शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोदी म्हणाले, कमिशन कमावणे हेच ‘त्यांचे’ लक्ष्य; ‘ते’ लाेकशाहीला लावताहेत नख, गांधींचाही पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 09:02 IST

नरेंद्र मोदींचा ‘इंडिया’ आघाडीला जाेरदार टाेला, राजस्थानातील सभेत सोनियांचा घणाघात

सहारणपूर (उत्तर प्रदेश) : सत्तेवर येऊन ‘कमिशन’ कमावणे, हेच विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे लक्ष्य आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) ही एक ‘मिशन’ आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

सहारणपूर येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना मोदी यांनी सांगितले की, भाजपला ३७० जागा जिंकण्यापासून रोखण्याच्या एकमेव उद्देशाने विरोधक निवडणूक लढवित आहेत. समाजवादी पार्टी (सपा) दर तासाला उमेदवार बदलत आहे. काँग्रेसला उमेदवारच सापडत नाहीयेत. मोदी यांनी काॅंग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करताना म्हटले की, जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगची छाप आहे. काही भागांवर डाव्यांचा प्रभाव दिसून येत आहे. शक्तीची पूजा करणे हा आपल्या आध्यात्मिक यात्रेचा भाग आहे, तरीही इंडिया आघाडीचे लोक म्हणत आहेत की, त्यांना शक्तीच्या विरुद्ध लढायचे आहे. तर, जाहीरनाम्याच्या नावाखाली असत्याचा कागद सादर केला, अशी टीकाही मोदींनी राजस्थानमधील पुष्कर येथील प्रचारसभेत केली.

वर्धापन दिनानिमित्त दिल्या भाजप सदस्यांना शुभेच्छानवी दिल्ली : विकसित भारतासाठी तयार करण्यात आलेला पाया आणखी मजबूत करण्यासाठी लोक पुन्हा एकदा भाजपलाच निवडून देतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. भाजपच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त  ‘एक्स’वर जारी केलेल्या एका पोस्टमध्ये मोदी यांनी भाजप सदस्यांना शुभेच्छा दिल्या.

विरोधक द्वेष पसरवत आहेत : राजनाथ सिंहसिंगरौली (मध्य प्रदेश) : भाजप आपला शब्द पाळतो. भाजपने जाहीरनाम्यात दिलेलेे प्रत्येक आश्वासन पूर्ण केले. भाजप जनतेवर राज्य करत नाही, तर त्यांची सेवा करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी नागरिकांच्या हालअपेष्टा कमी करण्याची आहे, तर निरुपयोगी विरोधी पक्ष द्वेष पसरविण्याचे काम करीत आहेत, अशी टीका संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केली. सीधी लोकसभा मतदारसंघात आयोजित सभेत ते बोलत होते. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआ राजवट भ्रष्टाचाराने बरबटलेली होती. त्यामुळे काही मंत्र्यांना तेव्हा तुरुंगात टाकण्यात आले होते, असा उल्लेखही सिंह यांनी केला.

जयपूर : केंद्रातील सरकार देशाच्या प्रतिष्ठेला आणि लोकशाहीला तडा देत आहेत, अशा शब्दात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी शनिवारी राजस्थानात एका सभेत टीका केली. तर, विरोधी नेत्यांना भाजपमध्ये सहभागी करण्यासाठी विविध डावपेचांचा वापर केला जात आहे, असा दावा त्यांनी केला.येथील विद्याधर नगर येथे आयोजित प्रचारसभेत सोनिया गांधी बोलत होत्या. सोनिया म्हणाल्या की, गेल्या १० वर्षांपासून आपला देश अशा सरकारच्या हातात आहे ज्याने बेरोजगारी, महागाई, आर्थिक संकट, असमानता आणि अत्याचारांना चालना देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. आज आपल्या देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. लोकशाही संस्था उद्ध्वस्त केल्या जात आहेत आणि आपली राज्यघटना बदलण्याचे षडयंत्र रचले जात आहे. संपूर्ण व्यवस्थेत भीती बसवली जात आहे. देश ही काही मोजक्या लोकांची मालमत्ता नसून तो सर्वांचा आहे. आपल्या पूर्वजांनी त्यासाठी रक्त सांडले आहे. पण हे जाणून घ्या की निराशेसोबतच आशाही जन्माला येते, असे सोनिया म्हणाल्या.

पोट भरणे झाले कठीणमहागाई आणि बेरोजगारीचा संदर्भ देत सोनिया गांधी म्हणाल्या की, आज रोजच्या कमाईतून पोट भरणे कठीण झाले आहे. कष्टकरी कामगाराच्या मेहनतीचे मोल कमी होत आहे. स्वयंपाकघरातील जीवनावश्यक वस्तूंचा खर्च माझ्या बहिणींची वारंवार परीक्षा घेत आहे. शेतकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले-मुली बेरोजगार आहेत.

केंद्राकडून शेतकऱ्यांचे कर्ज माफ नाही : राहुल गांधीहैदराबाद : देशात दररोज ३० शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करणाऱ्या केंद्रातील सरकारने शेतकऱ्यांचे एक रुपयाचेही कर्ज माफ केलेले नाही, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला. ते येथे निवडणूक प्रचार सभेत बोलत होते. काँग्रेसचा जाहीरनामा भारतीयांचा आवाज प्रतिबिंबित करतो. भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर देशातील कोट्यवधी लोक गरीब झाले. मोदींनी निवडणूक आयोगात आपल्या लोकांना नेमले असून, निवडणूक रोखे हा जगातील सर्वांत मोठा घोटाळा आहे, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस