शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

प. बंगालमध्ये मोदी विरुद्ध दीदी; डाव्यांनीही कसली कंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 01:31 IST

एकेकाळी डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. उत्तरप्रदेश व महाराष्ट्रानंतर सर्वाधिक ४२ जागा पश्चिम बंगालमध्ये आहेत.

- योगेश पांडेएकेकाळी डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. उत्तरप्रदेश व महाराष्ट्रानंतर सर्वाधिक ४२ जागा पश्चिम बंगालमध्ये आहेत. बंगालचे महत्त्व लक्षात घेऊन तृणमूल, डावे व काँग्रेससह भाजपानेही कंबर कसली आहे. त्यामुळे अनेक जागी तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे. मात्र बंगालमध्ये तृणमूलसमोर आव्हान भाजपाचेच राहण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ममता बॅनर्जी यांनी खुले आव्हान दिले असल्याने निवडणुकांचा संग्राम चांगलाच तापणार आहे.गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी लाट असतानाही राज्यातील ४२ जागांपैकी ३४ जागांवर तृणमूल काँग्रेसने विजय मिळविला होता, तर दोनच जागांवरच भाजपाला यश मिळाले होते. काँग्रेसला चार तर सीपीआय (एम)ला दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र २०१६ च्या विधानसभा निवडणुकांत भाजपाच्या मतांमध्ये जवळपास ६.१० टक्क्यांनी वाढ तर झाली. तरीही तृणमूलने २९४ पैकी २११ जागा खिशात टाकत एकहाती सत्ता मिळविली. केंद्रात सत्ता येताच मोदींनी शारदा चिटफंड घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे सोपविली आणि ‘मोदी विरुद्ध दीदी’ हा वाद पेटला. याच मुद्द्यावर सीबीआय विरुद्ध बंगाल पोलीस वादात ममतांनी मोदी सरकारवर केलेल्या आंदोलनामुळे साऱ्यांचेच लक्ष वेधले गेले.बंगालमध्ये निवडणुकांचा केंद्रबिंदू या ममता बॅनर्जीच राहणार आहेत. जानेवारीमध्ये भाजपाविरोधात २३ विरोधी पक्षांनी मोट बांधली व महाआघाडीची रॅली दिल्लीतील सत्ताधाºयांना धडकी भरविणारी ठरली. या महाआघाडीच्या नेत्या म्हणून ममता बॅनर्जी यांचेच नाव घेण्यात येत होते. मागील दोन निवडणुकांपासून तृणमूलने राज्यात वर्चस्व कायम ठेवले आहे. बंगालमधील मुर्शीदाबाद, मालदा यासह मुस्लीमबहुल तसेच ग्रामीण भागात तृणमूलचे वर्चस्व आहे.मात्र येत्या निवडणुकांत ममता बॅनर्जी यांच्यासमोर आव्हान असेल भाजपाचे. उत्तरेकडील राज्यांत भाजपाच्या जागा घटण्याचे अंदाज आहेत. त्यामुळेच बंगालमधून अतिरिक्त २० जागा मिळविण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी राज्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पण भाजपाने २०१८ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रचंड जोर लावूनही तृणमूलच सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र भाजपानं काँग्रेस आणि डाव्यांना मागे टाकलं.त्यामुळे भाजपा आता मिशन-२३ घेऊन उतरत आहे. बांग्लादेशी घुसखोर, भ्रष्टाचार व नागरिकत्व विधेयक यावर भाजपाचा भर राहील. नागरिकत्व विधेयकात बांग्लादेशातून शरणार्थी म्हणून आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, इसाई, पारसी लोकांना भारतीय नागरिकत्व मिळावे, अशी तरतूद आहे. राममंदिर, बंगालमधील हिंदुंवरील कथित हल्ले, धर्मांतराचे प्रकार यावर भाजपा जोर देईल.एकेकाळी बंगालवर वर्चस्व गाजविलेल्या डाव्यांनी मतदारांना परत खेचण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. ग्रामीण व आदिवासी भागांत डाव्यांचे प्रचारतंत्र मजबूत आहे. तृणमूलच्या धोरणांमुळे नाराजमतदार डाव्या पक्षांकडे परतण्याची शक्यता आहे. मार्क्सवाद्यांच्या सभांना होणारी गर्दी पाहून डाव्यांचा उत्साह वाढला आहे.काँग्रेससमोर अडचणकाँग्रेससाठी ही लढाई अस्तित्वाची ठरणार आहे. बंगालमधील काँग्रेसच्या मतांची टक्केवारी व जागांचे प्रमाण हे सातत्याने कमी होत आहे. त्यातच मालदा येथील खासदार मौसम नूर व १४ आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्यात पक्षाकडे एकही आश्वासक चेहरा नसल्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरच काँग्रेसची भिस्त राहणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जी