकीकडे संयम आणि धैर्य बाळगताना दुसरीकडे दहशतवादी आणि शत्रू राष्ट्रांना सैन्याने जशास तसे उत्तर दिले आहे. गेल्या 10 दिवसांपूर्वी भारतमातेने अनेक जवान गमावले आहेत. देशभरातून या घटनेचा तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे देशात सपोर्ट फॅमिली ऑफ शहीद जवान अशी लाट आल्याचे मोदींनी सांगितले. या हल्ल्यानंतर शहीद जवानांच्या कुटुबीयांनी दाखवलेलं धैर्य आणि देशभक्ती देशासाठी प्रेरणादायी ठरली आहे. शहीद कुटुंबीयांच्या या धैर्यामुळे देशातील नागरिकांचा जोश अधिकच वाढल्याचेही मोदींनी म्हटले. 

मुस्लिम देशांची ताकदवान संघटना असलेल्या ओआयसीने (OIC) आपल्या 46 व्या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी भारताला आमंत्रित केलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर जगातील बहुतांश देश भारताच्या पाठीशी असून भारताला जागतिक स्तरावर मोठे यश मिळाल्याचं मोदींनी म्हटले. देशातील जवानांच्या धाडसाचे आणि शौर्याचे नेहमीच कौतुक होते. मात्र, आजपर्यंत या शहीद जवानांचे एकही स्मारक नसल्याची खंत मोदींनी बोलून दाखवली. तर, दिल्ली गेटजवळ उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय सैनिक स्मारकाचे लोकार्पण 25 फेब्रुवारी रोजी करण्यात येईल. हे स्मारक शहिदांच्या बलिदानाचे प्रतिक असेल, असेही मोदींनी सांगितले. राष्ट्रीय सैनिक स्मारकाची संकल्पना ही, अमर चक्र, वीरता चक्र, त्याग चक्र, रक्षक चक्र या चार वीर चक्रांवर आधारित असल्याचेही मोदींनी सांगितले. दरम्यान, देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. देशातील नागरिकांसोबतच मीही या निवडणुकांमध्ये सक्रीय सहभागी असणार आहे. या निवडणुकीत मी उमेदवार असणार आहे. त्यामुळे यानंतरची 'मन की बात' मे महिन्यातील शेवटच्या रविवारी होईल, असेही मोदींनी सांगितले. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाMartyrशहीदMan ki Baatमन की बात