शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

रामजन्मभूमी निकालानंतर संयम बाळगल्याबद्दल मोदींनी जनतेचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 04:54 IST

रामजन्मभूमी वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर संयम बाळगून परिपक्व वृत्तीचे दर्शन घडविल्याबद्दल देशातील जनतेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.

नवी दिल्ली : रामजन्मभूमी वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर संयम बाळगून परिपक्व वृत्तीचे दर्शन घडविल्याबद्दल देशातील जनतेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत. भारतीयांना देशहित सर्वात महत्त्वाचे वाटते, हे त्यातून दिसून आले, असेही ते म्हणाले.‘मन की बात’ या कार्यक्रमात ते रविवारी बोलत होते. मोदी यांनी सांगितले की, रामजन्मभूमीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ऐतिहासिक आहे. त्यामुळे आता नव्या मार्गाने देशाची वाटचाल सुरू झाली आहे. देशामध्ये शांतता, सलोखा टिकून राहावा, अशी जनतेची इच्छा आहे. हा निकाल देशातल्या न्याययंत्रणेच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरला आहे.रामजन्मभूमी वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल देण्याआधी दिवाळीमध्ये ‘मन की बात’ या कार्यक्रमात केलेल्या भाषणात मोदी म्हणाले होते की, या वादासंदर्भात २०१० साली अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर देशामधील नागरिकांनी शांतता व सलोखा कायम राखला होता. त्याची पुनरावृत्ती सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.‘राजकारणात येण्याची इच्छा नव्हती’नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, राजकारणात येण्याची मला अजिबात इच्छा नव्हती. मात्र, या क्षेत्रात आल्यानंतर जनतेच्या कल्याणासाठी मी कायमच उत्कृष्ट कामगिरी बजाविण्याचा प्रयत्न केला. तुम्ही राजकारणात गेला नसतात, तर कोण झाला असता? असा प्रश्न एका एनसीसी कॅडेटने मोदी यांना ‘मन की बात’ कार्यक्रमात विचारला. त्यावर त्यांनी हे उत्तर दिले. गुगलमुळे सारे संदर्भ चुटकीसरशी मिळत असल्याने आपल्या ग्रंथवाचनाच्या सवयीवर थोडा परिणाम झाला असल्याचेही त्यांनी मान्य केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRam Mandirराम मंदिर