शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

"...आता सर्व मार्ग बंद झालेत, दीड लाख तरुणांची काय चूक होती?"; राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 15:40 IST

Rahul Gandhi : भारत जोडो न्याय यात्रा जात असताना राहुल गांधींसमोर 'मोदी-मोदी' अशा घोषणा दिल्या जाऊ लागल्या.

सध्या मध्य प्रदेशात राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. मंगळवारी ही यात्रा शाजापूरला पोहोचली. तेथे एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं. भारत जोडो न्याय यात्रा या जिल्ह्यातून जात असताना राहुल गांधींसमोर 'मोदी-मोदी' अशा घोषणा दिल्या जाऊ लागल्या. भाजपाशी संबंधित लोकांनी या घोषणा दिल्या. या लोकांनी केवळ घोषणाबाजीच केली नाही तर राहुल गांधींना बटाटेही भेट म्हणून  दिले. 

राहुल गांधी यांनी घोषणाबाजी करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले. शाजापूरमध्ये राहुल गांधी म्हणाले की," पूर्वी देशातील तरुण जेव्हा सैन्यात भरती व्हायचे तेव्हा लष्कर त्यांच्या संरक्षणाची हमी देत ​​असे. सैनिक शहीद झाला तर त्याला शहीद दर्जा मिळतो. आता मोदी सरकारने अग्निवीरला सैन्यात आणल्याने सैनिकांमध्ये भेदभाव निर्माण झाला आहे."

"कोरोनाच्या वेळी देशातील दीड लाख तरुणांची सैन्यात निवड झाली, मात्र तीन वर्षांनंतरही ते रुजू झालेले नाहीत. आता त्यांचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. अखेर या दीड लाख तरुणांची चूक काय होती?" असा सवाल देखील विचारला आहे.  शेतकऱ्यांबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "आमचे सरकार सत्तेवर येताच आम्ही शेतकऱ्यांना एमएसपीची हमी देऊ." मध्य प्रदेशात राहुल गांधी म्हणाले आहेत की, "देशात ओबीसी, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक वर्गातील सुमारे 90% लोक आहेत."

"देशातील मोठमोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनात तुम्हाला ओबीसी, दलित किंवा आदिवासी समाजातील एकही व्यक्ती सापडणार नाही. हा सामाजिक अन्याय आहे, जो देशातील जवळपास प्रत्येक संस्थेत होत आहे. गरिबांची मुले अनेक वर्षे मेहनतीने अभ्यास करतात. पण पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर जाताच तिथल्या श्रीमंतांच्या मुलांच्या मोबाईलमध्ये आधीच पेपर असतो. परीक्षेचा पेपर फुटतो. म्हणजे आज गरिबांच्या मुलांसाठी सर्व मार्ग बंद झाले आहेत." 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण