शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मोदी स्वत:ला सर्वज्ञानी समजू लागले आहेत; राहुल गांधी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 04:59 IST

या खात्यांना मंत्री असूनही स्वत: मोदीच प्रत्येक बाबतील हस्तक्षेप करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी येथे केली.

उदयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:ला सर्वज्ञानी समजतात. संरक्षण खात्यातील आपल्यालाच समजते, अर्थ खात्याविषयी आपल्या तुलनेत इतरांना काहीच कळत नाही, परराष्ट्र खात्याविषयीही केवळ आपणच सारे जाणतो, अशा पद्धतीने ते वागत आहेत. या खात्यांना मंत्री असूनही स्वत: मोदीच प्रत्येक बाबतील हस्तक्षेप करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी येथे केली.राहुल गांधी यांनी येथे उद्योजक व व्यापारी यांच्याशी त्यांच्या प्रश्नावर चर्चा केली. त्यांनी राज्यात तीन प्रचार सभाही घेतल्या. हिंदुत्ववाद म्हणजे काय, हेही केवळ आपल्यालाच समजते, अशी त्यांची धारणा आहे. मात्र त्यांना स्वत:ला हिंदुत्व म्हणजे काय ते कळलेले नाही. त्यांच्यापेक्षा सामान्यांना हिंदू व हिंदुत्वाची अधिक माहिती असते. त्यामुळे मोदी कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत, हेच समजेनासे झाले आहे, असा टोलाही राहुल गांधी यांना लगावला.पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने दोन वर्षांपूर्वी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचेही पंतप्रधान मोदी यांनी राजकारण केले. उत्तर प्रदेशातील निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी लष्करी कारवाईचे राजकीयीकरण केले. त्याआधी डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही याप्रकारे सर्जिकल स्ट्राइक करण्यात आले होते. पण डॉ. मनमोहन सिंग वा काँग्रेसने लष्करी कारवाईचे कधीच राजकारण केले नाही, अशी टीका गांधी यांनी केली.भिलवाडामधील सभेत राहुल गांधी यांनी नोटाबंदी व जीएसटीच्या निर्णयामुळे शेतकरी, गरीब व सामान्यांचे हाल झाल्याची टीका केली. या निर्णयांमुळे अनेक छोटे व मध्यम उद्योग बंद पडले आणि लाखो लोकांचा रोजगार गेला, असा आरोप राहुल गांधी यांनी सभेमध्ये केला.तरुण बेरोजगारांना नोकऱ्या मिळवून देण्यात पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री वसुंधरा राजे अपयशी ठरल्याचे सांगून ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी यापुढे लोकांना ‘मन की बात’ ऐकवण्याऐवजी जनतेच्या मनातील बात ऐकावी.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी