शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'महान जननायकचा सन्मान', कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याच्या निर्णयावर PM मोदींची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 22:13 IST

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि थोर समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर 'भारतरत्न' देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

Karpoori Thakur Bharat Ratna: बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि थोर समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर (Karpoori Thakur) यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न' देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. एकीकडे केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे, तर दुसरीकडे आरजेडीने केंद्रावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पीएम मोदींची प्रतिक्रिया

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन आपला आनंद व्यक्त केला त्यांच्या कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा निर्णय देशवासियांसाठी अभिमानास्पद असल्याचे म्हटले. भारत सरकारने सामाजिक न्यायाचे महान नेते कर्पूरी ठाकूरजी यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा निर्णय देशवासियांसाठी अभिमानाचा आहे. मागास आणि वंचितांच्या उत्थानासाठी कर्पूरीजींची अतूट बांधिलकी आणि दूरदर्शी नेतृत्वाने भारताच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर अमिट छाप सोडली आहे. हा भारतरत्न त्यांच्या अतुलनीय योगदानाची विनम्र ओळख तर आहेच, पण त्यामुळे समाजात एकोपा वाढीस लागेल, असं पीएम मोदी म्हणाले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि सामाजिक न्यायाचे जनक मानले जाणारे कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचे मी कौतुक करून आनंद व्यक्त करतो. कर्पूरी ठाकूर यांनी आयुष्यभर समाजातील गरीब आणि मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी कार्य केले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री या नात्याने अत्यंत मागासलेल्या आणि अत्यंत दलित वर्गाच्या कल्याणासाठी आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा कायदा केला होता. कर्पुरीजी यांना भारतरत्न देण्याचा निर्णय म्हणजे सामाजिक सलोखा आणि गरीब कल्याणाच्या कल्पनेला आणि सार्वजनिक जीवनातील त्यांच्या योगदानाला श्रद्धांजली आहे. या निर्णयाबद्दल मी राष्ट्रपती भवनाचे आभार मानतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.

नितीश कुमार काय म्हणाले?महान स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि जननायक कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले. सामाजिक न्याय समृद्ध करणारा हा निर्णय म्हणजे लोकशाही मूल्यांप्रती त्यांची खरी निष्ठा आणि वंचित, शोषित आणि उपेक्षितांच्या उत्थानासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाला देशवासीयांकडून दिलेली श्रद्धांजली आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांनीही या निर्णयावर आनंद व्यक्त करत हा सरकारचा योग्य निर्णय असल्याचे म्हटले आहे.

अखिलेश यादव म्हणतात...कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, जननायक कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करणे हा सामाजिक न्याय चळवळीचा विजय आहे. यावरुन दिसून येते की, सामाजिक न्यायाचे पारंपरिक विरोधक आता पीडीएच्या 90 टक्के लोकांच्या एकजुटीपुढे नतमस्तक होत आहेत. तर, बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी म्हणाले की, 13 एप्रिलला मी अमित शहा यांची भेट घेऊन कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. मोदींची गॅरंटीचा अर्थ काय, हे आज सिद्ध झाले आहे. धन्यवाद अमित शाहजी आणि नरेंद्र मोदीजी, आमचा तुमच्यावर विश्वास आहे, असं ते म्हणाले.

आरजेडीटा केंद्रावर निशाणा कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याच्या घोषणेचे राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) स्वागत केले आहे. मात्र त्याचवेळी केंद्रालाही लक्ष्य करण्यात आले आहे. आरजेडीचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले की, केंद्र सरकारने कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला आहे. हा तोच भाजप आहे जो कर्पूरी ठाकूर हयात असताना शिव्या देत होता. भाजपला वर्षानुवर्षे त्यांची आठवण झाली नाही. आम्ही, आमचे नेते लालू यादव यांनी कर्पूरी ठाकूरजींना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची मागणी सातत्याने केली आहे. आता निवडणुका जवळ आल्या असताना भाजपला कर्पूरी ठाकूर यांची आठवण येत आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAkhilesh Yadavअखिलेश यादवNitish Kumarनितीश कुमारBiharबिहार