शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

"...आता सर्व मार्ग बंद झालेत, दीड लाख तरुणांची काय चूक होती?"; राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 15:40 IST

Rahul Gandhi : भारत जोडो न्याय यात्रा जात असताना राहुल गांधींसमोर 'मोदी-मोदी' अशा घोषणा दिल्या जाऊ लागल्या.

सध्या मध्य प्रदेशात राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. मंगळवारी ही यात्रा शाजापूरला पोहोचली. तेथे एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं. भारत जोडो न्याय यात्रा या जिल्ह्यातून जात असताना राहुल गांधींसमोर 'मोदी-मोदी' अशा घोषणा दिल्या जाऊ लागल्या. भाजपाशी संबंधित लोकांनी या घोषणा दिल्या. या लोकांनी केवळ घोषणाबाजीच केली नाही तर राहुल गांधींना बटाटेही भेट म्हणून  दिले. 

राहुल गांधी यांनी घोषणाबाजी करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले. शाजापूरमध्ये राहुल गांधी म्हणाले की," पूर्वी देशातील तरुण जेव्हा सैन्यात भरती व्हायचे तेव्हा लष्कर त्यांच्या संरक्षणाची हमी देत ​​असे. सैनिक शहीद झाला तर त्याला शहीद दर्जा मिळतो. आता मोदी सरकारने अग्निवीरला सैन्यात आणल्याने सैनिकांमध्ये भेदभाव निर्माण झाला आहे."

"कोरोनाच्या वेळी देशातील दीड लाख तरुणांची सैन्यात निवड झाली, मात्र तीन वर्षांनंतरही ते रुजू झालेले नाहीत. आता त्यांचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. अखेर या दीड लाख तरुणांची चूक काय होती?" असा सवाल देखील विचारला आहे.  शेतकऱ्यांबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "आमचे सरकार सत्तेवर येताच आम्ही शेतकऱ्यांना एमएसपीची हमी देऊ." मध्य प्रदेशात राहुल गांधी म्हणाले आहेत की, "देशात ओबीसी, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक वर्गातील सुमारे 90% लोक आहेत."

"देशातील मोठमोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनात तुम्हाला ओबीसी, दलित किंवा आदिवासी समाजातील एकही व्यक्ती सापडणार नाही. हा सामाजिक अन्याय आहे, जो देशातील जवळपास प्रत्येक संस्थेत होत आहे. गरिबांची मुले अनेक वर्षे मेहनतीने अभ्यास करतात. पण पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर जाताच तिथल्या श्रीमंतांच्या मुलांच्या मोबाईलमध्ये आधीच पेपर असतो. परीक्षेचा पेपर फुटतो. म्हणजे आज गरिबांच्या मुलांसाठी सर्व मार्ग बंद झाले आहेत." 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण