शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

मोदी वाराणसीसह बडोद्यातून लढणार?; भाजपचा तर्क-वितर्कांना विराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 06:10 IST

वाराणसीसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेची आगामी निवडणूक ओडिशातील पुरी लोकसभा मतदारसंघातून लढविणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असताना भाजपने हा बेत रद्द केला आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : वाराणसीसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेची आगामी निवडणूक ओडिशातील पुरी लोकसभा मतदारसंघातून लढविणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असताना भाजपने हा बेत रद्द केला आहे. लोकसभेच्या २१ जागा असलेल्या किनारपट्टीवरील राज्य जिंकण्याच्या रणनीतीतहत मोदी हे पुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असा तर्क लावला जात होता. तथापि, वाराणसीसोबत गुजरातमधूनही निवडणूक लढविण्याचा त्यांचा विचार आहे.काल मंगळवारी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पुरीमधून लोकसभेची निवडणूक लढविणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. तथापि, मोदी यांनी या प्रश्नाला स्पष्ट उत्तर देण्याचे टाळले होते. भाजपच्या सूत्रांनी ही योजना रद्द करण्यात आल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. पाच राज्यांत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हा बेत बारगळला आहे.सूत्रानुसार वाराणसीसोबत दुसऱ्या लोकसभा मतदारसंघातून मोदी निवडणूक लढविणार असतील तर निश्चित गुजरातमधील बडोदा मतदारसंघातून निवडणूक लढवितील. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ही जागा सोडली होती. नंतर पोटनिवडणुकीत रंजनबेन भट्ट येथून निवडून आल्या होत्या.तथापि, गांधीनगरमधून निवडणूक लढविण्याचा त्यांचा मानस आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या भाजपचे ज्येष्ठ लालकृष्ण अडवाणी करतात. अडवाणी यांना लोकसभेचे तिकीट नाकारले जाऊ नये, अशी मोदी यांची इच्छा आहे. अडवाणींना तिकीट नाकारल्यास हा भावनात्मक मुद्या होऊ शकतो. अशा स्थितीत काय तोडगा काढता येईल, यासाठी मध्यस्थ काम करीत आहेत.मोदी यांनी पुन्हा गुजरातमधून लोकसभेची निवडणूक लढविल्यास लोकसभेच्या सर्व २६ जागा भाजप आपल्याकडे राखू शकते, असे मत भाजप नेतृत्वाने मोदी यांच्याकडे व्यक्त केले आहे.लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा मोदी यांचा बेत नाही, असे स्पष्ट संकेत भाजपच्या श्रेष्ठींनी नवीन पटनायक यांंना दिल्याचे समजते. बिजू जनता दल काँग्रेसशी दोन हात दूर ठेवून असेपर्यंत बिजद सरकारसोबत भाजपला समस्या नाही.बिजदचा सशर्त प्रतिसादभाजपच्या संकेताला बिजदने सशर्त सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. माजी खासदार बी. जे. पांडा यांच्यासारख्या बंडखोरांची पाठराखण केली जाऊ नये, तसेच बिजद नेत्यांना सीबीआय आणि ईडीमार्फत खोट्या गुन्ह्यांत गोवून त्रास देऊ नये.दिल्लीच्या राजकारणात आम्हाला स्वारस्य नाही. दिल्लीने पूर्वेकडे नजरही टाकू नये, असे नवीन पटनायक यांनी म्हटले आहे. त्यामुळेच शारदा चिटफंडसह विविध घोटाळ्यांबाबत सीबीआय बिजद मंत्री आणि आमदारांविरुद्ध सबुरी राखून आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी