शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

लोकसभा निवडणुकांसाठी मोदींचे तीन आघाड्यांवर ‘लक्ष’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 04:33 IST

२०१९मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी तीन आघाड्यांवर लक्ष केंद्रित करायचे ठरविले आहे.

नवी दिल्ली : २०१९मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी तीन आघाड्यांवर लक्ष केंद्रित करायचे ठरविले आहे. विशिष्ट क्षेत्रे निश्चित करून त्यासाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, आरोग्यक्षेत्रासाठीची आयुष्मान योजना आणि ग्रामीण भागामधील गृहनिर्माण योजनेच्या अंमलबजावणीचा वेग वाढविणे या त्या तीन आघाड्या आहेत.अलीकडेच काही राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांत भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले, दलित संघटनांनी केलेली निदर्शने, उजेडात आलेले बँकिंग घोटाळे, दाखल झालेले अविश्वास ठराव, संसदेत कामकाज न होणे, एनडीएमधून काही घटक पक्ष बाहेर पडणे अशा भाजपाच्या दृष्टीने अप्रिय घटना घडत आहेत. सरकारने केलेली ठोस कामे आगामी निवडणुकीआधी जनतेसमोर मांडण्यासाठी केंद्राच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, या आघाडीवर मोदींनी लक्ष केंद्रित केलेले आहे.आयुष्मान भारत योजनेवर भरदुसरी आघाडी म्हणजे आरोग्यक्षेत्रासाठी राबविण्यात येणारी आयुष्मान भारत योजना. अशा अनेक योजना असताना आयुष्मान भारत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून ठोस काम केल्याचे केंद्राला दाखवून द्यायचे आहे. या योजनेची फळे दिसण्यासाठी अजून एक वर्षाचा कालावधी जावा लागणार आहे.गृहनिर्माण योजनेबाबत समाधानग्रामीण भागात गृहनिर्माण योजना प्रभावीरीत्या राबविणे या तिसºया आघाडीवर मोदींनी भर दिला आहे. या योजनेची आजवरची प्रगती समाधानकारक असल्याचे मोदींचे मत आहे. या योजनेतून जनतेला गृहबांधणीसाठी बँकांकडून सहजतेने कर्जे मिळावीत म्हणून केंद्र सरकारने काही निर्णय घेतले आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहElectionनिवडणूक