शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुस्लिम मुलींना उच्चशिक्षणासाठी मोदी सरकार देणार 51 हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 10:09 IST

देशातील मुस्लिम मुलींनी उच्च शिक्षणाचं ध्येय गाठण्यासाठी प्रोस्ताहन द्यायला केंद्र सरकारकडून 51 हजार रूपयांची रक्कम मदत म्हणून दिली जाणार आहे

ठळक मुद्देदेशातील मुस्लिम मुलींनी उच्च शिक्षणाचं ध्येय गाठण्यासाठी प्रोस्ताहन द्यायला केंद्र सरकारकडून 51 हजार रूपयांची रक्कम मदत म्हणून दिली जाणार आहेया मदतीला 'शादी शगुन' असं नाव देण्यात आलं आहे.केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मौलाना आझाद एज्युकेशन फाऊंडेशनकडून मुस्लिम मुलींना शिक्षणासाठी मदत करण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

नवी दिल्ली, दि. 7- देशातील मुस्लिम मुलींनी उच्च शिक्षणाचं ध्येय गाठण्यासाठी प्रोस्ताहन द्यायला केंद्र सरकारकडून 51 हजार रूपयांची रक्कम मदत म्हणून दिली जाणार आहे.या मदतीला 'शादी शगुन' असं नाव देण्यात आलं आहे. केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मौलाना आझाद एज्युकेशन फाऊंडेशनकडून मुस्लिम मुलींना शिक्षणासाठी मदत करण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. एमएईएफनुसार,या नव्या योजनेचं ध्येय मुस्लिम मुलींना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं आहे. नुकतंच अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एमएईएफच्या बैठकीत मुलींना दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिपच्या संदर्भात काही निर्णय झाले. त्यामध्ये शादी शगुन योजनेचा नवा निर्णय झाला. तसंच नववी आणि दहावी इयत्तेत शिकणाऱ्या मुस्लिम मुलींना दहा हजार रूपयांची रक्कम दिली जाइल, असा निर्णयही या बैठकीत झाला आहे. सध्या अकरावी आणि बारावीत शिकणाऱ्या मुस्लिम मुलींना बारा हजार रूपये शिष्यवृत्ती दिली जात होती. 

मुस्लिम समाजातील एका मोठ्या भागात आजही मुस्लीम मुलींना उच्च शिक्षण मिळत नाही. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. आमचं ध्येय मुस्लिम मुलींना तसंच त्यांच्या पालकांना उच्चशिक्षणासाठी प्रोत्याहन देण्याचं आहे. मुलींनी कमीत कमी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करावं हाच उद्देश डोळ्यासमोर आहे. त्यासाठी शादी शगुन या योजनेद्वारे 51 हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे, अशी माहिती एमएईएफचे कोषाध्यक्ष शाकिर हुसैन अन्सारी म्हणाले आहेत.

शादी शगुन या योजनेसाठी एक वेबसाइट तयार केली जात असून या वेबसाइटवर योजनेची संपूर्ण माहिती मिळणार आहे. यातमध्ये उल्लेखनिय बाब म्हणजे, ज्यांनी शालेय शिक्षण घेताना एमएईएफकडून दिली जाणारी शिष्यवृत्ती मिळविली आहे अशा मुलींना शादी शगुनची ही किंमत पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण करण्यासाठी मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सबका साथ सबका विकास' या घोषणेला सत्यात उतरविण्याचं काम केलं आहे, असं अन्सारी म्हणाले आहेत. तसंच या योजनेला पूर्णत्वास आणल्याबद्दल त्यांनी मुख्तार अब्बास नखवी यांचेही आभार मानले आहेत.