शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
3
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
4
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
5
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
6
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
7
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
8
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
9
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
11
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
12
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
13
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
14
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
15
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
16
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
17
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
18
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
19
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
20
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी

रामजन्मभूमी निकालानंतर संयम बाळगल्याबद्दल मोदींनी जनतेचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 04:54 IST

रामजन्मभूमी वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर संयम बाळगून परिपक्व वृत्तीचे दर्शन घडविल्याबद्दल देशातील जनतेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.

नवी दिल्ली : रामजन्मभूमी वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर संयम बाळगून परिपक्व वृत्तीचे दर्शन घडविल्याबद्दल देशातील जनतेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत. भारतीयांना देशहित सर्वात महत्त्वाचे वाटते, हे त्यातून दिसून आले, असेही ते म्हणाले.‘मन की बात’ या कार्यक्रमात ते रविवारी बोलत होते. मोदी यांनी सांगितले की, रामजन्मभूमीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ऐतिहासिक आहे. त्यामुळे आता नव्या मार्गाने देशाची वाटचाल सुरू झाली आहे. देशामध्ये शांतता, सलोखा टिकून राहावा, अशी जनतेची इच्छा आहे. हा निकाल देशातल्या न्याययंत्रणेच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरला आहे.रामजन्मभूमी वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल देण्याआधी दिवाळीमध्ये ‘मन की बात’ या कार्यक्रमात केलेल्या भाषणात मोदी म्हणाले होते की, या वादासंदर्भात २०१० साली अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर देशामधील नागरिकांनी शांतता व सलोखा कायम राखला होता. त्याची पुनरावृत्ती सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.‘राजकारणात येण्याची इच्छा नव्हती’नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, राजकारणात येण्याची मला अजिबात इच्छा नव्हती. मात्र, या क्षेत्रात आल्यानंतर जनतेच्या कल्याणासाठी मी कायमच उत्कृष्ट कामगिरी बजाविण्याचा प्रयत्न केला. तुम्ही राजकारणात गेला नसतात, तर कोण झाला असता? असा प्रश्न एका एनसीसी कॅडेटने मोदी यांना ‘मन की बात’ कार्यक्रमात विचारला. त्यावर त्यांनी हे उत्तर दिले. गुगलमुळे सारे संदर्भ चुटकीसरशी मिळत असल्याने आपल्या ग्रंथवाचनाच्या सवयीवर थोडा परिणाम झाला असल्याचेही त्यांनी मान्य केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRam Mandirराम मंदिर