शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

मोदी म्हणाले, कमिशन कमावणे हेच ‘त्यांचे’ लक्ष्य; ‘ते’ लाेकशाहीला लावताहेत नख, गांधींचाही पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 09:02 IST

नरेंद्र मोदींचा ‘इंडिया’ आघाडीला जाेरदार टाेला, राजस्थानातील सभेत सोनियांचा घणाघात

सहारणपूर (उत्तर प्रदेश) : सत्तेवर येऊन ‘कमिशन’ कमावणे, हेच विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे लक्ष्य आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) ही एक ‘मिशन’ आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

सहारणपूर येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना मोदी यांनी सांगितले की, भाजपला ३७० जागा जिंकण्यापासून रोखण्याच्या एकमेव उद्देशाने विरोधक निवडणूक लढवित आहेत. समाजवादी पार्टी (सपा) दर तासाला उमेदवार बदलत आहे. काँग्रेसला उमेदवारच सापडत नाहीयेत. मोदी यांनी काॅंग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करताना म्हटले की, जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगची छाप आहे. काही भागांवर डाव्यांचा प्रभाव दिसून येत आहे. शक्तीची पूजा करणे हा आपल्या आध्यात्मिक यात्रेचा भाग आहे, तरीही इंडिया आघाडीचे लोक म्हणत आहेत की, त्यांना शक्तीच्या विरुद्ध लढायचे आहे. तर, जाहीरनाम्याच्या नावाखाली असत्याचा कागद सादर केला, अशी टीकाही मोदींनी राजस्थानमधील पुष्कर येथील प्रचारसभेत केली.

वर्धापन दिनानिमित्त दिल्या भाजप सदस्यांना शुभेच्छानवी दिल्ली : विकसित भारतासाठी तयार करण्यात आलेला पाया आणखी मजबूत करण्यासाठी लोक पुन्हा एकदा भाजपलाच निवडून देतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. भाजपच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त  ‘एक्स’वर जारी केलेल्या एका पोस्टमध्ये मोदी यांनी भाजप सदस्यांना शुभेच्छा दिल्या.

विरोधक द्वेष पसरवत आहेत : राजनाथ सिंहसिंगरौली (मध्य प्रदेश) : भाजप आपला शब्द पाळतो. भाजपने जाहीरनाम्यात दिलेलेे प्रत्येक आश्वासन पूर्ण केले. भाजप जनतेवर राज्य करत नाही, तर त्यांची सेवा करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी नागरिकांच्या हालअपेष्टा कमी करण्याची आहे, तर निरुपयोगी विरोधी पक्ष द्वेष पसरविण्याचे काम करीत आहेत, अशी टीका संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केली. सीधी लोकसभा मतदारसंघात आयोजित सभेत ते बोलत होते. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआ राजवट भ्रष्टाचाराने बरबटलेली होती. त्यामुळे काही मंत्र्यांना तेव्हा तुरुंगात टाकण्यात आले होते, असा उल्लेखही सिंह यांनी केला.

जयपूर : केंद्रातील सरकार देशाच्या प्रतिष्ठेला आणि लोकशाहीला तडा देत आहेत, अशा शब्दात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी शनिवारी राजस्थानात एका सभेत टीका केली. तर, विरोधी नेत्यांना भाजपमध्ये सहभागी करण्यासाठी विविध डावपेचांचा वापर केला जात आहे, असा दावा त्यांनी केला.येथील विद्याधर नगर येथे आयोजित प्रचारसभेत सोनिया गांधी बोलत होत्या. सोनिया म्हणाल्या की, गेल्या १० वर्षांपासून आपला देश अशा सरकारच्या हातात आहे ज्याने बेरोजगारी, महागाई, आर्थिक संकट, असमानता आणि अत्याचारांना चालना देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. आज आपल्या देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. लोकशाही संस्था उद्ध्वस्त केल्या जात आहेत आणि आपली राज्यघटना बदलण्याचे षडयंत्र रचले जात आहे. संपूर्ण व्यवस्थेत भीती बसवली जात आहे. देश ही काही मोजक्या लोकांची मालमत्ता नसून तो सर्वांचा आहे. आपल्या पूर्वजांनी त्यासाठी रक्त सांडले आहे. पण हे जाणून घ्या की निराशेसोबतच आशाही जन्माला येते, असे सोनिया म्हणाल्या.

पोट भरणे झाले कठीणमहागाई आणि बेरोजगारीचा संदर्भ देत सोनिया गांधी म्हणाल्या की, आज रोजच्या कमाईतून पोट भरणे कठीण झाले आहे. कष्टकरी कामगाराच्या मेहनतीचे मोल कमी होत आहे. स्वयंपाकघरातील जीवनावश्यक वस्तूंचा खर्च माझ्या बहिणींची वारंवार परीक्षा घेत आहे. शेतकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले-मुली बेरोजगार आहेत.

केंद्राकडून शेतकऱ्यांचे कर्ज माफ नाही : राहुल गांधीहैदराबाद : देशात दररोज ३० शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करणाऱ्या केंद्रातील सरकारने शेतकऱ्यांचे एक रुपयाचेही कर्ज माफ केलेले नाही, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला. ते येथे निवडणूक प्रचार सभेत बोलत होते. काँग्रेसचा जाहीरनामा भारतीयांचा आवाज प्रतिबिंबित करतो. भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर देशातील कोट्यवधी लोक गरीब झाले. मोदींनी निवडणूक आयोगात आपल्या लोकांना नेमले असून, निवडणूक रोखे हा जगातील सर्वांत मोठा घोटाळा आहे, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस