शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

मोदी स्वत:ला सर्वज्ञानी समजू लागले आहेत; राहुल गांधी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 04:59 IST

या खात्यांना मंत्री असूनही स्वत: मोदीच प्रत्येक बाबतील हस्तक्षेप करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी येथे केली.

उदयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:ला सर्वज्ञानी समजतात. संरक्षण खात्यातील आपल्यालाच समजते, अर्थ खात्याविषयी आपल्या तुलनेत इतरांना काहीच कळत नाही, परराष्ट्र खात्याविषयीही केवळ आपणच सारे जाणतो, अशा पद्धतीने ते वागत आहेत. या खात्यांना मंत्री असूनही स्वत: मोदीच प्रत्येक बाबतील हस्तक्षेप करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी येथे केली.राहुल गांधी यांनी येथे उद्योजक व व्यापारी यांच्याशी त्यांच्या प्रश्नावर चर्चा केली. त्यांनी राज्यात तीन प्रचार सभाही घेतल्या. हिंदुत्ववाद म्हणजे काय, हेही केवळ आपल्यालाच समजते, अशी त्यांची धारणा आहे. मात्र त्यांना स्वत:ला हिंदुत्व म्हणजे काय ते कळलेले नाही. त्यांच्यापेक्षा सामान्यांना हिंदू व हिंदुत्वाची अधिक माहिती असते. त्यामुळे मोदी कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत, हेच समजेनासे झाले आहे, असा टोलाही राहुल गांधी यांना लगावला.पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने दोन वर्षांपूर्वी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचेही पंतप्रधान मोदी यांनी राजकारण केले. उत्तर प्रदेशातील निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी लष्करी कारवाईचे राजकीयीकरण केले. त्याआधी डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही याप्रकारे सर्जिकल स्ट्राइक करण्यात आले होते. पण डॉ. मनमोहन सिंग वा काँग्रेसने लष्करी कारवाईचे कधीच राजकारण केले नाही, अशी टीका गांधी यांनी केली.भिलवाडामधील सभेत राहुल गांधी यांनी नोटाबंदी व जीएसटीच्या निर्णयामुळे शेतकरी, गरीब व सामान्यांचे हाल झाल्याची टीका केली. या निर्णयांमुळे अनेक छोटे व मध्यम उद्योग बंद पडले आणि लाखो लोकांचा रोजगार गेला, असा आरोप राहुल गांधी यांनी सभेमध्ये केला.तरुण बेरोजगारांना नोकऱ्या मिळवून देण्यात पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री वसुंधरा राजे अपयशी ठरल्याचे सांगून ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी यापुढे लोकांना ‘मन की बात’ ऐकवण्याऐवजी जनतेच्या मनातील बात ऐकावी.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी