शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

प. बंगालमध्ये मोदी विरुद्ध दीदी; डाव्यांनीही कसली कंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 01:31 IST

एकेकाळी डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. उत्तरप्रदेश व महाराष्ट्रानंतर सर्वाधिक ४२ जागा पश्चिम बंगालमध्ये आहेत.

- योगेश पांडेएकेकाळी डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. उत्तरप्रदेश व महाराष्ट्रानंतर सर्वाधिक ४२ जागा पश्चिम बंगालमध्ये आहेत. बंगालचे महत्त्व लक्षात घेऊन तृणमूल, डावे व काँग्रेससह भाजपानेही कंबर कसली आहे. त्यामुळे अनेक जागी तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे. मात्र बंगालमध्ये तृणमूलसमोर आव्हान भाजपाचेच राहण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ममता बॅनर्जी यांनी खुले आव्हान दिले असल्याने निवडणुकांचा संग्राम चांगलाच तापणार आहे.गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी लाट असतानाही राज्यातील ४२ जागांपैकी ३४ जागांवर तृणमूल काँग्रेसने विजय मिळविला होता, तर दोनच जागांवरच भाजपाला यश मिळाले होते. काँग्रेसला चार तर सीपीआय (एम)ला दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र २०१६ च्या विधानसभा निवडणुकांत भाजपाच्या मतांमध्ये जवळपास ६.१० टक्क्यांनी वाढ तर झाली. तरीही तृणमूलने २९४ पैकी २११ जागा खिशात टाकत एकहाती सत्ता मिळविली. केंद्रात सत्ता येताच मोदींनी शारदा चिटफंड घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे सोपविली आणि ‘मोदी विरुद्ध दीदी’ हा वाद पेटला. याच मुद्द्यावर सीबीआय विरुद्ध बंगाल पोलीस वादात ममतांनी मोदी सरकारवर केलेल्या आंदोलनामुळे साऱ्यांचेच लक्ष वेधले गेले.बंगालमध्ये निवडणुकांचा केंद्रबिंदू या ममता बॅनर्जीच राहणार आहेत. जानेवारीमध्ये भाजपाविरोधात २३ विरोधी पक्षांनी मोट बांधली व महाआघाडीची रॅली दिल्लीतील सत्ताधाºयांना धडकी भरविणारी ठरली. या महाआघाडीच्या नेत्या म्हणून ममता बॅनर्जी यांचेच नाव घेण्यात येत होते. मागील दोन निवडणुकांपासून तृणमूलने राज्यात वर्चस्व कायम ठेवले आहे. बंगालमधील मुर्शीदाबाद, मालदा यासह मुस्लीमबहुल तसेच ग्रामीण भागात तृणमूलचे वर्चस्व आहे.मात्र येत्या निवडणुकांत ममता बॅनर्जी यांच्यासमोर आव्हान असेल भाजपाचे. उत्तरेकडील राज्यांत भाजपाच्या जागा घटण्याचे अंदाज आहेत. त्यामुळेच बंगालमधून अतिरिक्त २० जागा मिळविण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी राज्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पण भाजपाने २०१८ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रचंड जोर लावूनही तृणमूलच सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र भाजपानं काँग्रेस आणि डाव्यांना मागे टाकलं.त्यामुळे भाजपा आता मिशन-२३ घेऊन उतरत आहे. बांग्लादेशी घुसखोर, भ्रष्टाचार व नागरिकत्व विधेयक यावर भाजपाचा भर राहील. नागरिकत्व विधेयकात बांग्लादेशातून शरणार्थी म्हणून आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, इसाई, पारसी लोकांना भारतीय नागरिकत्व मिळावे, अशी तरतूद आहे. राममंदिर, बंगालमधील हिंदुंवरील कथित हल्ले, धर्मांतराचे प्रकार यावर भाजपा जोर देईल.एकेकाळी बंगालवर वर्चस्व गाजविलेल्या डाव्यांनी मतदारांना परत खेचण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. ग्रामीण व आदिवासी भागांत डाव्यांचे प्रचारतंत्र मजबूत आहे. तृणमूलच्या धोरणांमुळे नाराजमतदार डाव्या पक्षांकडे परतण्याची शक्यता आहे. मार्क्सवाद्यांच्या सभांना होणारी गर्दी पाहून डाव्यांचा उत्साह वाढला आहे.काँग्रेससमोर अडचणकाँग्रेससाठी ही लढाई अस्तित्वाची ठरणार आहे. बंगालमधील काँग्रेसच्या मतांची टक्केवारी व जागांचे प्रमाण हे सातत्याने कमी होत आहे. त्यातच मालदा येथील खासदार मौसम नूर व १४ आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्यात पक्षाकडे एकही आश्वासक चेहरा नसल्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरच काँग्रेसची भिस्त राहणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जी