शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

मोदी सरकार 'तलाक'च्या विरोधात, सर्वोच्च न्यायालयात मांडणार महिलांची बाजू

By admin | Updated: September 15, 2016 10:05 IST

केंद्र सरकार तलाक या शब्दाचा तीनदा उच्चार करून तलाक देण्याच्या प्रथेविरोधात आणि मुस्लिम महिलांच्या बाजूने भुमिका मांडण्याच्या तयारीत आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 -  केंद्र सरकार तलाक या शब्दाचा तीनदा उच्चार करून तलाक देण्याच्या प्रथेविरोधात आणि मुस्लिम महिलांच्या बाजूने भुमिका मांडण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडणार आहे. मुस्लिम महिलांच्या एकूण अवस्थेबाबत दाखल याचिकांवर म्हणणे मांडण्यास सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला चार आठवड्यांचा अवधी दिला होता. यानंतर केंद्रीय मंत्र्यांची महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती. 
 
या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी सहभागी होते. तब्बल एक तास चाललेल्या या बैठकीत या मुद्यावर चर्चा करण्यात आली. 
 
जगभरात महिलांना समान दर्जा मिळत आहे. त्यादृष्टीने आपणही पाऊल टाकण्याची गरज असल्याचं या बैठकीत सांगण्यात आल्याचं सुत्रांकडून कळलं आहे. कायदा मंत्रालयाने न्यायालयात उत्तर देण्यासाठी ड्राफ्ट तयार केला असून यामध्ये ट्रिपल तलाकवर बंदी आणण्यात यावी तसंच समान नागरी कायदा लागू करण्यात यावा असं स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे.
 
तलाकसंबंधी याचिकेवर आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने दोन सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाला म्हणणे मांडले होते. सामाजिक सुधारणांच्या नावाखाली मुस्लिमांच्या वैयक्तिक कायद्यांचे पुनर्लेखन करता येऊ शकत नाही. बहुविवाह, तीन तलाक (तलाक ए बिदत) आणि निकाह हलाला या मुस्लिम प्रथांशी संबंधित गुंतागुंतीचे मुद्दे हे संसदेच्या अधीन असलेले मुद्दे असून, न्यायालयाला त्यात हस्तक्षेप करता येणार नाही, असे मुस्लीम लॉ बोर्डाने म्हटले होते.
 
विवाह, तलाक आणि पोटगी आदी मुद्यांवर मुस्लिम वैयक्तिक कायद्यांद्वारे निश्चित करण्यात आलेल्या प्रथा अल कुराण या पवित्र ग्रंथावर आधारित असून, या ग्रंथाच्या मूळ भागावर न्यायालयांना आपल्या व्याख्या तयार करता येऊ शकत नाहीत. बहुविवाहाबाबत बोर्डाने म्हटले आहे, इस्लामने बहुविवाहाला मुभा दिलेली असली तरी तो त्याला प्रोत्साहन देत नाही.
मुस्लिमांत इतर धर्मीयांच्या तुलनेत बहुविवाहाचे प्रमाण कमी असल्याचेही बोर्डाने जागतिक विकास अहवाल १९९१ सह विविध अहवालांचा हवाला देत सांगितले. जागतिक विकास अहवालानुसार, बहुविवाहाचे प्रमाण आदिवासींमध्ये १५.२५ टक्के, बौद्धांमध्ये ७.९७, हिंदूंमध्ये ५.८०, तर मुस्लिमांत केवळ ५.७३ टक्के आहे. 
फोनवरून तीनवेळा ‘तलाक’ शब्द उच्चारून एकाने दिला होता घटस्फोट
मुस्लिम महिलांना तलाक किंवा आपल्या पतीच्या दुसऱ्या विवाहामुळे लैंगिक असमानतेला सामोरे जावे लागते काय, या मुद्याची न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली होती. भारताचे सरन्यायाधीश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील एक पीठ यावर सुनावणी करीत आहे. यासोबतच मुस्लिम समाजात प्रचलित तीन तलाक प्रथेला (तलाक हा शब्द तीनदा उच्चारून पत्नीला तलाक देणे.) आव्हान देणाऱ्या याचिकाही दाखल असून, त्यात शायरा बानो यांच्या याचिकेचाही समावेश आहे.
शायरा बानो यांना त्यांच्या पतीने दूरध्वनीवरून तीनदा तलाक हा शब्द उच्चारून तलाक दिला होता. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने आणि जमायत ए उलेमा यांनी तलाकच्या या पद्धतीचे समर्थन करताना ही कुराणवर आधारित प्रथा असल्याचे सांगून न्यायालयाला त्यात हस्तक्षेप करता येऊ शकत नसल्याचे सांगितले.