शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

मोदी स्मशानाचे बोलतात, आम्ही लॅपटॉपचे बोलतो!

By admin | Updated: February 25, 2017 23:45 IST

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने मुख्यमंत्री अखिलेश यादव व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकमेकांवर आरोप व शाब्दिक हल्ले सुरूच आहेत.

सिद्धार्थनगर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने मुख्यमंत्री अखिलेश यादव व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकमेकांवर आरोप व शाब्दिक हल्ले सुरूच आहेत. येथे शनिवारी झालेल्या निवडणूक प्रचार सभेत अखिलेश यांनी नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. पंतप्रधानांच्या फतेहपूर येथील विधानांचा समाचार घेताना अखिलेश म्हणाले की, ते (मोदी) कब्रस्तान आणि स्मशानाची भाषा करीत आहेत. आम्ही मात्र लॅपटॉप आणि स्मार्टफोन जनतेला देण्याचे बोलत आहोत.राज्य सरकार एका समुदायाला खुश ठेवण्यासाठी दुसऱ्या समाजाबाबत भेदभावाची भूमिका घेत असल्याचा आरोप मोदींनी फतेहपूर येथील सभेत केला होता. एखाद्या गावात कब्रस्तान तयार केले जाणार असेल, तर तेथे स्मशानभूमीही तयार केली पाहिजे. जर रमजानमध्ये वीज मिळत असेल, तर दिवाळीतही ती मिळायला हवी. जर होळीला वीज मिळत असेल, तर ती ईदच्या दिवशीही मिळाली पाहिजे. भेदभाव व्हायला नको, असे पंतप्रधानांनी म्हटले होते. मोदींनी शुक्रवारी दिलेल्या भाषणावर टीका करताना अखिलेश म्हणाले की, मोदीजींनी काल तीन पानांचे भाषण दिले; पण ते एक तरी गोष्ट शेतकरी आणि गरिबांबाबत बोलल्याचे दाखवून द्या. गोंडा येथील निवडणूक सभेला संबोधित करताना मोदींनी सपावर जोरदार टीका केली होती. सपा माफियांना पाठीशी घालत असून, त्यामुळे युवकांचे भवितव्य उद्ध्वस्त होत असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना अखिलेश म्हणाले की, आपल्या बालपणी प्रत्येकाने थोडाफार खोटारडेपणा केलेला असतो. मोदी परीक्षेतील नकलांचा मुद्दा उपस्थित करीत आहेत; पण भाजपने आमच्या जाहीरनाम्याची नक्कल केली त्याचे काय, असा सवाल त्यांनी केला. समाजवादी पार्टी काँग्रेससोबत युती करून उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक लढवीत आहे. मतदानाचे चार टप्पे झाले असून, पूर्व आणि मध्य भागात आणखी तीन टप्प्यांचे मतदान होणार असून, पाचव्या टप्प्याचे मतदान सोमवारी होणार आहे, तर ११ मार्च रोजी मतमोजणी होेईल. (वृत्तसंस्था)बसपापासून सावध राहाबसपाप्रमुख मायावती निवडणुकीनंतर कधीही भाजपशी युती करू शकतात, असे सांगून अखिलेश यादव यांनी बसपापासून सावध राहा, असा सल्ला जनतेला दिला. यापूर्वीही अनेक प्रचारसभांत अखिलेश यांनी मायावतींना संधीसाधू म्हटले होते. वेळ आल्यानंतर त्या भाजपशी हातमिळवणी करू शकतात. यापूर्वीही मायावतींनी भाजपच्या नेत्यांना राखी बांधली असून, पुढेही त्या असे करू शकतात, असे त्यांनी बोलून दाखविले.