शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

'महान जननायकचा सन्मान', कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याच्या निर्णयावर PM मोदींची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 22:13 IST

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि थोर समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर 'भारतरत्न' देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

Karpoori Thakur Bharat Ratna: बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि थोर समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर (Karpoori Thakur) यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न' देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. एकीकडे केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे, तर दुसरीकडे आरजेडीने केंद्रावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पीएम मोदींची प्रतिक्रिया

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन आपला आनंद व्यक्त केला त्यांच्या कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा निर्णय देशवासियांसाठी अभिमानास्पद असल्याचे म्हटले. भारत सरकारने सामाजिक न्यायाचे महान नेते कर्पूरी ठाकूरजी यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा निर्णय देशवासियांसाठी अभिमानाचा आहे. मागास आणि वंचितांच्या उत्थानासाठी कर्पूरीजींची अतूट बांधिलकी आणि दूरदर्शी नेतृत्वाने भारताच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर अमिट छाप सोडली आहे. हा भारतरत्न त्यांच्या अतुलनीय योगदानाची विनम्र ओळख तर आहेच, पण त्यामुळे समाजात एकोपा वाढीस लागेल, असं पीएम मोदी म्हणाले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि सामाजिक न्यायाचे जनक मानले जाणारे कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचे मी कौतुक करून आनंद व्यक्त करतो. कर्पूरी ठाकूर यांनी आयुष्यभर समाजातील गरीब आणि मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी कार्य केले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री या नात्याने अत्यंत मागासलेल्या आणि अत्यंत दलित वर्गाच्या कल्याणासाठी आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा कायदा केला होता. कर्पुरीजी यांना भारतरत्न देण्याचा निर्णय म्हणजे सामाजिक सलोखा आणि गरीब कल्याणाच्या कल्पनेला आणि सार्वजनिक जीवनातील त्यांच्या योगदानाला श्रद्धांजली आहे. या निर्णयाबद्दल मी राष्ट्रपती भवनाचे आभार मानतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.

नितीश कुमार काय म्हणाले?महान स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि जननायक कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले. सामाजिक न्याय समृद्ध करणारा हा निर्णय म्हणजे लोकशाही मूल्यांप्रती त्यांची खरी निष्ठा आणि वंचित, शोषित आणि उपेक्षितांच्या उत्थानासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाला देशवासीयांकडून दिलेली श्रद्धांजली आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांनीही या निर्णयावर आनंद व्यक्त करत हा सरकारचा योग्य निर्णय असल्याचे म्हटले आहे.

अखिलेश यादव म्हणतात...कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, जननायक कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करणे हा सामाजिक न्याय चळवळीचा विजय आहे. यावरुन दिसून येते की, सामाजिक न्यायाचे पारंपरिक विरोधक आता पीडीएच्या 90 टक्के लोकांच्या एकजुटीपुढे नतमस्तक होत आहेत. तर, बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी म्हणाले की, 13 एप्रिलला मी अमित शहा यांची भेट घेऊन कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. मोदींची गॅरंटीचा अर्थ काय, हे आज सिद्ध झाले आहे. धन्यवाद अमित शाहजी आणि नरेंद्र मोदीजी, आमचा तुमच्यावर विश्वास आहे, असं ते म्हणाले.

आरजेडीटा केंद्रावर निशाणा कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याच्या घोषणेचे राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) स्वागत केले आहे. मात्र त्याचवेळी केंद्रालाही लक्ष्य करण्यात आले आहे. आरजेडीचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले की, केंद्र सरकारने कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला आहे. हा तोच भाजप आहे जो कर्पूरी ठाकूर हयात असताना शिव्या देत होता. भाजपला वर्षानुवर्षे त्यांची आठवण झाली नाही. आम्ही, आमचे नेते लालू यादव यांनी कर्पूरी ठाकूरजींना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची मागणी सातत्याने केली आहे. आता निवडणुका जवळ आल्या असताना भाजपला कर्पूरी ठाकूर यांची आठवण येत आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAkhilesh Yadavअखिलेश यादवNitish Kumarनितीश कुमारBiharबिहार