शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

मोदी स्वत:ला सर्वज्ञानी समजू लागले आहेत; राहुल गांधी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 04:59 IST

या खात्यांना मंत्री असूनही स्वत: मोदीच प्रत्येक बाबतील हस्तक्षेप करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी येथे केली.

उदयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:ला सर्वज्ञानी समजतात. संरक्षण खात्यातील आपल्यालाच समजते, अर्थ खात्याविषयी आपल्या तुलनेत इतरांना काहीच कळत नाही, परराष्ट्र खात्याविषयीही केवळ आपणच सारे जाणतो, अशा पद्धतीने ते वागत आहेत. या खात्यांना मंत्री असूनही स्वत: मोदीच प्रत्येक बाबतील हस्तक्षेप करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी येथे केली.राहुल गांधी यांनी येथे उद्योजक व व्यापारी यांच्याशी त्यांच्या प्रश्नावर चर्चा केली. त्यांनी राज्यात तीन प्रचार सभाही घेतल्या. हिंदुत्ववाद म्हणजे काय, हेही केवळ आपल्यालाच समजते, अशी त्यांची धारणा आहे. मात्र त्यांना स्वत:ला हिंदुत्व म्हणजे काय ते कळलेले नाही. त्यांच्यापेक्षा सामान्यांना हिंदू व हिंदुत्वाची अधिक माहिती असते. त्यामुळे मोदी कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत, हेच समजेनासे झाले आहे, असा टोलाही राहुल गांधी यांना लगावला.पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने दोन वर्षांपूर्वी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचेही पंतप्रधान मोदी यांनी राजकारण केले. उत्तर प्रदेशातील निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी लष्करी कारवाईचे राजकीयीकरण केले. त्याआधी डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही याप्रकारे सर्जिकल स्ट्राइक करण्यात आले होते. पण डॉ. मनमोहन सिंग वा काँग्रेसने लष्करी कारवाईचे कधीच राजकारण केले नाही, अशी टीका गांधी यांनी केली.भिलवाडामधील सभेत राहुल गांधी यांनी नोटाबंदी व जीएसटीच्या निर्णयामुळे शेतकरी, गरीब व सामान्यांचे हाल झाल्याची टीका केली. या निर्णयांमुळे अनेक छोटे व मध्यम उद्योग बंद पडले आणि लाखो लोकांचा रोजगार गेला, असा आरोप राहुल गांधी यांनी सभेमध्ये केला.तरुण बेरोजगारांना नोकऱ्या मिळवून देण्यात पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री वसुंधरा राजे अपयशी ठरल्याचे सांगून ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी यापुढे लोकांना ‘मन की बात’ ऐकवण्याऐवजी जनतेच्या मनातील बात ऐकावी.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी