शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

Modi-Pawar meet: माेदी-पवार भेट; चर्चेला ऊत! राज्यातील नेत्यांवरील ईडी कारवाईचा मुद्दा केला उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 08:28 IST

Modi-Pawar meet: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे बुधवारी राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या.

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे बुधवारी राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांना झालेली अटक आणि पाठोपाठ शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्या मालमत्तांवर मंगळवारी ईडीने आणलेली टाच, या घटनांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला राजकीय मूल्य प्राप्त झाले होते. 

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील तीन मोठ्या नेत्यांच्या इन्कम टॅक्स, ईडी आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणामार्फत चौकशा सुरू आहेत. अजित पवार, संजय राऊत आणि नवाब मलिक या नेत्यांवर छापे पडून त्यांच्या मालमत्ताही जप्त झाल्या. या सर्व पार्श्वभूमीवर  पंतप्रधानांशी केलेल्या चर्चेदरम्यान पवार यांनी उपस्थित केेलेल्या तीन मुद्द्यांनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. राऊत यांच्या संपत्तीवर आलेली टाच, विधान परिषदेत आमदारांच्या नियुक्तीला राज्यपालांकडून होत असलेला विलंब आणि लक्षद्वीपमध्ये राज्यपाल प्रफुल्ल कोडा पाटील यांचा मनमानी कारभार हे तीन मुद्दे पवारांनी उपस्थित केले. 

महाविकास आघाडी मजबूत राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीत फूट पडणार नाही, उलट अधिक मजबुतीने सरकार चालवले जाईल, असा संदेशच पवार यांनी या भेटीतून दिल्याचे बोलले जाते.  मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत आघाडीतील घटक पक्ष स्वतंत्र लढणार असले तरी सरकारात मात्र एकत्रच राहणार असल्याचे यातून स्पष्ट करण्यात आले. राज्य सरकारनेही भाजपच्या नेत्यांवर खटले दाखल केले आहेत. त्यावरही या भेटीत चर्चा झाल्याचे समजते.  सूडभावना त्यागून राजकीय लढाई लढण्याचे आव्हान पवार यांनी भाजपला दिल्याचे यातून अधोरेखित होत असल्याची चर्चा रंगली होती.

पवारांनी मांडलेले चार मुद्देक्षुल्लक कारणासाठी कारवाई अयोग्यसंजय राऊत यांच्यावरील कारवाईचा मुद्दा पंतप्रधानांकडे मांडला. राऊत यांच्या मालकीची केवळ अर्धा एकर जमीन अलिबागमध्ये आहे. अशा क्षुल्लक कारणासाठी एका ज्येष्ठ पत्रकारावर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई करणे योग्य नसल्याचे पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले. सदस्यांची नियुक्ती राज्यपालांनी अडविलीमहाराष्ट्र विधान परिषदेत राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती राज्यपाल कोश्यारी यांनी अडवून ठेवल्याची बाबही पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिली. गेल्या अडीच वर्षांपासून या नियुक्त्यांची फाइल राज्यपालांच्या कार्यालयात अडून आहे.मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय चर्चेनंतरचमहाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्ताराचा कोणताही प्रस्ताव तूर्तास नाही. यासंदर्भात सर्व घटकपक्षांशी चर्चा केल्यानंतर बोलणे योग्य राहील. भाजपशी कधीही आघाडी नाहीमहाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसून हे सरकार पुढील अडीच वर्षे चालेल. भाजपशी राष्ट्रवादी काँग्रेस कधीही आघाडी करणार नाही. यूपीएचा अध्यक्ष होण्याची माझी कोणतीही इच्छा नाही. मोदी सरकार विरोधकांनी एकत्र येण्याबद्दल इतर नेत्यांशी चर्चा सुरू आहे.

गडकरींशी भेट कशामुळे? : मंगळवारी आयाेजित करण्यात आलेल्या स्नेहभाेजनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी हजेरी लावली हाेती. त्याबद्दल पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील आमदार दिल्लीत ट्रेनिंगसाठी आले हाेते. त्यांच्या मतदारसंघांतील रस्त्यांच्या कामाचे मुद्दे आमदारांनी उपस्थित केले हाेते. त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी गडकरी यांना भाेजनासाठी आमंत्रित केले हाेते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी